शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

फक्त ‘एमएच०९’ला जूनपासून टोलमुक्ती

By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST

अधिसूचना काढणार : चंद्रकांतदादांची माहिती; कृती समितीची आज बैठक

कोल्हापूर : शहरातील सर्व टोलनाके बंद करणे हेच राज्य सरकारचे धोरण आहे; परंतु कायदेशीर गोष्टींचा विचार करता त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे म्हणूनच या धोरणाचाच भाग म्हणून आम्ही १ जून पासून ‘एमएच ०९’ ही वाहने टोलमधून वगळणार आहोत. तशी अधिसूचनाही काढण्यात येणार आहे. मात्र, सरकार आपल्या ‘शब्दा’पासून मागे हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलताना दिली.दरम्यान, सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर यापुढे आपण कोणती भूमिका घ्यावी हे निश्चित करण्यासाठी कृती समितीची बैठक आज, मंगळवारी सायंकाळी होत आहे. पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी दुपारी टोलविरोधी कृती समितीच्या काही निवडक कार्यकर्त्यांशी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि सरकारची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. यावेळी प्रा. पाटील यांच्यासह निवासराव साळोखे, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण,भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, लालासाहेब गायकवाड, रमेश मोरे, अजित सासने, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी सरकारची भूमिका मांडताना सांगितले की, ‘कोल्हापूरला टोलमुक्त करणे हेच सरकारचे धोरण आहे. मात्र, अद्याप रस्त्यांचे मूल्यांकन झालेले नाही. आयआरबीला किती रक्कम द्यायची हे ठरलेले नाही. मूल्यांकन झाले तरी त्यावर एकमत होणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी शेवटी लवादासमोर जाणार आहेत. म्हणूनच या सर्वांतून मार्ग निघायला आणखी सात-आठ महिन्यांचा कालावधी जाणार आहे म्हणूनच १ जूनपासून सरकार रीतसर अधिसूचना काढून कोल्हापूरच्या वाहनांना (एमएच ०९) टोलमधून वगळणार आहोत. कोल्हापूरची वाहने वगळल्यामुळे राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला दोन-अडीच कोटी रुपये आयआरबी कंपनीला द्यावे लागतील. ही रक्कम संपूर्ण टोलमाफीपर्यंत सरकार देईल. ज्यावेळी एक विशिष्ट रक्कम देऊन आयआरबीला नारळ दिला जाईल त्यावेळी राज्य सरकार ती रक्कम महापालिकेला कर्जरूपाने देईल.’कोल्हापूरच्या वाहनांना टोलमधून वगळल्यानंतर सरकार अंग काढून घेणार नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जी रक्कम निश्चित होईल, ती देण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे, सरकार मागे हटणार नाही. आम्ही जे आश्वासन दिले आहे ते पाळू, अशी नि:संदिग्ध ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. आज कृती समितीची बैठक आज, मंगळवारी दुपारी साडेचार वाजता विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.कोल्हापुरातील टोलसंदर्भात सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी डावीकडून रमेश मोरे, निवासराव साळोखे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, लालासाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते...तर आंदोलनाला डाग लागेल राज्य सरकार आयआरबीची रक्कम भागविणार असल्याने १ जूनपासूनच टोलवसुलीला स्थगिती द्या, अशी विनंती कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केली; परंतु तसे कायद्याने आपणास करता येणार नसल्याचा खुलासा पालकमंत्र्यांनी केला. केवळ कोल्हापूरच्या वाहनांसाठी आम्ही आंदोलन सुरू केलेले नाही; तर आम्हाला संपूर्ण टोलमाफी हवी आहे आणि आता जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलन थांबविले तर आमच्यावरील जनतेचा विश्वास उडेल, आंदोलनाला डाग लागेल, अशी भीतीही साळोखे यांनी व्यक्त केली. तेव्हा सर्वपक्षीय कृती समितीची बैठक बोलावून त्यांच्यासमोर सरकारची भूमिका सांगावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.अन्य वाहनांचे काय..?कोल्हापूर पासिंगच्या (एमएच-०९) वाहनांशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातीलच नागरिक परंतु इतर जिल्ह्यांतील पासिंगची वाहने वापरणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांना रोज नाक्यावर वाद घालत बसावे लागेल. आताही तसा वाद घालावा लागतो. यासाठी कोल्हापूरचा रहिवासी असलेला परंतु कोणत्याही पासिंगची गाडी असल्यास त्याला रहिवासी दाखला देऊन टोलमधून सवलत देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.