शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

औरंगाबादमधील अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी

By admin | Updated: May 6, 2017 14:00 IST

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड-सोयगाव तालुक्याला जोडणा-या अजिंठा घाटात पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 6 - अजिंठा घाटात दर्गाजवळ नादुरुस्त उभ्या असलेल्या एका ट्रकला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात  2 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पहाटे 5:30 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 7 तास येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.  
 
अपघातानंतर अजिंठा पोलीस घटना स्थळी जवळपास सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तर 5 तासानंतर सकाळी 10 वाजता क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. यानंतर दुपारी 12 वाजता येथील वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात जखमी झालेले दोघंही गुजरातमधील रहिवासी आहेत. जखमींवर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन त्यांना औरगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.
 
फळ-भाजीपाल्याने भरलेला ट्रक (क्रमांक जी.जे.19- यू 3452)  भुसावळहून पुणे येथे जात होता. शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला. त्यामुळे रस्त्याशेजारी चालक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते.  
यादरम्यान, औरंगाबादहून  जळगावच्या दिशेने येणा-या भरधाव ट्रकची ( क्रमांक एम एच 28- बी 8055) तेथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास ठप्प झाली होती.
 
अजिंठा पोलीस अडीच तासानंतर घटनास्थळी दाखल 
घटनास्थळापासून पोलीस ठाणे 2 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र अपघाताची माहिती  पोलिसांना उशीरा मिळाली. परिणामी पोलीस घटनास्थळी सकाळी 7:30 वाजता दाखल झाले.  तर नेहमी हप्ते जमा करत फिरणारे वाहतूक पोलीस 8 वाजता घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे 7 तास  तात्कळत बसावे लागले, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.