चंद्रकांत शेळके - अहमदनगर
एसटी महामंडळाच्या बसला यापुढे राज्यात कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्यानंतर राज्यभरातील आगारांत उत्साहाचे वातावरण पसरले. या निर्णयामुळे राज्यभरात एसटी महामंडळाचा सुमारे 1क्क् कोटींहून अधिक टोल वाचणार असल्याने एसटीला मोठा दिलासा मिळेल.
‘कायम तोटय़ात’ अशी कायमचीच बोंब असणा:या एसटीला निदान या निर्णयामुळे काही दिवस तरी आनंदाचे ठरतील. दरवर्षी एसटी राज्यभरातील सर्व टोलनाक्यांवर सरासरी 1क्क् ते 125 कोटींची रक्कम भरते. त्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या एसटीला हा अतिरिक्त भार पडत होता.
परंतु शासनाने राज्यभरातील 166 पैकी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा एकूण 126 टोलनाक्यांवर एसटीला टोलमुक्तीची घोषणा केल्याने एसटीच्या नफ्यात भर पडणार आहे. केंद्रीय प्राधिकरणाच्या राज्यात असणा:या 4क् टोलनाक्यांबाबत अजून निर्णय झालेला नाही. परंतु तेथेही एसटीला टोलमाफी मिळण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे.
मागील वर्षी टोलपोटी एसटी महामंडळाला 132 कोटी रूपये खर्च करावे लागले होते. राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरून एसटीची वाहतूक कमी
असल्याने आता टोल भरण्याची रक्कम खूपच कमी असणार आहे. त्यामुळे एसटीला वार्षिक सरासरी 1क्क् कोटींचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
च्नगर जिलत असलेल्या टोलनाक्यांपोटी नगर विभागीय कार्यालयाला दरमहा 35 ते 4क् लाखांची रक्कम भरावी लागते.
च्परंतु टोलमाफीच्या या निर्णयामुळे नगर विभागाचे आता वार्षिक सरासरी सव्वाचार कोटी वाचणार आहेत.
च्टोलमाफीच्या निर्णयामुळे भविष्यात आता बराच काळ भाववाढीपासून प्रवाशांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने टोलमाफी केल्याची घोषणा केली आहे. परंतु अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्याची माहितीही आमची यंत्रणा घेत आहे. मागील वर्षी टोलपोटी एसटीने 132 कोटी रूपये भरले होते. राज्यमार्गावर जरी टोलमाफी मिळाली तरी साधारण 1क्क् कोटींचा फायदा होऊ शकतो, असे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोर म्हणाले.