शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

सुविधांअभावी पर्यटक परतीच्या मार्गावर!

By admin | Updated: December 30, 2014 00:21 IST

लोणारमध्ये १५ दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ; सुविधांचा अभाव.

मयुर गोलेच्छा/लोणार (जि. बुलडाणा) : उल्कापातामुळे तयार झालेल्या खार्‍या पाण्याच्या सरोवरासह शहरातील पुरातन मंदिरांचे आकर्षण असलेल्या लोणारमध्ये १५ दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. मात्र, मूलभूत सुविधांअभावी पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसून येते. नाताळाच्या सुट्या आणि ३१ डिसेंबर साजरा करण्याचे नियोजन करुन लोणार येथे मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. परंतु इथे आल्यानंतर थांबण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे संकुल सोडले, तर दुसरे कोणतेही ठिकाण नाही. सध्या पर्यटन विभागाच्या संकुलासह शहरातील विश्रामगृहेही हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याचप्रमाणे वैज्ञानिक, पौराणिक आणि धार्मिक महत्व असल्यामुळे राज्यभरातील शैक्षणिक संस्थांच्या सहलीही लोणारमध्ये येत आहेत. दिवसभरात १५0 ते २00 पर्यटकांचे आगमन होते. मात्र त्या तुलनेत येथे पर्यटकांची राहण्याची, जेवणाची सुविधा नसल्यामुळे, पर्यटक लगेचच येथून जाण्यास पसंती देतात. जागतिक किर्तीचे अ वर्ग दर्जा प्राप्त पर्यटनस्थळ असलेल्या लोणार येथे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. याकडे शासनाने तात्काळ लक्ष देवून पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची मागणी पर्यटकांमधून होत आहे. गत दोन दिवसांत लोणार येथे जवळपास ५00 पर्यटकांनी भेट दिली आहे; मात्र पर्यटकांना थांबण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरातील पर्यटन स्थळे पाहून एका दिवसातच त्यांना परतावे लागत आहे. महाराष्ट्र पर्यटन संकुलात १00 पर्यटकांची थांबण्याची व्यवस्था आहे; मात्र ऑनलाईन बुकींगमुळे एमटीडीसी आधीच पर्यटकांनी भरलेले असल्याचे लोणार येथील महाराष्ट्र पर्यटन संकुलाचे संचालक राजेश मापारी यांनी स्पष्ट केले.