शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

‘यूपी’नंतर सर्वाधिक बेघर महाराष्ट्रात !

By admin | Updated: December 5, 2015 00:36 IST

देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत. चार वर्षांपर्यंत देशात २ लाख ५६ हजार ८९६ बेघर कुटुंबे होती. विशेष म्हणजे विकसित राज्यांत बेघरांची संख्या तुलनेने अधिक आहे.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल गृह व नागरी गरिबी निर्मूलन राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. गोठवणाऱ्या थंडीत बेघर असलेल्यांचे मृत्यू आणि अशा लोकांच्या आश्रयासाठी सरकारने कोणती पावले उचलली? याबाबत दर्डा यांनी सविस्तर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रियो यांनी सांगितले की, २०११च्या जनगणना आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात ४१,२२७ कुटुंबे बेघर होती. महाराष्ट्रात ही संख्या ३२,६६४ एवढी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये २३,९८७ कुटुंबांच्या डोक्यावर छत नव्हते; तर अविभाजित आंध्र प्रदेशातही चार वर्षांपूर्वी २३,३७६ कुटुंबे छत नसल्याने उघड्यावर रात्र काढत होती. शहरातील बेघर लोकांना आश्रय देणे ही राज्यांची जबाबदारी आहे. अर्थात, राज्य सरकारांद्वारे अशा लोकांसाठी ‘निवारे’ उभारण्यासाठी गृह व नागरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाकडून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) राबवले जात आहे. याचप्रकारे शहरी बेघरांसाठी ‘रैन बसेरा(एसयूएच)’ नामक योजना राबवली जात आहे. यात पायाभूत सुविधा आणि स्थायी आश्रय दिला जातो. राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते, असेही त्यांनी सांगितले.एनयूएलएमअंतर्गत सर्वाधिक १२९ ‘निवारे’ मध्य प्रदेशात उभारण्यात आले आहेत. तामिळनाडूत ९५, उत्तर प्रदेशात ७३, बिहारात ४८, प. बंगालमध्ये ४५ तर महाराष्ट्रात बेघरांसाठी १३ ‘निवारे’ उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)