शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

जंजिऱ्याच्या तटबंदीबाहेर पर्यटकांची कोंडी

By admin | Updated: November 8, 2016 02:41 IST

दिवाळीच्या सुटीमध्ये जंजिरा किल्ला पाहावयास जाणाऱ्या पर्यटकांची समुद्रामध्येच कोंडी केली जात आहे. ६ नोव्हेंबरला हजारो पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर दोन तास ताटकळत ठेवण्यात आले

नामदेव मोरे, नवी मुंबई दिवाळीच्या सुटीमध्ये जंजिरा किल्ला पाहावयास जाणाऱ्या पर्यटकांची समुद्रामध्येच कोंडी केली जात आहे. ६ नोव्हेंबरला हजारो पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. होडीत चढ - उतार करण्यासाठीही योग्य व्यवस्था नसल्याने अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. जीव मुठीत घेवून पर्यटकांनी किल्ल्यावरील भग्न अवशेष पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाच्या इतिहासामध्ये तब्बल ३३० वर्षे अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणून जंजिऱ्याची ओळख आहे. मात्र पुरातत्व विभाग व स्थानिक आस्थापनांच्या अनागोंदी कारभारामुळे तिथे जाणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. मुरूड शहरामध्ये प्रवेश केला की नगरपालिकेच्यावतीने २० रूपये प्रवेशशुल्क आकारले जाते. राजपुरी गावात प्रवेश करताच ग्रामपंचायतीकडून १० रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. याशिवाय वाहनतळ शुल्क म्हणून प्रत्येक वाहनधारकाकडून ४० रूपये वसूल केले जात आहे. वाहनतळ नसताना विनाकारण पर्यटकांना भुर्दंड भरावा लागत आहे. रविवारी दोन हजार पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले होते. राजपुरी व इतर तीन ठिकाणावरून किल्ल्याच्या समोर गेल्यानंतर तिथे दोन तास समुद्रात थांबविण्यात येत होते. गर्दी असल्याने पर्यटकांची अडवणूक करण्यात आली. प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतरही होडीवरील कर्मचारी आम्ही काहीही करू शकत नाही, आतील पर्यटक बाहेर आल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही, असे सांगितले जात होते. दोन तास समुद्रात अडकलेल्या पर्यटकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. (अधिक छायाचित्रे/४)भूमिपुत्र राम पाटलाचा इतिहास उपेक्षितचसिद्दी यांनी ३३० वर्षे जंजिरा किल्ला अजिंक्य ठेवला. पण या किल्ल्याची मूळ संकल्पना होती कोळी बांधवांचा प्रमुख राम पाटील याची. राजपुरीमध्ये पूर्वी कोळी बांधवांची वस्ती होती. समुद्री चाच्यांचा उपद्रवापासून सुटका व्हावी यासाठी राम पाटील यांनी जंजिऱ्याच्या बेटावर मेढेकोट म्हणजे मोठाले ओंडके एका शेजारी एक लावून तटबंदी उभारली. पुढे निजामाने कटकारस्थान करून बेट ताब्यात घेतले व पुढे तिथे किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. १६१७ मध्ये सिद्दी अंबरने बादशहाकडून सनद म्हणून किल्ला मिळविला व पुढे १९४७ पर्यंत तो त्यांच्याच ताब्यात होता. सिद्दीचे नाव आजही घेतले जाते पण ज्यांची ही संकल्पना होती त्या राम पाटलांचा इतिहासाचा सर्वांना विसर पडला. याचबरोबर पुरातत्व विभागाचेही या किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असून येथे मोठी पडझड झाली आहे. किल्ल्यावर सर्वत्र गवत वाढले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विहिरींची कचरा कुंडी झाली आहे. किल्ल्यावर साफसफाई करण्यासाठी काहीही व्यवस्था नाही. या सर्व गैरसोयी कधी दूर होणार असा प्रश्न पर्यटकांनी उपस्थित केला. जंजिरा किल्ल्यावरील वास्तव राजपुरी बंदरावर घाणीचे साम्राज्य, साफसफाईची सोय नाहीराजपुरीमध्ये पर्यटकांकडून अनधिकृतपणे ४० रूपये पार्किंग शुल्क किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन तास सक्तीने थांबविले जात आहेहोडीतून उतरताना व चढताना अपघात होण्याची शक्यता होडीत दाटीवाटीने पर्यटक कोंबून भरले जात आहेत. किल्ल्यावर कुठेही माहिती फलक नाहीतपुरातत्व विभागाचे किल्ल्याच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष किल्ल्यावर पिण्यासाठी पाणी नाहीपर्यटकांसाठी प्रसाधनगृह व इतर काहीही सुविधा नाहीऐतिहासिक तलावांची झाली कचरा कुंडी तटबंदीमध्ये वृक्ष उगवल्याने किल्ल्याची सुरक्षा धोक्यातराणी महालाची भिंत कोसळून अपघात होण्याची शक्यता ऐतिहासिक तळ्यांचीही दुरवस्था जंजिरा ३३० वर्षे अजिंक्य राहिला तो किल्ल्यामधील गोड्या पाण्याच्या तळ्यांमुळे. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्यावर जागोजागी तलाव व विहिरी आहेत. आताही या तळ्यांमध्ये मुबलक पाणी आहे. वास्तविक समुद्रात पिण्यायोग्य पाण्याचे झरे कसे आले याचे संशोधन होणे आवश्यक आहे. अभ्यासाचा व संशोधनाचा विषय असलेल्या तलावाची कचरा कुंडी होवू लागली असून येथे येणाऱ्या पर्यटकांना पिण्यासाठी एक घोट पाणी मिळेनासे झाले आहे.