शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

आजकालच्या नेत्यांची लायकी नाही

By admin | Updated: July 5, 2015 03:25 IST

देशात आता असे राजकारणी नाहीत की पुढील ५० वर्षांनंतरच्या इतिहासात त्यांचे नाव घ्यावेसे वाटेल. तेवढी आजकालच्या नेत्यांची लायकीदेखील नाही, असा टोला शिवसेना

मुंबई : देशात आता असे राजकारणी नाहीत की पुढील ५० वर्षांनंतरच्या इतिहासात त्यांचे नाव घ्यावेसे वाटेल. तेवढी आजकालच्या नेत्यांची लायकीदेखील नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कुणाचाही थेट नामोल्लेख न करता लगावला आहे. दादर येथील बालमोहन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शाळेतील ८वीच्या ४०० विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टॅबचे मोफत वाटप करण्यात आले. उद्धव हे बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. यावेळी समोर लावलेल्या स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या तसबिरींकडे अंगुलीनिर्देश करीत उद्धव म्हणाले की, माझ्यासमोर बसलेल्या या विद्यार्थ्यांना पुढील ५० वर्षांनंतर नाव घ्यावेसे वाटेल असा राजकारणी नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले पाहिजे. न्यायालयाने तसे निष्कर्ष नोंदवले आहेत. हे ओझे कोण कमी करणार, याची वाट न पाहता मी सुरुवात केली आहे. या वेळी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते. ‘नवनीत’चे अमित गाला यांनी टॅब कसा हाताळावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग आणि पालकांनीही उपस्थिती दर्शवली होती. (विशेष प्रतिनिधी)