शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

पर्यटकांच्या बसचे टायर फुटले, मोठा अपघात टळला

By admin | Updated: February 26, 2017 21:42 IST

अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही

श्यामकुमार पुरे/ ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 26 -  अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी घडली.फर्दापुर ते अजिंठा लेणी या 4 किलोमीटरचे रस्ते खराब झाल्याने अजिंठा लेणी अंतर्गत रस्त्यांच्या सुविधांचा विषय ऐरणीवर आला आहे.जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश - विदेशातून आलेल्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्याच्या सामना करावा लागत आहे. फर्दापुर येथून टी पॉइंट ते अजिंठा लेणी जाणाऱ्या जवळपास 4 किमी अंतरातील रस्ताची अक्षरशः चाळणी झाली आहे.पर्यटक घेऊन जाणाऱ्या बस चे या खडडेमय रस्त्यामुळे मागील टायर फुटल्याने अपघात घडला. या घटनेत सुदैवाने प्राण हानी झाली नसली तरी प्रशासनची मान खाली नक्कीच झाली.बस च्या काचेतून अअजिंठा डोंगर दरीतील निसर्ग दर्शन घेणाऱ्या पर्यटकांना बस च्या खाली उतरताच " भारत दर्शन घडले"!अजिंठा लेणीवर प्रदूषणाचा परिणाम होवू नये यासाठी येथे फर्दापुर टी पॉइंट पासून लेणी पर्यन्त महामंडळाची प्रदूषण विरहित बससेवा सक्तिचि आहे. अवघ्या 4 किलो मीटर अंतरासाठी पर्यटकांना वातानुकूलित व् साद्या बस साठी 20 रूपये टिकिट घेवून पर्यटन विभाग घेवून पर्यटकांची लूट करीत आहे. येण्या जाण्या साठी 40 रूपये मोजावे लागतात.पण या प्रवासात पैसे देवूनही खड्यांचा परिणाम पर्यटकांना भोगावा लागत आहे.या रस्त्यावर सदर बस चे टायर फुटल्यामुळे बस मधे बसलेले सर्व देशी - विदेशी पर्यटक घाबरले . या घटनेत कोणत्याच् प्रकारची हानी झाली नसली तरी जागतिक पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा व् सुरक्षितता ढेपाळल्याचे लक्षात येते. याच बस चे जर पुढचेटायर फुटले असते तर मोठा अपघात घडला असता मग लेणी प्रशाशन हा मोठा अपघात घडण्याची वात पाहत आहे का असा प्रश्न समोर येत आहे .या बाबत लेणी प्रशाशनाशी संपर्क होवू शकला नाही. मिळालेल्या माहीती प्रमाणे 2009 साली या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते.त्यानंतर रस्त्याची साधी डागडूजी येथे झालेली नाही.लेणी सायंकाळी बंद होते.तरीही या रसत्याने सुरक्षेच्या दृस्टितुन पुरेसा प्रकाश व्यवस्था नाही.काही ठराविक मोबाइल कंपन्यांची येथे रेंज आहे.फोन न लागने येथील नेहमीची समस्या आहे.मार्च अखेर या रस्त्याची किमान डांबरी नुतनिकरण ( पॅचेस ) झाले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.मेक इन इंडिया,मेक इन महाराष्ट्र,भारत दर्शन,अतुल्य भारत या सारख्या खर्चिक जाहिराती अजिंठा येथील असुविधेने फोल ठरत आहे. कारण जागतिक बँका, भारत व् जापान सरकारच्या कोटयावधि रुपयांचा निधि खर्चून जगप्रसिद्ध अजिंठा लेनीत जाणारी वाट खड्डेमय आहे.या कड़े पर्यटन विभागाचे दुर्लक्ष होत असून या कड़े लक्ष्य घालून रास्ता तत्काल दुरुस्त करावा अशी रास्त मागणी पर्यटक करीत आहे.