शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची आज सत्त्वपरीक्षा-- साताºयात शेतकरी मेळावा-आगामी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:59 IST

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत यांना घराबाहेर काढल्यानंतर मूळच्या स्वाभिमानीत कोण राहिलयं, खोत यांच्यासोबत कोण निघून गेलयं, याची खबरबात

ठळक मुद्दे : मूळच्या स्वाभिमानीत निष्ठावान कोण ते समजणारराज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमुक्ती--कृषी पंपांची वीज बिले माफ करावीत उसाच्या हप्त्याचा भिजत पडलेला प्रश्न दुष्काळी निधीच्या वाटपासाठी आग्रह--बैलगाडी शर्यतसाठी पाठपुरावा६० वर्षांवरील शेतकºयांना पेन्शनस्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी सरकारवर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत यांना घराबाहेर काढल्यानंतर मूळच्या स्वाभिमानीत कोण राहिलयं, खोत यांच्यासोबत कोण निघून गेलयं, याची खबरबात शुक्रवारी साताºयात होणाºया शेतकरी मेळाव्यातच लागणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना मानणाºया कार्यकर्त्यांची आज परीक्षा पाहायला मिळेल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांच्यावतीने साताºयातील वाढे फाटा येथील एका कार्यालयात शुक्रवार, दि. ९ रोजी दुपारी एक वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. सरकार स्थापनेवेळी असलेली भूमिका आणि सरकारमधून बाहेर पडल्यानंतरची भूमिका याबाबत खासदार शेट्टी या मेळाव्यात सविस्तर विवेचन करण्याची शक्यता आहे. किंबहुना त्याची उत्सुकता जिल्ह्यातील शेतकºयांनाही आहे.

खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांना मानणारी मंडळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. खोत हे सरकारमध्ये सामील असल्याने त्यांच्यावर विसंबून असलेली मंडळी सध्या द्विधा अवस्थेत आहेत. खोत यांच्यासोबत जावे तर खासदार राजू शेट्टींची नाराजी ओढवेल आणि खासदार शेट्टींसोबत राहावे तर सरकारच्या माध्यमातून मिळणारे लाभ बंद होतील, अशा द्विधावस्थेत काहीजण आहेत. स्वाभिमानीत ज्या पद्धतीने मंत्री खोत यांना शेतकºयांचा पाठिंबा मिळाला, तसाच आता स्वतंत्र संघटना स्थापन केल्यानंतर मिळेल का?, असा अंदाज बांधण्याचे काम काही मंडळी करीत आहेत.

खासदार राजू शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे मोठे धाडस केले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे सदाभाऊ खोत आता त्यांच्यासोबत नाहीत. साहजिकच खोत यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न खासदार शेट्टींकडून सुरू आहेत. विदर्भ, मराठवाड्यात रविकांत तूपकर यांच्या रूपाने शेट्टींच्या गोटात लढवय्या मावळा असला तरी पश्चिम महाराष्ट्रात अद्याप नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. ती भरून काढण्याचा शोध खासदार शेट्टी या मेळाव्यात घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खासदार शेट्टींची सभा आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहायला मिळत आले आहे. आता साताºयातील मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष अर्जुन साळुंखे, देवानंद पाटील, राजू शेळके, अलिभाई इनामदार, ज्ञानदेव कदम, जीवन शिर्के, युवा आघाडीचे धनंजय महामूलकर, नितीन यादव, सूर्यकांत भुजबळ या मंडळींनी जोरदार तयारी केली होती. या तयारीची फलनिष्पत्ती शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येणार आहे. या मेळाव्याला गर्दी जमली तर मूळच्या ‘स्वाभिमानी’च्या प्रवाहाचे मोजमाप करता येणार आहे.

कर्जमाफीच्या आंदोलनानंतर खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. दोघांनीही एकमेकांवर चांगलेच तोंडसूख घेतले होते. साताºयात होणाºया मेळाव्यातही खोत यांच्यावर टीका टिप्पणी होणार, हे जरी ठरलेले असले तरी खोत यांना बाजूला करण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न मेळाव्याला जमलेल्या शेतकºयांमधून होणार आहे.खोत यांच्या मसुदा समितीत भगतमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकल्यानंतर नवीन संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यासाठी १६ कार्यकर्त्यांची मसुदा समिती स्थापन केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी संजय भगत यांची नियुक्ती केली आहे. १५ सप्टेंबर रोजी पुण्याला मसुदा समिती बैठक होणार आहे. २० तारखेपर्यंत संघटनेचा मसुदा अंतिम करण्यात येणार असून, २१ तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापुरात मंत्री सदाभाऊ खोत नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत.