शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

अमरमहल पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ठप्प

By admin | Updated: April 11, 2017 01:32 IST

पूर्व द्रुतगती महामार्गावरील अमर महल उड्डाणपुलाचे काही सांधे अचानक तुटल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अमर महल उड्डाणपुलाचे काही सांधे अचानक तुटल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणारी वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात आल्याने, पूर्व द्रुतगती महामार्गासह सायन-पनवेल मार्ग वाहतूककोंडीमुळे ठप्प झाला आहे. याचा फटका मुंबईकरांसह सर्वच प्रवाशांना बसत आहे. तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक अमर महल उड्डाणपुलाखालून वळवली आहे. मात्र, अमर महल उड्डाणपुलाखालील रस्ता अगदीच लहान असल्याने, सध्या येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. (प्रतिनिधी)पुलाच्या दुरुस्तीला विलंब- ज्या कंपनीने या पुलाची बांधणी केली होती, त्या कंपनीने सध्या पुलांच्या बांधणीचे काम बंद केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने, दुसऱ्या एका कंपनीला या पुलाची माहिती दिली. त्यानुसार, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असून, त्यावर काय उपाय करता येईल? याबाबत दोन दिवसांत ते बांधकाम विभागाला कळवणार आहेत.तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात टेकू देण्यात आला असून, केवळ ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुलावरून सुरू आहे, तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.मुंबईतून ठाणे, नाशिक, आग्रा येथे जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर केला जातो. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. आता या समस्येमुळे वाहनांच्या रांगा सायनपर्यंत लागत आहेत.वाहतूक पोलिसांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी काही वाहनांना सायन-पनवेल मार्गाचा वापर करण्याची विनंती केली आहे. मात्र, वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या.- तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली.त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या.वाहतूककोंडीमुळे नागरिकांना त्रास होणार आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.- राजेंद्र पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चेंबूर