शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

टोमॅटो लागवड क्षेत्रात दीड पटीने वाढ!

By admin | Updated: August 31, 2015 01:20 IST

३0 लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन; उत्पादकांना मात्र फटका.

ब्रह्मनंद जाधव / मेहकर (जि. बुलडाणा): मागील तीन वर्षात राज्यात टोमॅटो उत्पादनाचे क्षेत्र ५0 हजार हेक्टरच्यावर पोहचले असून, लागवड क्षेत्रात जवळपास दीड पटीने वाढ झाली. यावर्षी व्यापार्‍यांनी अतिशय कमी भावात खरेदी केल्यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील पीक क्षेत्रातील सुमारे २९ हजार ११0 हेक्टर क्षेत्र हे टोमॅटो लागवडीखाली येत होते. गत सहा वर्षात टोमॅटोच्या या क्षेत्रात जवळपास दीड पटीने वाढ होऊन हे क्षेत्र ५0 हजार हेक्टरच्यावर पोहचले आहे. राज्यात सन २00९ मध्ये ७ लाख ३२ हजार, २0१0 मध्ये ११ लाख १२ हजार व २0११ मध्ये ७ लाख ३८ हजार टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर टोमॅटोच्या उत्पादनात वाढ होऊन सन २0१२ मध्ये १0 लाख ७ हजार, २0१३ मध्ये १0 लाख ५0 हजार व २0१४ मध्ये १0 लाख ५0 हजार टन टोमॅटो उत्पादन घेण्यात आले. गत तीन वर्षात शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर टोमॅटो उत्पादन घेतले. यावर्षी टोमॅटोच्या भावात मोठी घसरण होत आहे. बाजारपेठेत टोमॅटोचे भाव प्रती किलो ५ रुपये मिळणेही अवघड झाले आहे. व्यापारी मात्र १५ ते २0 रुपये किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. गत काही दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून, वातावरणातील या बदलाने काही भागात टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारातही अडते व व्यापार्‍यांचे साटेलोटे असल्याने टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे तोडणी, दलाली व दळणवळणाचा खर्चदेखील मोठय़ा प्रमाणात असल्याने भाजीपाला उत्पादन तोट्यात आहे.