शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या बसचे टायर फुटले, मोठा अपघात टळला

By admin | Updated: February 26, 2017 21:42 IST

अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही

श्यामकुमार पुरे/ ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 26 -  अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी घडली.फर्दापुर ते अजिंठा लेणी या 4 किलोमीटरचे रस्ते खराब झाल्याने अजिंठा लेणी अंतर्गत रस्त्यांच्या सुविधांचा विषय ऐरणीवर आला आहे.जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश - विदेशातून आलेल्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्याच्या सामना करावा लागत आहे. फर्दापुर येथून टी पॉइंट ते अजिंठा लेणी जाणाऱ्या जवळपास 4 किमी अंतरातील रस्ताची अक्षरशः चाळणी झाली आहे.पर्यटक घेऊन जाणाऱ्या बस चे या खडडेमय रस्त्यामुळे मागील टायर फुटल्याने अपघात घडला. या घटनेत सुदैवाने प्राण हानी झाली नसली तरी प्रशासनची मान खाली नक्कीच झाली.बस च्या काचेतून अअजिंठा डोंगर दरीतील निसर्ग दर्शन घेणाऱ्या पर्यटकांना बस च्या खाली उतरताच " भारत दर्शन घडले"!अजिंठा लेणीवर प्रदूषणाचा परिणाम होवू नये यासाठी येथे फर्दापुर टी पॉइंट पासून लेणी पर्यन्त महामंडळाची प्रदूषण विरहित बससेवा सक्तिचि आहे. अवघ्या 4 किलो मीटर अंतरासाठी पर्यटकांना वातानुकूलित व् साद्या बस साठी 20 रूपये टिकिट घेवून पर्यटन विभाग घेवून पर्यटकांची लूट करीत आहे. येण्या जाण्या साठी 40 रूपये मोजावे लागतात.पण या प्रवासात पैसे देवूनही खड्यांचा परिणाम पर्यटकांना भोगावा लागत आहे.या रस्त्यावर सदर बस चे टायर फुटल्यामुळे बस मधे बसलेले सर्व देशी - विदेशी पर्यटक घाबरले . या घटनेत कोणत्याच् प्रकारची हानी झाली नसली तरी जागतिक पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा व् सुरक्षितता ढेपाळल्याचे लक्षात येते. याच बस चे जर पुढचेटायर फुटले असते तर मोठा अपघात घडला असता मग लेणी प्रशाशन हा मोठा अपघात घडण्याची वात पाहत आहे का असा प्रश्न समोर येत आहे .या बाबत लेणी प्रशाशनाशी संपर्क होवू शकला नाही. मिळालेल्या माहीती प्रमाणे 2009 साली या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते.त्यानंतर रस्त्याची साधी डागडूजी येथे झालेली नाही.लेणी सायंकाळी बंद होते.तरीही या रसत्याने सुरक्षेच्या दृस्टितुन पुरेसा प्रकाश व्यवस्था नाही.काही ठराविक मोबाइल कंपन्यांची येथे रेंज आहे.फोन न लागने येथील नेहमीची समस्या आहे.मार्च अखेर या रस्त्याची किमान डांबरी नुतनिकरण ( पॅचेस ) झाले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.मेक इन इंडिया,मेक इन महाराष्ट्र,भारत दर्शन,अतुल्य भारत या सारख्या खर्चिक जाहिराती अजिंठा येथील असुविधेने फोल ठरत आहे. कारण जागतिक बँका, भारत व् जापान सरकारच्या कोटयावधि रुपयांचा निधि खर्चून जगप्रसिद्ध अजिंठा लेनीत जाणारी वाट खड्डेमय आहे.या कड़े पर्यटन विभागाचे दुर्लक्ष होत असून या कड़े लक्ष्य घालून रास्ता तत्काल दुरुस्त करावा अशी रास्त मागणी पर्यटक करीत आहे.