शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची आज सत्त्वपरीक्षा-- साताºयात शेतकरी मेळावा-आगामी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:59 IST

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत यांना घराबाहेर काढल्यानंतर मूळच्या स्वाभिमानीत कोण राहिलयं, खोत यांच्यासोबत कोण निघून गेलयं, याची खबरबात

ठळक मुद्दे : मूळच्या स्वाभिमानीत निष्ठावान कोण ते समजणारराज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमुक्ती--कृषी पंपांची वीज बिले माफ करावीत उसाच्या हप्त्याचा भिजत पडलेला प्रश्न दुष्काळी निधीच्या वाटपासाठी आग्रह--बैलगाडी शर्यतसाठी पाठपुरावा६० वर्षांवरील शेतकºयांना पेन्शनस्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी सरकारवर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत यांना घराबाहेर काढल्यानंतर मूळच्या स्वाभिमानीत कोण राहिलयं, खोत यांच्यासोबत कोण निघून गेलयं, याची खबरबात शुक्रवारी साताºयात होणाºया शेतकरी मेळाव्यातच लागणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना मानणाºया कार्यकर्त्यांची आज परीक्षा पाहायला मिळेल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांच्यावतीने साताºयातील वाढे फाटा येथील एका कार्यालयात शुक्रवार, दि. ९ रोजी दुपारी एक वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. सरकार स्थापनेवेळी असलेली भूमिका आणि सरकारमधून बाहेर पडल्यानंतरची भूमिका याबाबत खासदार शेट्टी या मेळाव्यात सविस्तर विवेचन करण्याची शक्यता आहे. किंबहुना त्याची उत्सुकता जिल्ह्यातील शेतकºयांनाही आहे.

खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांना मानणारी मंडळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. खोत हे सरकारमध्ये सामील असल्याने त्यांच्यावर विसंबून असलेली मंडळी सध्या द्विधा अवस्थेत आहेत. खोत यांच्यासोबत जावे तर खासदार राजू शेट्टींची नाराजी ओढवेल आणि खासदार शेट्टींसोबत राहावे तर सरकारच्या माध्यमातून मिळणारे लाभ बंद होतील, अशा द्विधावस्थेत काहीजण आहेत. स्वाभिमानीत ज्या पद्धतीने मंत्री खोत यांना शेतकºयांचा पाठिंबा मिळाला, तसाच आता स्वतंत्र संघटना स्थापन केल्यानंतर मिळेल का?, असा अंदाज बांधण्याचे काम काही मंडळी करीत आहेत.

खासदार राजू शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे मोठे धाडस केले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे सदाभाऊ खोत आता त्यांच्यासोबत नाहीत. साहजिकच खोत यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न खासदार शेट्टींकडून सुरू आहेत. विदर्भ, मराठवाड्यात रविकांत तूपकर यांच्या रूपाने शेट्टींच्या गोटात लढवय्या मावळा असला तरी पश्चिम महाराष्ट्रात अद्याप नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. ती भरून काढण्याचा शोध खासदार शेट्टी या मेळाव्यात घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खासदार शेट्टींची सभा आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहायला मिळत आले आहे. आता साताºयातील मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष अर्जुन साळुंखे, देवानंद पाटील, राजू शेळके, अलिभाई इनामदार, ज्ञानदेव कदम, जीवन शिर्के, युवा आघाडीचे धनंजय महामूलकर, नितीन यादव, सूर्यकांत भुजबळ या मंडळींनी जोरदार तयारी केली होती. या तयारीची फलनिष्पत्ती शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येणार आहे. या मेळाव्याला गर्दी जमली तर मूळच्या ‘स्वाभिमानी’च्या प्रवाहाचे मोजमाप करता येणार आहे.

कर्जमाफीच्या आंदोलनानंतर खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. दोघांनीही एकमेकांवर चांगलेच तोंडसूख घेतले होते. साताºयात होणाºया मेळाव्यातही खोत यांच्यावर टीका टिप्पणी होणार, हे जरी ठरलेले असले तरी खोत यांना बाजूला करण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न मेळाव्याला जमलेल्या शेतकºयांमधून होणार आहे.खोत यांच्या मसुदा समितीत भगतमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकल्यानंतर नवीन संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यासाठी १६ कार्यकर्त्यांची मसुदा समिती स्थापन केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी संजय भगत यांची नियुक्ती केली आहे. १५ सप्टेंबर रोजी पुण्याला मसुदा समिती बैठक होणार आहे. २० तारखेपर्यंत संघटनेचा मसुदा अंतिम करण्यात येणार असून, २१ तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापुरात मंत्री सदाभाऊ खोत नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत.