शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

सवंग लोकप्रियतेसाठी टोलमाफीचा निर्णय

By admin | Updated: April 12, 2015 01:33 IST

राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे.अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

नाशिक : राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे. त्यातून लोकांना काही फायदा होईल, असे दिसत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.परदेशात चांगले रस्ते असून त्यासाठी टोल आकारण्यात येतो. मात्र, टोल आकारायचा नाही आणि दुसरीकडे बांधकाम खात्याला रस्ते दुरुस्तीसाठी जादाचा निधीही द्यायचा नाही, असे कसे चालेल. वाहनांना टोलमाफी मिळाल्याने रस्ते खड्डेमय होतील, त्यामुळे वेळ आणि इंधन जादा लागेल. खराब रस्त्यांमुळे शारीरिक आजारही जडतील, असे त्यांनी सांगितले.सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक विदेशी दौरे करण्याचा विक्रम करणाऱ्या पंतप्रधानांनी परदेशात करार करताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवावेत. सध्याच्या सरकारचे शेतकरी आणि शेतीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नैसर्गिक आपत्तीसाठीच्या समितीचा मी गेल्या दहा वर्षांपासून अध्यक्ष होतो. मात्र सध्याच्या समितीच्या बैठकीत नुकसानभरपाईसाठी काही मदत देण्याचा निर्णय झाल्याचे मला अद्याप समजलेले नाही. येत्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारशी भांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील मुस्लीम समाज सर्व स्तरातील घटकांशी जुळवून घेत असून, पुरोगामी महाराष्ट्रात एमआयएम सारख्या पक्षांना थारा मिळणार नाही, असे पवार म्हणाले. चितळे समिती आणि अय्यंगार समितीच्या शिफारशीनुसार आधी दाखविण्यात आलेल्या पाण्याचे लाभक्षेत्र आताचे सरकार कमी दाखवित आहे. मात्र पाण्यावरील हक्क आम्ही अजिबात सोडणार नाही, अशी आग्रही भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. (प्रतिनिधी).च्महाराष्ट्र मराठी भाषिक राहण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्याच महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाची भाषा करणे चुकीचे आहे. शेवटी वेगळे राज्य करण्याचा निर्णय नेत्यांनी नव्हे, तर जनतेने घेतला पाहिजे. गोवा राज्य वेगळे करताना जनतेचे मतदान घेतले होते. च्गेल्या काही वर्षांचा विदर्भातील जनतेच्या निवडणुकांमधील कौल पाहता ते वेगळ्या विदर्भाच्या विरोधात असल्याचे आढळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देणार नाही. वेगळ्या विदर्भासाठी जनतेनेच निर्णय घ्यायचा असल्याचे पवार यांनी सांगितले.हेरगिरी नव्हे पंडित नेहरूंच्या काळात सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आताचे सरकार बोलत आहे. मात्र मी गृहमंत्री असताना माझ्यावरही पाळत ठेवण्यात येत होती. सार्वजनिक जीवनातील व्यक्ती व कुटुंबीयांच्या हितासाठी व संरक्षणासाठीच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येते. त्यात काहीही गैर नाही, असे काही नाही. त्यामुळे ही हेरगिरी नव्हे जबाबदारी असल्याचे पवारांनी सांगितले