शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
8
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
9
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
10
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
11
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
12
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
13
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
14
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
15
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
16
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
17
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
18
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
19
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
20
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

‘यूपी’नंतर सर्वाधिक बेघर महाराष्ट्रात !

By admin | Updated: December 5, 2015 00:36 IST

देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत. चार वर्षांपर्यंत देशात २ लाख ५६ हजार ८९६ बेघर कुटुंबे होती. विशेष म्हणजे विकसित राज्यांत बेघरांची संख्या तुलनेने अधिक आहे.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल गृह व नागरी गरिबी निर्मूलन राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. गोठवणाऱ्या थंडीत बेघर असलेल्यांचे मृत्यू आणि अशा लोकांच्या आश्रयासाठी सरकारने कोणती पावले उचलली? याबाबत दर्डा यांनी सविस्तर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रियो यांनी सांगितले की, २०११च्या जनगणना आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात ४१,२२७ कुटुंबे बेघर होती. महाराष्ट्रात ही संख्या ३२,६६४ एवढी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये २३,९८७ कुटुंबांच्या डोक्यावर छत नव्हते; तर अविभाजित आंध्र प्रदेशातही चार वर्षांपूर्वी २३,३७६ कुटुंबे छत नसल्याने उघड्यावर रात्र काढत होती. शहरातील बेघर लोकांना आश्रय देणे ही राज्यांची जबाबदारी आहे. अर्थात, राज्य सरकारांद्वारे अशा लोकांसाठी ‘निवारे’ उभारण्यासाठी गृह व नागरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाकडून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) राबवले जात आहे. याचप्रकारे शहरी बेघरांसाठी ‘रैन बसेरा(एसयूएच)’ नामक योजना राबवली जात आहे. यात पायाभूत सुविधा आणि स्थायी आश्रय दिला जातो. राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते, असेही त्यांनी सांगितले.एनयूएलएमअंतर्गत सर्वाधिक १२९ ‘निवारे’ मध्य प्रदेशात उभारण्यात आले आहेत. तामिळनाडूत ९५, उत्तर प्रदेशात ७३, बिहारात ४८, प. बंगालमध्ये ४५ तर महाराष्ट्रात बेघरांसाठी १३ ‘निवारे’ उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)