शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

इज्जतीसाठी सराफांनी व्यवसाय करावा : रांका

By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST

महाबळेश्वरमध्ये सुवर्णकारांचे अधिवेशन : हॉलमार्कच्या सक्तीबाबतही मान्यवरांकडून नाराजी

महाबळेश्वर : ग्राहकाकडून एक रूपया घेतला तर ९५ पैशांचे नव्हे त्यांना एक रुपयाचे सोने द्या. आपला सर्व व्यवहार एक नंबरमध्ये करा. अनोळखी व्यक्तीकडून सोने घेऊ नका. केवळ पैशासाठी व्यवसाय न करता इज्जत कमावण्यासाठी व्यवसाय करा, असा सल्ला सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यावसायिकांना दिला. येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी झालेल्या सराफ असोसिएशनच्या अधिवेशनात ते बोलत होते. मेळाव्यास असोसिएशनचे उपाध्यक्ष पे्रम झांबड, मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष मुकेश संघवी, सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशोर पंडित, सुभाष ओसवाल, सुधाकर टाक उपस्थित होते. रांका म्हणाले, ‘काही मोठे ब्रॅण्ड आपल्या दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का मारत नाहीत. मग ही सक्ती लहान व्यापाऱ्यांवरच का केली जाते? जगात फक्त १९ देशांतच हॉलमार्क शिक्का सक्तीचा आहे. आपल्याकडे अपुऱ्या यंत्रणेमुळे अडचणी येतात. हॉलमार्कसाठी दागिने घेऊन जाताना दरोडे पडतात. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही शासनाचे डोळे उघडत नाहीत. आमची इमेज, गुडविल आणि स्टेटस हाच आमचा हॉलमार्क आहे. एक मिलीग्रॅम वजनी काटा सक्तीचा करणारा कायदा रद्द होणार असल्याचे रांका यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातून सुवर्णकार बंधुंनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) सोने खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीचे नको एक लाखापेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. ही सक्ती उठविली पाहिजे. एकीकडे सोने आयातीमुळे विदेशी चलन गुंतून पडते अशी ओरड केंद्र शासन करत आहे तर दुसरीकडे अशोकचक्र असलेले नाणे विक्रीसाठी शासनाच सोन्याची आयात करत आहे. तेव्हा विदेशी गुंतवणूक अडकून पडत नाही का, असा सवाल मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. अडचणी सोडविण्यासाठी एकत्र या व्यवसाय करताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व सुवर्णकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दुकानात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवावे, असे मत सुधाकर टाक यांनी व्यक्त केले. यावेळी सराफांनी आपल्या व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणींबाबत मते मांडली. सावकारीपेक्षा नॉनबँकिंग फायनान्स करा सावकारी करण्यापेक्षा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन नॉन बँकिंग फायनान्सचा उपयोग करावा. कारण सावकारीमध्ये शासनाचे जाचक निर्बंध आहेत. उलट सावकारापेक्षा जास्त लाभ घेणारी फायनान्स कंपनीत सरकारचे नियंत्रण नाही, असे रांका यांनी स्पष्ट केले.