शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना मिळणार ‘वायफाय’ची सुविधा

By admin | Updated: May 18, 2015 04:04 IST

जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)चे येथील महाप्रबधंक सुहास कांबळे यांनी आज पत्रकारांना दिली. प्रत्येक वर्षी १७ मे ला ‘विश्व दूरसंचार दिवस’ साजरा केला जातो. या दिवसानिमित्त बीएसएनएलच्या कार्याची माहिती देण्यासाठी कांबळे यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर हेही उपस्थित होते. भारतातील प्रत्येक खेड्यापर्यंत आॅप्टिकल फायबर केबल नेटवर्क पोहचविण्यासाठी २२.८ कोटी रूपयांचा नोफान (ठऋडठ) प्रकल्प कंपनीने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मंडणगड, रत्नागिरी, खेड आणि संगमेश्वर या चार तालुक्यांमधील ३८३ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्यात येणार आहेत. मंडणगडमधील ९ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर उर्वरित पाच तालुक्यांतील ग्रामपंचायतींचे काम हाती घेण्यात येईल. यासाठी निविदा प्रकिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वासही कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.खासगी सेवांच्या तुलनेने अधिक चांगल्या सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कांबळे यांनी सांगितले. जिल्ह्यात १७१ टेलिफोन एक्स्जेंच आहेत तर एकूण २०० मोबाईल टॉवर कार्यरत आहेत. पाच वर्षापुर्वी खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर घेतलेले टॉवर अटी पूर्ण न केल्याने पडून आहेत. असे जिल्ह्यात एकूण ३७ टॉवर्स आहेत. या टॉवर्सच्या माध्यमातून कंपनीला प्राप्त झालेल्या १५ ‘बेस्ट टर्मिनल स्टेशन’ च्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र येत असलेला नेटवर्कची समस्याही सुटेल, असे कांबळे यांनी सांगितले. कंपनीच्या ‘रात्री बोला मोफत’ या योजनेला १ मेपासून प्रारंभ झाला असून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ४०० दूरध्वनींची भर यामुळे पडली असल्याचे कांबळे यांनी सांगितले. प्रत्येक खेड्यापर्यंत मोबाईल नेटवर्क पोहचवून जनतेला संपर्क सुविधा देण्यासाठी कंपनीने कंबर कसली असल्याचे यावेळी कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)