शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

टोलवसुलीस पुन्हा तीन महिने स्थगिती

By admin | Updated: August 27, 2015 01:15 IST

मुंबईतील बैठकीत निर्णय : निकृष्ट कामांची होणार चौकशी; टोल हद्दपार केल्याचा चंद्रकांतदादांचा दावा

कोल्हापूर/मुंबई : शहरातील रस्ते विकास प्रकल्पासंबंधी राज्य सरकारने स्थापन केलेल्या संतोषकुमार समिती आणि प्रा. कृष्णराव समिती यांच्या अहवालांचा अभ्यास तामसेकर समिती करीत असून मूल्यांकन निश्चितीनंतर लवकरच नुकसान भरपाईबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. यासाठी साधारणपणे तीन महिने लागतील. त्यामुळे टोलवसुलीच्या स्थगितीला आणखीन तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम वगळून) व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.कोल्हापुरातील टोलच्या प्रश्नावर मुंबईत झालेल्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आदी उपस्थित होते. रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत काही समिती सदस्यांनी आक्षेप घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही या बैठकीत मंत्री शिंदे यांनी दिला. टोलप्रकरणी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांची उपसमिती नेमली होती. ही समिती तसेच आधीच्या सरकारने नेमलेली प्रा. कृष्णराव समिती यांच्या अहवालाचा अभ्यास करण्याचे काम सुरू आहे. या अभ्यासानंतर तामसेकर समिती मूल्यांकनाची रक्कम निश्चित करणार आहे. या समितीचे काम प्रगतिपथावर असून, तिचा अहवाल येताच राज्य सरकार त्यावर तातडीने निर्णय घेईल, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरचा टोल आता पुन्हा सुरू होण्याचा प्रश्नच नाही. कारण आमच्या सरकारने तो रद्दच केला आहे; परंतु हा निर्णय घेताना महापालिका, रस्ते विकास महामंडळाने केलेल्या कराराचे पालन करावे लागते. आयआरबी कंपनीने ८०० कोटी रुपयांचा दावा केला आहे. सरकारने जे पुनर्मूल्यांकन करून घेतले ते १९४ कोटींपर्यंत येते. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी कंपनीने जो अनुषंगिक खर्च केला आहे, तो ६० कोटी रुपये असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने सुचविले आहे. ती रक्कम व आणखी काही रक्कम विचारात घेतली तरी ही रक्कम ४०० कोटींच्या पुढे जात नाही. त्यामुळे फेरमूल्यांकनातून जी रक्कम निश्चित होईल त्यावर राज्य सरकार, महापालिका, रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनी यांच्यात एकमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते एकमत न झाल्यास व कंपनी न्यायालयात गेल्यास आमचा दावा टिकणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेताना शक्य तो सगळ््या दक्षता आम्ही घेत आहोत. आता जो भाग शिल्लक राहिला आहे, तो कंपनीला किती पैसे द्यायचे व ते कसे द्यायचे. महापालिकेला हा बोजा उचलणे शक्य नाही, त्यामुळे या पैशांची जबाबदारी राज्य सरकारच उचलेल; परंतु ती उचलताना पैसे कसे द्यायचे, याचेही नियोजन सरकारला करावे लागेल. या सर्वांसाठी काही कालावधी लागणार असल्यानेच तीन महिन्यांची मुदत आम्ही घेतली आहे; परंतु तीन महिन्यांनंतर पुन्हा टोल सुरू होईल का, अशी साशंकता लोकांनी बाळगण्याची गरज नाही. असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)