शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल सुसाट, प्रवाशांची कोंडी

By admin | Updated: April 1, 2017 09:06 IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये तब्बल 35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, म्हणजेच सध्या 195 रुपये असणारा टोल 230 रुपये झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागला असून प्रवशांची कोंडी होऊ लागली आहे. एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये तब्बल 35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच सध्या 195 रुपये असणारा टोल 230 रुपये झाला आहे. तब्बल 18 टक्क्यांची ही टोलवाढ असून 1 एप्रिल म्हणजेच आजपासून ही नव्या दराने टोलवसुली सुरु झाली आहे. एक्स्प्रेस वेवरुन नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या टोलवाढीला तीव्र विरोध केला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत टोलवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता अधिकचे 35 रुपये द्यावे लागणार आहेत. 
(मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर महागणार टोल)
 
दर तीन वर्षांनी टोल वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती. त्यानुसार ही टोलवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गावरुन दररोज मोठया प्रमाणावर वाहनांची ये-जा असते. 
 
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या टोलवाढीला तीव्र विरोध केला होता. कारण राज्य सरकार आणि बांधकाम कंपनीने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या बांधणीसाठी केलेला सर्व खर्च वसुल झाला आहे. दोघांनी बक्कळ नफा कमावला आहे. मग टोलवसुली कशासाठी ? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 
 
 पुण्यातील विवेक वेलणकर, संजय शिरोडकर यांच्यासह चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक्स्प्रेस वेवरील आतापर्यंत वसूल केलेल्या रकमेची माहिती मागवली होती. मिळालेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वे तयार करण्यासाठी आलेला खर्च अगोदरच वसूल झाला आहे. रकमेपेक्षाही अधिकचा नफा कंपनी आणि राज्य सरकारला झाला आहे, असं माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
 
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकामाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शिवाय कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता.