शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

गोवा प्रवेशद्वारावरील टोलनाके बंद होणार

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

मनोहर पर्रीकर यांचा दुजोरा : विधानसभा अधिवेशनात निर्णय होणार

अनंत जाधव - सावंतवाडी -गोवा सरकारने मोठा गाजावाजा करत गोवा राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच टोल वसुली सुरू केली होती. ती टोल वसुली आता लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती गोव्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. याला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सावंतवाडीत आले असता दुजोराही दिला आहे. गोव्याच्या विधानसभा अधिवेशनात हा निर्णय होणार आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक पर्यटक टोल दिल्याशिवाय गोव्यात प्रवेश करु शकणार आहेत.गोव्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी गोव्याची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या. त्यात गोव्याच्या प्रवेशद्वारांवर चारचाकी वाहनांना टोल आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातून गोव्याकडे जाताना धारगळ येथे टोलनाका उभारला होता. तर कारवार तसेच अन्य भागातून येण्यासाठी काणकोणनजीक टोलनाका उभारण्यात आला होता. या टोलमधून सिंधुदुर्गला वगळण्यात आले होते. असे असले तरी उर्वरित महाराष्ट्रातील पर्यटकांना गोव्यात पर्यटनासाठी जाताना हा मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. तसेच सिंधुदुर्गवासियांकडील बाहेरच्या पासिंगच्या गाड्या असणाऱ्यांनाही टोल भरुनच गोव्यात जावे लागत असे. त्यातच गोव्याला जाणारे कंटेनर तसेच अन्य गाड्या यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात हा दंड वसूल करण्यात येत होता. याची कारणेही अनेक होती. टोलवरून गोवा सरकार सर्वांच्या टीकेचे धनी झाले होते. मात्र, तरीही हा टोल सुरू ठेवण्यात आला होता.मात्र, आता केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील भाजप सरकारला ऊर्जितावस्था आली आहे. अनेक मायनिंगसारखे उद्योग पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गोवा सरकारला झालेली वित्तीय तूट येत्या काळात तरी भरून निघेल, अशी आशा वाटल्याने आता टोलनाके बंद करण्याचा धाडसी निर्णय घेण्याच्या विचारात गोवा सरकार आहे.याला गोव्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. तर मध्यंतरी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सावंतवाडीत आले असता त्यांनीही टोल नाके बंद करण्याच्या विचारात गोवा सरकार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच येत्या अधिवेशनात याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे हे टोल नाके बंद झाले तर अनेकांना गोव्यात पुन्हा पूर्वीसारखेच टोल भरणा केल्याशिवाय जाता येणार आहे आणि यामुळे याचा जास्त फायदा हा महाराष्ट्रातील वाहनांना होणार आहे.