शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

जंजिऱ्याच्या तटबंदीबाहेर पर्यटकांची कोंडी

By admin | Updated: November 8, 2016 02:41 IST

दिवाळीच्या सुटीमध्ये जंजिरा किल्ला पाहावयास जाणाऱ्या पर्यटकांची समुद्रामध्येच कोंडी केली जात आहे. ६ नोव्हेंबरला हजारो पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर दोन तास ताटकळत ठेवण्यात आले

नामदेव मोरे, नवी मुंबई दिवाळीच्या सुटीमध्ये जंजिरा किल्ला पाहावयास जाणाऱ्या पर्यटकांची समुद्रामध्येच कोंडी केली जात आहे. ६ नोव्हेंबरला हजारो पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. होडीत चढ - उतार करण्यासाठीही योग्य व्यवस्था नसल्याने अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. जीव मुठीत घेवून पर्यटकांनी किल्ल्यावरील भग्न अवशेष पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाच्या इतिहासामध्ये तब्बल ३३० वर्षे अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणून जंजिऱ्याची ओळख आहे. मात्र पुरातत्व विभाग व स्थानिक आस्थापनांच्या अनागोंदी कारभारामुळे तिथे जाणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. मुरूड शहरामध्ये प्रवेश केला की नगरपालिकेच्यावतीने २० रूपये प्रवेशशुल्क आकारले जाते. राजपुरी गावात प्रवेश करताच ग्रामपंचायतीकडून १० रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. याशिवाय वाहनतळ शुल्क म्हणून प्रत्येक वाहनधारकाकडून ४० रूपये वसूल केले जात आहे. वाहनतळ नसताना विनाकारण पर्यटकांना भुर्दंड भरावा लागत आहे. रविवारी दोन हजार पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले होते. राजपुरी व इतर तीन ठिकाणावरून किल्ल्याच्या समोर गेल्यानंतर तिथे दोन तास समुद्रात थांबविण्यात येत होते. गर्दी असल्याने पर्यटकांची अडवणूक करण्यात आली. प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतरही होडीवरील कर्मचारी आम्ही काहीही करू शकत नाही, आतील पर्यटक बाहेर आल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही, असे सांगितले जात होते. दोन तास समुद्रात अडकलेल्या पर्यटकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. (अधिक छायाचित्रे/४)भूमिपुत्र राम पाटलाचा इतिहास उपेक्षितचसिद्दी यांनी ३३० वर्षे जंजिरा किल्ला अजिंक्य ठेवला. पण या किल्ल्याची मूळ संकल्पना होती कोळी बांधवांचा प्रमुख राम पाटील याची. राजपुरीमध्ये पूर्वी कोळी बांधवांची वस्ती होती. समुद्री चाच्यांचा उपद्रवापासून सुटका व्हावी यासाठी राम पाटील यांनी जंजिऱ्याच्या बेटावर मेढेकोट म्हणजे मोठाले ओंडके एका शेजारी एक लावून तटबंदी उभारली. पुढे निजामाने कटकारस्थान करून बेट ताब्यात घेतले व पुढे तिथे किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. १६१७ मध्ये सिद्दी अंबरने बादशहाकडून सनद म्हणून किल्ला मिळविला व पुढे १९४७ पर्यंत तो त्यांच्याच ताब्यात होता. सिद्दीचे नाव आजही घेतले जाते पण ज्यांची ही संकल्पना होती त्या राम पाटलांचा इतिहासाचा सर्वांना विसर पडला. याचबरोबर पुरातत्व विभागाचेही या किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असून येथे मोठी पडझड झाली आहे. किल्ल्यावर सर्वत्र गवत वाढले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विहिरींची कचरा कुंडी झाली आहे. किल्ल्यावर साफसफाई करण्यासाठी काहीही व्यवस्था नाही. या सर्व गैरसोयी कधी दूर होणार असा प्रश्न पर्यटकांनी उपस्थित केला. जंजिरा किल्ल्यावरील वास्तव राजपुरी बंदरावर घाणीचे साम्राज्य, साफसफाईची सोय नाहीराजपुरीमध्ये पर्यटकांकडून अनधिकृतपणे ४० रूपये पार्किंग शुल्क किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन तास सक्तीने थांबविले जात आहेहोडीतून उतरताना व चढताना अपघात होण्याची शक्यता होडीत दाटीवाटीने पर्यटक कोंबून भरले जात आहेत. किल्ल्यावर कुठेही माहिती फलक नाहीतपुरातत्व विभागाचे किल्ल्याच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष किल्ल्यावर पिण्यासाठी पाणी नाहीपर्यटकांसाठी प्रसाधनगृह व इतर काहीही सुविधा नाहीऐतिहासिक तलावांची झाली कचरा कुंडी तटबंदीमध्ये वृक्ष उगवल्याने किल्ल्याची सुरक्षा धोक्यातराणी महालाची भिंत कोसळून अपघात होण्याची शक्यता ऐतिहासिक तळ्यांचीही दुरवस्था जंजिरा ३३० वर्षे अजिंक्य राहिला तो किल्ल्यामधील गोड्या पाण्याच्या तळ्यांमुळे. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्यावर जागोजागी तलाव व विहिरी आहेत. आताही या तळ्यांमध्ये मुबलक पाणी आहे. वास्तविक समुद्रात पिण्यायोग्य पाण्याचे झरे कसे आले याचे संशोधन होणे आवश्यक आहे. अभ्यासाचा व संशोधनाचा विषय असलेल्या तलावाची कचरा कुंडी होवू लागली असून येथे येणाऱ्या पर्यटकांना पिण्यासाठी एक घोट पाणी मिळेनासे झाले आहे.