शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी

By admin | Updated: August 1, 2016 02:49 IST

मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी घातल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली

नांदगाव/मुरुड : मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर पर्यटकांना बंदी घातल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शनिवार व रविवार येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असायची. संपूर्ण रायगडसह मुंबई, ठाणे व इतर भागांतून पर्यटकांचे लोंढे येत असत. परंतु जलसंपदा विभागाने सुरक्षिततेच्या कारणावरून येथे बंदी घातली असून, मज्जाव करण्यात आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत व काही मद्यप्रेमीही आपला कार्यभार आटोपून रिकाम्या काचेच्या बाटल्या तिथेच टाकून किंवा फोडून कचरा करीत असत. तसेच अनेक जण भोजनासाठी आणलेल्या पत्रावळ्या, प्लास्टिक ग्लास, कागद ,भोजन करून उरलेले उष्टे अन्न असा कचरा तेथेच टाकून जात असत. यामुळे नाहक जलसंपदा विभागाला ही कटकट सहन करावी लागत असल्याने अखेर त्यांनी अंतिम निर्णय घेत पर्यटक व स्थानिक नागरिकांना मज्जाव केला आहे. तसेच या धरणातील पाणी मुरु ड शहर व अन्य भागात पिण्यासाठी वापरले जाते. अशा सर्व घटनांचा सारासार विचार करीत ही बंदी टाकण्यात आल्याचे विश्वसनीयरीत्या कळते.जलसंपदा विभागाने स्थानिकांना रोजगार द्यावा. आंबोली धरणावर बंदी केल्याने स्थानिक नागरिकांनी सुद्धा नाराजी व्यक्त करून लवकरच एक शिष्टमंडळ आमदार पंडित पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहे. (वार्ताहर)पर्यटकांचा हिरमोडपर्यटक हे ओव्हर फ्लो पाणी वाहत जाते तिथेच आंघोळ करीत असतात. आमच्यापासून पिण्याच्या पाण्याला कोणताही धोका नसताना हा निर्णय घेऊन आम्हाला दुखी केल्याच्या भावना अनेक पर्यटकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अनेक जण नाराज होऊन परतत आहेत.>जलसंपदा विभागाने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. जर स्वच्छतेचे कारण असेल तर आम्हाला हा ठेका मिळावा. ग्रामपंचायत पर्यटकांसाठी सुविधा देण्यास तयार आहे. त्यांच्या या कृतीमुळे पर्यटकांची संख्या कमी होऊन स्थानिक नागरिक जे स्वयंरोजगार करतात त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गहन होणार - मनोज कमाने, सरपंच