शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

महामार्गावरील चोरटी वाहतूक चव्हाट्यावर

By admin | Updated: April 29, 2016 02:02 IST

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते भोसरीदरम्यान अवैध चोरटी वाहतूक होत आहे,

भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते भोसरीदरम्यान अवैध चोरटी वाहतूक होत आहे, असे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिल्याने अवैध वाहतुकीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते भोसरीदरम्यान सर्रास अवैध वाहतूक होत आहे. तसेच या महामार्गावरील इतरही शहरांदरम्यान अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे दररोजचे चित्र आहे. याबाबत गोरे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधानसभेत, १) पुणे नाशिक महामार्गावर चाकण, भोसरी, आंबेठाण चौक या रस्त्यांवर पॅगो रिक्षातून १२ ते २० माणसांची धोकादायक पद्धतीने अवैध वाहतूक केली जात असल्याचे जानेवारी २०१६ वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय, २) असल्यास, अवैध वाहतूक बंद करून जीवित हानी टाळणेकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिवहनमंत्री यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ रोजी वा त्या सुमारास निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय, ३) असल्यास, अवैध वाहतूक बंद करण्यास शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, ४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्या मुद्द्याच्या उत्तरात १) हे खरे नाही. तरीही नमूद मार्गावर पॅगो रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलीस ठाणे, तसेच वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते, असे उत्तर दिले. परिवहनमंत्र्यांना निवेदन दिल्याचे त्यांनी मान्य केले. (वार्ताहर)प्रश्नाच्या तिसऱ्या मुद्द्यावर त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर चाकण, भोसरी, आंबेठाण चौक येथे पॅगो रिक्षा विविध ठिकाणांहून चोरटी प्रवासी वाहतूक करतात. अशा चोरट्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅगोंवर पोलिसांकडून, तसेच परिवहन विभागाकडून वारंवार दंडात्मक व निलंबनात्मक कारवाई केली जाते . अवैध खासगी वाहतूकदारांकडून छुप्या पद्धतीने चालणाऱ्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याबाबत १४- १- २०१६ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत, असे उत्तर दिले.