शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

विहिरीचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांचा लोंढा

By admin | Updated: October 9, 2015 21:07 IST

‘लिंब’ बनलंय आकर्षण : १६४६ चा ऐतिहासिक वारसा पुरातन विभागाकडून दुर्लक्षित

संतोष साबळे -- लिंब--ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सातारा तालुक्यातील लिंब येथील ऐतिहासिक बारा मोटांची विहीर पर्यटकांना आकर्षित करीत असून या विहिरीवरील कोरीव नक्षीकाम पर्यटकांना मोहिनी घालत आहे. या वास्तूची पडझड सुरू झाली असून पुरातन विभागाने दखल घ्यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.सातारा शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य आणि कृष्णाकाठावर वसलेल्या लिंब गावच्या कुशीत असलेल्या शेरीच्या मळ्यात ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य अशी बारा मोटेची विहीर आहे. ही विहीर म्हणजे वास्तुशास्त्र आणि वास्तुकलेचा अद्भुत नमूनाच म्हणता येईल. सातारा येथील राजघराण्याच्या मालकिच्या असलेल्या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या कालावधीमध्ये पूर्ण झाल्याची नोंद तेथील शिळेवर आहे.विहिरीचा पहिला जईपर्यंतचा टप्पा अष्टकोणी आहे. तर दूसरा जई पासूनचा वर्तुळाकार आहे. वरील अष्टकोणी असलेल्या भागाच्या धावेवर एकाच वेळी नऊ मोटा चालतील अशा स्वरूपाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. विहिरीच्या अष्टकोणी आकाराच्यावरील बाजूस चारा ठिकाणी वाघाची तर दोन ठिकाणी सिंहाची शिल्पे दिसतात. जई पासून विहिरीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठराविक अंतरावर नागाची शिल्पे कोरलेली आढळतात.विहिरीच्या मध्यभागी एक छोटेखानी महाल बांधण्यात आला असून या महालाच्या दोन्ही बाजूस कोरीव व सुंदर अशी गॅलरी आहे. या महालातील स्तंभावर श्रींची (गणेश), हनुमान, हत्ती, घोडे, घोडस्वार अशा असंख्य कलाकृती कोरलेल्या आढळतात. महालातील छत सहा ठिकाणी विभागलेला आहे. या सहाही ठिकाणी छतावर वेगवेगळ्या मुलांच्या आकृत्या बनवलेल्या आहेत. या महलात वरून येण्यासाठी एक जिना आहे. तर विहिरीत उतरण्यासाठी पुढे आणि पश्चिमेकडून दोन जिने आहेत. विहिरीतील महालाच्यावर दरबार वजा दगडी बांधकाम करण्यात आले आहे. पूर्वी या महालात दरबार होत असे. त्या दरबारामध्ये पंचक्रोशीतील प्रश्न सोडवण्याबाबत चर्चाही होत असे. या विहिरीचे बांधकाम २० गुंट्यापेक्षा जास्त भागात असून एक एकराच्यावर या विहिरीचा परिसर आहे. दगडी पाटामधूनच शेतीस पाणी जात असे. सध्या या विहिरीवर विद्युत मोटारी बसलेल्या असून या परिसरामधील शेतीला याच पाण्याचा वापर केला जात आहे.राजघराण्याचे कुलदैवत शंभू महादेव असल्याने या विहिरीचा आकार ही शंभूमहादेवाच्या पिंडीसारखा बनवण्यात आला आहे. असे येथे आल्यावर तेथील ग्रामस्थ सांगतात. साताराच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा असलेला या बारामोटेच्या विहीरीचे जतन होणे गरजेचे आहे. दोन कमानींचा पूलमहालाच्या खाली आणि विहिरीत उतरताना दोन कमानी आहेत. महालाच्या दक्षिणेकडील बाजूकडून मुख्य विहिरीमधून नऊ मोटांद्वारे पाणी काढण्यात येत होते. तर महालाच्या उत्तरेकडील बाजूस चौकोणी बांधकाम असून त्यामधूनही पाणी काढण्यात येत होते. चौकोणी बांधकामाच्या मधोमध दोन कमानींचा पूल असून मुख्य विहिरीपर्यंत जाण्यासाठी या पुलाचा वापर केला गेला आहे.आंब्यांच्या संगोपनासाठी बांधली विहीरलिंब परिसरामध्ये साडेतीन हजाराहून अधिक जातीच्या आंब्याची झाडे लावल्यानंतर या झाडांचे संगोपन करण्यासाठी या विहिरीची निर्मिती केली असावी, असेही अभ्यासकांचे मत आहे. या विहिरींच्या बाजूला एक छोटे खाली वाडाही बांधण्यात आला होता. त्याचे अवशेषही येथे आढळतात. मात्र, हा वाडा काळाच्या ओघात जमीनदोस्त झाला आहे.