शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गोवा प्रवेशद्वारावरील टोलनाके बंद होणार

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

मनोहर पर्रीकर यांचा दुजोरा : विधानसभा अधिवेशनात निर्णय होणार

अनंत जाधव - सावंतवाडी -गोवा सरकारने मोठा गाजावाजा करत गोवा राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच टोल वसुली सुरू केली होती. ती टोल वसुली आता लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती गोव्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. याला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सावंतवाडीत आले असता दुजोराही दिला आहे. गोव्याच्या विधानसभा अधिवेशनात हा निर्णय होणार आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक पर्यटक टोल दिल्याशिवाय गोव्यात प्रवेश करु शकणार आहेत.गोव्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी गोव्याची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या. त्यात गोव्याच्या प्रवेशद्वारांवर चारचाकी वाहनांना टोल आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातून गोव्याकडे जाताना धारगळ येथे टोलनाका उभारला होता. तर कारवार तसेच अन्य भागातून येण्यासाठी काणकोणनजीक टोलनाका उभारण्यात आला होता. या टोलमधून सिंधुदुर्गला वगळण्यात आले होते. असे असले तरी उर्वरित महाराष्ट्रातील पर्यटकांना गोव्यात पर्यटनासाठी जाताना हा मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. तसेच सिंधुदुर्गवासियांकडील बाहेरच्या पासिंगच्या गाड्या असणाऱ्यांनाही टोल भरुनच गोव्यात जावे लागत असे. त्यातच गोव्याला जाणारे कंटेनर तसेच अन्य गाड्या यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात हा दंड वसूल करण्यात येत होता. याची कारणेही अनेक होती. टोलवरून गोवा सरकार सर्वांच्या टीकेचे धनी झाले होते. मात्र, तरीही हा टोल सुरू ठेवण्यात आला होता.मात्र, आता केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील भाजप सरकारला ऊर्जितावस्था आली आहे. अनेक मायनिंगसारखे उद्योग पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गोवा सरकारला झालेली वित्तीय तूट येत्या काळात तरी भरून निघेल, अशी आशा वाटल्याने आता टोलनाके बंद करण्याचा धाडसी निर्णय घेण्याच्या विचारात गोवा सरकार आहे.याला गोव्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. तर मध्यंतरी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सावंतवाडीत आले असता त्यांनीही टोल नाके बंद करण्याच्या विचारात गोवा सरकार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच येत्या अधिवेशनात याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे हे टोल नाके बंद झाले तर अनेकांना गोव्यात पुन्हा पूर्वीसारखेच टोल भरणा केल्याशिवाय जाता येणार आहे आणि यामुळे याचा जास्त फायदा हा महाराष्ट्रातील वाहनांना होणार आहे.