शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

‘यूपी’नंतर सर्वाधिक बेघर महाराष्ट्रात !

By admin | Updated: December 5, 2015 00:36 IST

देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत. चार वर्षांपर्यंत देशात २ लाख ५६ हजार ८९६ बेघर कुटुंबे होती. विशेष म्हणजे विकसित राज्यांत बेघरांची संख्या तुलनेने अधिक आहे.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल गृह व नागरी गरिबी निर्मूलन राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. गोठवणाऱ्या थंडीत बेघर असलेल्यांचे मृत्यू आणि अशा लोकांच्या आश्रयासाठी सरकारने कोणती पावले उचलली? याबाबत दर्डा यांनी सविस्तर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रियो यांनी सांगितले की, २०११च्या जनगणना आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात ४१,२२७ कुटुंबे बेघर होती. महाराष्ट्रात ही संख्या ३२,६६४ एवढी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये २३,९८७ कुटुंबांच्या डोक्यावर छत नव्हते; तर अविभाजित आंध्र प्रदेशातही चार वर्षांपूर्वी २३,३७६ कुटुंबे छत नसल्याने उघड्यावर रात्र काढत होती. शहरातील बेघर लोकांना आश्रय देणे ही राज्यांची जबाबदारी आहे. अर्थात, राज्य सरकारांद्वारे अशा लोकांसाठी ‘निवारे’ उभारण्यासाठी गृह व नागरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाकडून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) राबवले जात आहे. याचप्रकारे शहरी बेघरांसाठी ‘रैन बसेरा(एसयूएच)’ नामक योजना राबवली जात आहे. यात पायाभूत सुविधा आणि स्थायी आश्रय दिला जातो. राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते, असेही त्यांनी सांगितले.एनयूएलएमअंतर्गत सर्वाधिक १२९ ‘निवारे’ मध्य प्रदेशात उभारण्यात आले आहेत. तामिळनाडूत ९५, उत्तर प्रदेशात ७३, बिहारात ४८, प. बंगालमध्ये ४५ तर महाराष्ट्रात बेघरांसाठी १३ ‘निवारे’ उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)