शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादमधील अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी

By admin | Updated: May 6, 2017 14:00 IST

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड-सोयगाव तालुक्याला जोडणा-या अजिंठा घाटात पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 6 - अजिंठा घाटात दर्गाजवळ नादुरुस्त उभ्या असलेल्या एका ट्रकला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात  2 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पहाटे 5:30 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 7 तास येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.  
 
अपघातानंतर अजिंठा पोलीस घटना स्थळी जवळपास सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तर 5 तासानंतर सकाळी 10 वाजता क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. यानंतर दुपारी 12 वाजता येथील वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात जखमी झालेले दोघंही गुजरातमधील रहिवासी आहेत. जखमींवर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन त्यांना औरगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.
 
फळ-भाजीपाल्याने भरलेला ट्रक (क्रमांक जी.जे.19- यू 3452)  भुसावळहून पुणे येथे जात होता. शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला. त्यामुळे रस्त्याशेजारी चालक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते.  
यादरम्यान, औरंगाबादहून  जळगावच्या दिशेने येणा-या भरधाव ट्रकची ( क्रमांक एम एच 28- बी 8055) तेथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास ठप्प झाली होती.
 
अजिंठा पोलीस अडीच तासानंतर घटनास्थळी दाखल 
घटनास्थळापासून पोलीस ठाणे 2 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र अपघाताची माहिती  पोलिसांना उशीरा मिळाली. परिणामी पोलीस घटनास्थळी सकाळी 7:30 वाजता दाखल झाले.  तर नेहमी हप्ते जमा करत फिरणारे वाहतूक पोलीस 8 वाजता घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे 7 तास  तात्कळत बसावे लागले, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.