शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कोल्हापूर बनणार पर्यटन जिल्हा

By admin | Updated: October 21, 2016 02:42 IST

कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत. कोल्हापूर ही कलानगरी, क्रीडानगरी, शाहूनगरी, चित्रनगरी अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण नगरी आहे. त्यात आता ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीने ती ‘पर्यटननगरी’ही होणार का? महाराष्ट्राला पर्यटनाचे अनेक पैलू आहेत; पण त्यांतील एकाचेही धड मार्केटिंग करण्यात आलेले नाही. त्यास कोल्हापूरचादेखील अपवाद नाही. खरे तर ‘महाराष्ट्राचे दक्षिणद्वार’ म्हणून कोल्हापूरचे एक वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आहे. या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपरांचा येथे मिलाफ आहे. संपूर्ण महाराष्ट्राला गोवा, कोकण आणि कर्नाटकात जाताना सहजच कोल्हापूरच्या भवानी मंडपातून जाता येते. अंबाबाई देवस्थानची भक्ती-शक्ती प्रबळ आहे. नुकत्याच संपलेल्या नवरात्रीच्या सणात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नऊ दिवसांत २३ लाख भाविकांनी भेट दिली आहे. उन्हाळी आणि हिवाळी सुट्यांतही कोल्हापूरला भेट देण्यासाठी पर्यटकांची अशाच प्रकारची गर्दी होते. मराठवाड्यापासून खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी रस्त्यांवर दिशादर्शक फलकांचाही पत्ता नाही, ही बाब मात्र ‘पर्यटन जिल्हा’ करण्याची तयारी करणाऱ्यांना सांगावी लागेल.अंबाबाईशिवाय जोतिबा आणि नृसिंहवाडीच्या कृष्णा-पंचगंगा संगमावरील श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यासाठीही असंख्य भाविक येतात. दर्शनानंतर ते पर्यटन करतात. कोल्हापुरी गुळ, चप्पल आदी खरेदी करीत कोल्हापुरी खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारतात. शिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचे जतन करणाऱ्या न्यू पॅलेसमधील ‘शाहू म्युझियम’लाही भेट देतात.जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर शेजारील पन्हाळगडावर फेरफटका मारतात. बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारी पावनखिंड पन्हाळगडाच्या पश्चिमेस आहे. शिवाय आंबा, दाजीपूर, आंबोली ही येथील निसर्गरम्य ठिकाणे आहेत. चांदोली आणि दाजीपूरचे अभयारण्य निसर्गवेड्यांना भुरळ घालणारे आहे. शतकमहोत्सवी राधानगरी धरण आहे. त्याचबरोबर अनेक नव्या धरणांचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचे मूळ ठिकाण म्हणून ज्या गडाचा गौरव केला जातो, तो पारगड चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला आहे. तेथून गोव्याचे सौंदर्यही न्याहाळता येते. तिलारी धरणाच्या पाण्याभोवतीचा परिसर सुंदरच आहे. येथून कोकण, गोवा आणि कर्नाटकातील दांडेली, कारवार काही तासांच्या अंतरावर आहे. पुणे शहरातून बाहेर पडलेल्या पर्यटकाला महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कोयनेचे अभयारण्य, साताऱ्याचे कास पठार पाहत कऱ्हाडच्या कृष्णा-कोयना संगमावरून अंबाबाईच्या दर्शनास येता येते. त्यासाठी संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचा कॉरिडॉर तयार करायला हवा. शिवाय पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. कोल्हापूरला पर्यटनाचे मुख्य केंद्र बनविण्याचा प्रयत्न अनेक वर्र्षांपासून चालू आहे; पण तो अनेक वेळा अर्धवट सोडण्यात येतो. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील सुमारे पन्नास टूर आॅपरेटर्सचा तीन दिवसांचा दौरा त्यांनी आयोजित केला होता. त्यांनी एक दिवस कोल्हापूर शहर पाहिले, एक दिवस कोल्हापूर जिल्हा पाहिला आणि तिसऱ्या दिवशी चर्चा, परिसंवाद व बैठका, आदींमध्ये कोल्हापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून कशा पद्धतीने विकसित करता येऊ शकतो, याची चर्चा केली. पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांना यात सहभागी करून घेतले. यावेळी टूर आॅपरेटर्स संघटनेचे अध्यक्ष आणि ‘वीणा वर्ल्ड’चे संस्थापक सुधीर पाटील यांनी एक आराखडा सादर केला. त्यावर कृती झाली पाहिजे.कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण चंद्रकांतदादांनी यासाठी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.