शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

टोलवाला रस्ता बांधकाम खात्याने पळवला!

By admin | Updated: May 14, 2015 01:33 IST

ज्या कामांसाठी एमएसआरडीसीची स्थापना करण्यात आली ती पीडब्लूडीने केली, एमएसआरडीसीने त्यांना दिलेली कामे नीट केली नाहीत आणि टोल संस्कृती

अतुल कुलकर्णी, मुंबईज्या कामांसाठी एमएसआरडीसीची स्थापना करण्यात आली ती पीडब्लूडीने केली, एमएसआरडीसीने त्यांना दिलेली कामे नीट केली नाहीत आणि टोल संस्कृती आल्यानंतर आहे ते रस्तेही पीडब्ल्यूडीने पळवले. परिणामी एमएसआरडीसीचा पांढरा हत्ती कोणासाठी पोसला गेला, असा प्रश्न पडावा. शासनाने एमएसआरडीसीच्या स्थापनेच्या जीआरमध्ये आणि त्यानंतरच्या दुरुस्तीमध्ये (२९ नोव्हेंबर १९९६) भूमिका स्पष्ट केली होती. पीडब्लूडीला व्यापारी तत्वावर काम करता येत नाही, आणि पैसे उभे करुन काम करणे हे त्यांच्या मॅन्यूअलमध्ये नाही म्हणून पैसे उभे करण्यासाठी एमएसआरडीसीची स्थापना झाली. राज्याला व देशाला रोजगार हमी योजना देणारे वि.स. पागे यांचे चिरंजीव प्रकाश पागे यांना गडकरींनी यासाठी बोलावले. या दोघांनी मिळून बीओटी या संकल्पनेला जन्माला घातले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसी या दोन्हीसाठी एकच मंत्रीपद होते. विभागणी नंतर झाली. ५० कोटीच्या वरची कामे एमएसआरडीसीने करावीत असे गृहीत धरले होते तर ५० कोटीच्या आतली कामे देखील शासनाची मान्यता घेऊन एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत करावीत (२२ आॅक्टोबर १९९६) असे मान्य केले होते. पण पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी ओरडा केल्याने, पुन्हा ४ एप्रिल १९९८ रोजी नवीन आदेश जारी केला ज्यात एमएसआरडीसीकडे कोणती कामे सोपवावीत हे स्पष्ट केले गेले. त्यातही ज्या ठिकाणी टोल लावला जाणार आहे ती सगळी कामे एमएसआरडीसीने करावीत असे ठरले प्रत्यक्षात पीडब्लूडीने टोलनाके उभे केले आणि ज्यांनी टोलची अंमलबजावणी करायची त्यांचे दिवाळे निघाले.