शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद

By admin | Updated: November 9, 2016 19:47 IST

राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा, यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याची घोषणा मंगळवारी (दि.8) केल्यानंतर सर्वत्र नागरिकांनी एकच तारांबळ उडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारने टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य वाहनचालकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व टोलनाक्यांवर टोल आकारणी करण्यात येणार नसल्याचे सांगितले. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा. यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल आकारणी न करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्र्यांनी केली असून एमएसआरडीसीच्या टोल कंत्राटदारांना त्याबाबतचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.