शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी

By admin | Updated: August 1, 2016 02:49 IST

मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी घातल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली

नांदगाव/मुरुड : मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी घातल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शनिवार व रविवार येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असायची. संपूर्ण रायगडसह मुंबई, ठाणे व इतर भागांतून पर्यटकांचे लोंढे येत असत. परंतु जलसंपदा विभागाने सुरक्षिततेच्या कारणावरून येथे बंदी घातली असून, मज्जाव करण्यात आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत व काही मद्यप्रेमीही आपला कार्यभार आटोपून रिकाम्या काचेच्या बाटल्या तिथेच टाकून किंवा फोडून कचरा करीत असत. तसेच अनेक जण भोजनासाठी आणलेल्या पत्रावळ्या, प्लास्टिक ग्लास, कागद ,भोजन करून उरलेले उष्टे अन्न असा कचरा तेथेच टाकून जात असत. यामुळे नाहक जलसंपदा विभागाला ही कटकट सहन करावी लागत असल्याने अखेर त्यांनी अंतिम निर्णय घेत पर्यटक व स्थानिक नागरिकांना मज्जाव केला आहे. तसेच या धरणातील पाणी मुरु ड शहर व अन्य भागात पिण्यासाठी वापरले जाते. अशा सर्व घटनांचा सारासार विचार करीत ही बंदी टाकण्यात आल्याचे विश्वसनीयरीत्या कळते.जलसंपदा विभागाने स्थानिकांना रोजगार द्यावा. आंबोली धरणावर बंदी केल्याने स्थानिक नागरिकांनी सुद्धा नाराजी व्यक्त करून लवकरच एक शिष्टमंडळ आमदार पंडित पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहे. (वार्ताहर)पर्यटकांचा हिरमोडपर्यटक हे ओव्हर फ्लो पाणी वाहत जाते तिथेच आंघोळ करीत असतात. आमच्यापासून पिण्याच्या पाण्याला कोणताही धोका नसताना हा निर्णय घेऊन आम्हाला दुखी केल्याच्या भावना अनेक पर्यटकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अनेक जण नाराज होऊन परतत आहेत.>जलसंपदा विभागाने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. जर स्वच्छतेचे कारण असेल तर आम्हाला हा ठेका मिळावा. ग्रामपंचायत पर्यटकांसाठी सुविधा देण्यास तयार आहे. त्यांच्या या कृतीमुळे पर्यटकांची संख्या कमी होऊन स्थानिक नागरिक जे स्वयंरोजगार करतात त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गहन होणार - मनोज कमाने, सरपंच