शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

फक्त ‘एमएच०९’ला जूनपासून टोलमुक्ती

By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST

अधिसूचना काढणार : चंद्रकांतदादांची माहिती; कृती समितीची आज बैठक

कोल्हापूर : शहरातील सर्व टोलनाके बंद करणे हेच राज्य सरकारचे धोरण आहे; परंतु कायदेशीर गोष्टींचा विचार करता त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे म्हणूनच या धोरणाचाच भाग म्हणून आम्ही १ जून पासून ‘एमएच ०९’ ही वाहने टोलमधून वगळणार आहोत. तशी अधिसूचनाही काढण्यात येणार आहे. मात्र, सरकार आपल्या ‘शब्दा’पासून मागे हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलताना दिली.दरम्यान, सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर यापुढे आपण कोणती भूमिका घ्यावी हे निश्चित करण्यासाठी कृती समितीची बैठक आज, मंगळवारी सायंकाळी होत आहे. पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी दुपारी टोलविरोधी कृती समितीच्या काही निवडक कार्यकर्त्यांशी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि सरकारची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. यावेळी प्रा. पाटील यांच्यासह निवासराव साळोखे, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण,भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, लालासाहेब गायकवाड, रमेश मोरे, अजित सासने, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी सरकारची भूमिका मांडताना सांगितले की, ‘कोल्हापूरला टोलमुक्त करणे हेच सरकारचे धोरण आहे. मात्र, अद्याप रस्त्यांचे मूल्यांकन झालेले नाही. आयआरबीला किती रक्कम द्यायची हे ठरलेले नाही. मूल्यांकन झाले तरी त्यावर एकमत होणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी शेवटी लवादासमोर जाणार आहेत. म्हणूनच या सर्वांतून मार्ग निघायला आणखी सात-आठ महिन्यांचा कालावधी जाणार आहे म्हणूनच १ जूनपासून सरकार रीतसर अधिसूचना काढून कोल्हापूरच्या वाहनांना (एमएच ०९) टोलमधून वगळणार आहोत. कोल्हापूरची वाहने वगळल्यामुळे राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला दोन-अडीच कोटी रुपये आयआरबी कंपनीला द्यावे लागतील. ही रक्कम संपूर्ण टोलमाफीपर्यंत सरकार देईल. ज्यावेळी एक विशिष्ट रक्कम देऊन आयआरबीला नारळ दिला जाईल त्यावेळी राज्य सरकार ती रक्कम महापालिकेला कर्जरूपाने देईल.’कोल्हापूरच्या वाहनांना टोलमधून वगळल्यानंतर सरकार अंग काढून घेणार नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जी रक्कम निश्चित होईल, ती देण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे, सरकार मागे हटणार नाही. आम्ही जे आश्वासन दिले आहे ते पाळू, अशी नि:संदिग्ध ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. आज कृती समितीची बैठक आज, मंगळवारी दुपारी साडेचार वाजता विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.कोल्हापुरातील टोलसंदर्भात सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी डावीकडून रमेश मोरे, निवासराव साळोखे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, लालासाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते...तर आंदोलनाला डाग लागेल राज्य सरकार आयआरबीची रक्कम भागविणार असल्याने १ जूनपासूनच टोलवसुलीला स्थगिती द्या, अशी विनंती कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केली; परंतु तसे कायद्याने आपणास करता येणार नसल्याचा खुलासा पालकमंत्र्यांनी केला. केवळ कोल्हापूरच्या वाहनांसाठी आम्ही आंदोलन सुरू केलेले नाही; तर आम्हाला संपूर्ण टोलमाफी हवी आहे आणि आता जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलन थांबविले तर आमच्यावरील जनतेचा विश्वास उडेल, आंदोलनाला डाग लागेल, अशी भीतीही साळोखे यांनी व्यक्त केली. तेव्हा सर्वपक्षीय कृती समितीची बैठक बोलावून त्यांच्यासमोर सरकारची भूमिका सांगावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.अन्य वाहनांचे काय..?कोल्हापूर पासिंगच्या (एमएच-०९) वाहनांशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातीलच नागरिक परंतु इतर जिल्ह्यांतील पासिंगची वाहने वापरणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांना रोज नाक्यावर वाद घालत बसावे लागेल. आताही तसा वाद घालावा लागतो. यासाठी कोल्हापूरचा रहिवासी असलेला परंतु कोणत्याही पासिंगची गाडी असल्यास त्याला रहिवासी दाखला देऊन टोलमधून सवलत देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.