शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

अमरमहल पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ठप्प

By admin | Updated: April 11, 2017 01:32 IST

पूर्व द्रुतगती महामार्गावरील अमर महल उड्डाणपुलाचे काही सांधे अचानक तुटल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अमर महल उड्डाणपुलाचे काही सांधे अचानक तुटल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणारी वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात आल्याने, पूर्व द्रुतगती महामार्गासह सायन-पनवेल मार्ग वाहतूककोंडीमुळे ठप्प झाला आहे. याचा फटका मुंबईकरांसह सर्वच प्रवाशांना बसत आहे. तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक अमर महल उड्डाणपुलाखालून वळवली आहे. मात्र, अमर महल उड्डाणपुलाखालील रस्ता अगदीच लहान असल्याने, सध्या येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. (प्रतिनिधी)पुलाच्या दुरुस्तीला विलंब- ज्या कंपनीने या पुलाची बांधणी केली होती, त्या कंपनीने सध्या पुलांच्या बांधणीचे काम बंद केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने, दुसऱ्या एका कंपनीला या पुलाची माहिती दिली. त्यानुसार, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असून, त्यावर काय उपाय करता येईल? याबाबत दोन दिवसांत ते बांधकाम विभागाला कळवणार आहेत.तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात टेकू देण्यात आला असून, केवळ ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुलावरून सुरू आहे, तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.मुंबईतून ठाणे, नाशिक, आग्रा येथे जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर केला जातो. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. आता या समस्येमुळे वाहनांच्या रांगा सायनपर्यंत लागत आहेत.वाहतूक पोलिसांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी काही वाहनांना सायन-पनवेल मार्गाचा वापर करण्याची विनंती केली आहे. मात्र, वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या.- तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली.त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या.वाहतूककोंडीमुळे नागरिकांना त्रास होणार आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.- राजेंद्र पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चेंबूर