शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

उद्याची अभियंता पदाची आॅनलाईन परीक्षा पुढे ढकलली

By admin | Updated: August 26, 2016 20:32 IST

राज्यभरातील जलसंपदा व जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे ‘पदविकाधारकां’मधून भरतीसाठीच्या जाहिरातीला आव्हान देणा-या सर्व याचिका मुंबई उच्च

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.  - राज्यभरातील जलसंपदा व जलसंधारण विभागातील  कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे ‘पदविकाधारकां’मधून भरतीसाठीच्या जाहिरातीला आव्हान देणा-या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्या होत्या .या निर्णयाला  सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या मुळे रविवारी २८ आॅगस्ट २०१६ रोजी नियोजित असलेली अभियंता पदाची आॅनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे .
                      या आदेशासोबतच खंडपीठाने यापुर्वी पदवीधारकांना सुद्धा १२५६ पदांसाठी अर्ज करण्याची दिलेली मुभा आणि राज्य शासनाने निवड प्रक्रिया राबविण्यास मान्यता देणारा अंतरीम आदेश खंडपीठाने रद्द केला होता .राज्यस्तरीय निवड समितीने १५ फेब्रुवारी २०१६ रोजी  सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ची १२५६ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. या पदांसाठी केवळ ‘पदविकाधारकांकडून’ अर्ज मागविले होते. या जाहिरातीस बीड येथील पदवीधारक संग्राम घोळवे व इतर यांनी महाराष्ट प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले. अर्जदार हे पदवीधारक उच्च विद्याविभूषित आहेत. या  पदांसाठी त्यांना अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती, ती मॅटने फेटाळली.या अर्जदारांनी औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या.सुनावणीअंती खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या होत्या. या निर्णयाला पदवीधारकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे .याचिकाकर्ते उच्च विद्याविभूषित आहेत. त्यामुळे पदविकाधारकांऐवजी त्यांचा विचार व्हावयास हवा. राज्य शासनाची १२५६ पदांसाठीची निवड प्रक्रिया मनमानी आणि असंवैधानिक आहे, ती रद्द करुन याचिकाधारकांनाही या पदांसाठी अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे .
अंतिम निकालापर्यंत या भरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयाने  स्थगिती दिली.याची पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे.या परीक्षेची सुधारित तारीख ठरविण्यात येईल असे राज्यस्तरीय सरळ सेवा निवड समितीने सांगितले.