शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

टोलप्रश्नी राज ठाकरे नाराजच

By admin | Updated: June 10, 2014 23:57 IST

राज्यातील टोलवसुली विरोधात आंदोलन छेडणारे मनसेचे राज ठाकरे यांनी ४४ टोलनाके बंद केल्यानंतरही नाराजी व्यक्त केली

नाशिक : राज्यातील टोलवसुली विरोधात आंदोलन छेडणारे मनसेचे राज ठाकरे यांनी ४४ टोलनाके बंद केल्यानंतरही नाराजी व्यक्त केली असून, यापूर्वी बंद करण्यात आलेले ६५ टोलनाके कोणते होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. जोपर्यंत आघाडी शासन टोलविषयी पारदर्शक धोरण जाहीर करीत नाही तोपर्यंत टोलचा प्रश्न सुटलेला नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले, की गेल्या दीड वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांशी टोलप्रश्नी तीन वेळा भेट घेतले. आघाडी शासनाने टोल धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पूर्वी ६५ आणि आता ४४ टोलनाके बंद केल्याचे सरकार जाहीर करीत असेल, तर राज्यात किती टोलनाके आहेत याची माहिती नको द्यायला? केंद्राच्या धोरणानुसार ८० किलोमीटरच्या आत टोलनाका नसावा. असे असताना राज्य शासनाने ३०-४० किलोमीटरच्या आत टोलनाके आणलेत. त्यामुळे अनेकांचा १० किलोमीटरच्या आत दोन वेळा टोल भरावा लागतो. जिथे पैशांचा व्यवहार येतो तिथे पारदर्शकता असायला हवी, ती नाही. कठोर कारवाईिशवाय वचक बसणार नाहीकॅम्पा कोलासारख्या असंख्य इमारती मंुबई-ठाण्यात अन् राज्यात आहेत. अशा इमारती उभारणारे बिल्डर्स, त्यांना परवानगी देणारे पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तत्कालीन नगरसेवक दोषी असताना, केवळ रहिवाशांना दोषी ठरवून त्यांना बेघर करणे साफ चुकीचे आहे. नियम, कायदा सर्वांसाठी सारखा असून, शासन जोपर्यंत कठोर कारवाई करीत नाही तोपर्यंत अशी अनधिकृत कामे करणार्‍यांवर वचक बसणार नाही. परंतु आदर्श प्रकरण आपण पाहतो आहोतच. दोषी अधिकार्‍यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. - राज ठाकरे