शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना मिळणार ‘वायफाय’ची सुविधा

By admin | Updated: May 18, 2015 04:04 IST

जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)चे येथील महाप्रबधंक सुहास कांबळे यांनी आज पत्रकारांना दिली. प्रत्येक वर्षी १७ मे ला ‘विश्व दूरसंचार दिवस’ साजरा केला जातो. या दिवसानिमित्त बीएसएनएलच्या कार्याची माहिती देण्यासाठी कांबळे यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर हेही उपस्थित होते. भारतातील प्रत्येक खेड्यापर्यंत आॅप्टिकल फायबर केबल नेटवर्क पोहचविण्यासाठी २२.८ कोटी रूपयांचा नोफान (ठऋडठ) प्रकल्प कंपनीने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मंडणगड, रत्नागिरी, खेड आणि संगमेश्वर या चार तालुक्यांमधील ३८३ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्यात येणार आहेत. मंडणगडमधील ९ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर उर्वरित पाच तालुक्यांतील ग्रामपंचायतींचे काम हाती घेण्यात येईल. यासाठी निविदा प्रकिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वासही कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.खासगी सेवांच्या तुलनेने अधिक चांगल्या सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कांबळे यांनी सांगितले. जिल्ह्यात १७१ टेलिफोन एक्स्जेंच आहेत तर एकूण २०० मोबाईल टॉवर कार्यरत आहेत. पाच वर्षापुर्वी खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर घेतलेले टॉवर अटी पूर्ण न केल्याने पडून आहेत. असे जिल्ह्यात एकूण ३७ टॉवर्स आहेत. या टॉवर्सच्या माध्यमातून कंपनीला प्राप्त झालेल्या १५ ‘बेस्ट टर्मिनल स्टेशन’ च्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र येत असलेला नेटवर्कची समस्याही सुटेल, असे कांबळे यांनी सांगितले. कंपनीच्या ‘रात्री बोला मोफत’ या योजनेला १ मेपासून प्रारंभ झाला असून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ४०० दूरध्वनींची भर यामुळे पडली असल्याचे कांबळे यांनी सांगितले. प्रत्येक खेड्यापर्यंत मोबाईल नेटवर्क पोहचवून जनतेला संपर्क सुविधा देण्यासाठी कंपनीने कंबर कसली असल्याचे यावेळी कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)