शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद

By admin | Updated: November 9, 2016 19:47 IST

राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा, यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याची घोषणा मंगळवारी (दि.8) केल्यानंतर सर्वत्र नागरिकांनी एकच तारांबळ उडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारने टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य वाहनचालकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व टोलनाक्यांवर टोल आकारणी करण्यात येणार नसल्याचे सांगितले. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा. यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल आकारणी न करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्र्यांनी केली असून एमएसआरडीसीच्या टोल कंत्राटदारांना त्याबाबतचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.