शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बनणार पर्यटन जिल्हा

By admin | Updated: October 21, 2016 02:42 IST

कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत. कोल्हापूर ही कलानगरी, क्रीडानगरी, शाहूनगरी, चित्रनगरी अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण नगरी आहे. त्यात आता ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीने ती ‘पर्यटननगरी’ही होणार का? महाराष्ट्राला पर्यटनाचे अनेक पैलू आहेत; पण त्यांतील एकाचेही धड मार्केटिंग करण्यात आलेले नाही. त्यास कोल्हापूरचादेखील अपवाद नाही. खरे तर ‘महाराष्ट्राचे दक्षिणद्वार’ म्हणून कोल्हापूरचे एक वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आहे. या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपरांचा येथे मिलाफ आहे. संपूर्ण महाराष्ट्राला गोवा, कोकण आणि कर्नाटकात जाताना सहजच कोल्हापूरच्या भवानी मंडपातून जाता येते. अंबाबाई देवस्थानची भक्ती-शक्ती प्रबळ आहे. नुकत्याच संपलेल्या नवरात्रीच्या सणात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नऊ दिवसांत २३ लाख भाविकांनी भेट दिली आहे. उन्हाळी आणि हिवाळी सुट्यांतही कोल्हापूरला भेट देण्यासाठी पर्यटकांची अशाच प्रकारची गर्दी होते. मराठवाड्यापासून खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी रस्त्यांवर दिशादर्शक फलकांचाही पत्ता नाही, ही बाब मात्र ‘पर्यटन जिल्हा’ करण्याची तयारी करणाऱ्यांना सांगावी लागेल.अंबाबाईशिवाय जोतिबा आणि नृसिंहवाडीच्या कृष्णा-पंचगंगा संगमावरील श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यासाठीही असंख्य भाविक येतात. दर्शनानंतर ते पर्यटन करतात. कोल्हापुरी गुळ, चप्पल आदी खरेदी करीत कोल्हापुरी खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारतात. शिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचे जतन करणाऱ्या न्यू पॅलेसमधील ‘शाहू म्युझियम’लाही भेट देतात.जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर शेजारील पन्हाळगडावर फेरफटका मारतात. बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारी पावनखिंड पन्हाळगडाच्या पश्चिमेस आहे. शिवाय आंबा, दाजीपूर, आंबोली ही येथील निसर्गरम्य ठिकाणे आहेत. चांदोली आणि दाजीपूरचे अभयारण्य निसर्गवेड्यांना भुरळ घालणारे आहे. शतकमहोत्सवी राधानगरी धरण आहे. त्याचबरोबर अनेक नव्या धरणांचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचे मूळ ठिकाण म्हणून ज्या गडाचा गौरव केला जातो, तो पारगड चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला आहे. तेथून गोव्याचे सौंदर्यही न्याहाळता येते. तिलारी धरणाच्या पाण्याभोवतीचा परिसर सुंदरच आहे. येथून कोकण, गोवा आणि कर्नाटकातील दांडेली, कारवार काही तासांच्या अंतरावर आहे. पुणे शहरातून बाहेर पडलेल्या पर्यटकाला महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कोयनेचे अभयारण्य, साताऱ्याचे कास पठार पाहत कऱ्हाडच्या कृष्णा-कोयना संगमावरून अंबाबाईच्या दर्शनास येता येते. त्यासाठी संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचा कॉरिडॉर तयार करायला हवा. शिवाय पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. कोल्हापूरला पर्यटनाचे मुख्य केंद्र बनविण्याचा प्रयत्न अनेक वर्र्षांपासून चालू आहे; पण तो अनेक वेळा अर्धवट सोडण्यात येतो. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील सुमारे पन्नास टूर आॅपरेटर्सचा तीन दिवसांचा दौरा त्यांनी आयोजित केला होता. त्यांनी एक दिवस कोल्हापूर शहर पाहिले, एक दिवस कोल्हापूर जिल्हा पाहिला आणि तिसऱ्या दिवशी चर्चा, परिसंवाद व बैठका, आदींमध्ये कोल्हापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून कशा पद्धतीने विकसित करता येऊ शकतो, याची चर्चा केली. पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांना यात सहभागी करून घेतले. यावेळी टूर आॅपरेटर्स संघटनेचे अध्यक्ष आणि ‘वीणा वर्ल्ड’चे संस्थापक सुधीर पाटील यांनी एक आराखडा सादर केला. त्यावर कृती झाली पाहिजे.कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण चंद्रकांतदादांनी यासाठी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.