शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

टोेल आंदोलनासंदर्भात आज निर्णय

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

कृती समितीची बैठक : कोल्हापूरच्या अस्मितेशी कदापिही दगा-फटका करणार नाही : एन. डी. पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवण्यासंदर्भात बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे. रुईकर कॉलनी येथे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तासाहून अधिक काळ सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची ही बैठक चालली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. पाटील यांनी ही भूमिका मांडली.प्रा.डॉ. पाटील म्हणाले, टोलविरोधी कृती समितीने आपली भूमिका सोडलेली नाही. आमच्या प्रश्नावर आम्ही ठाम आहोत. कोल्हापूरच्या अस्मितेशी आम्ही कदापिही दगा-फटका करणार नाही. आजच्या बैठकीत उपस्थितांची मते जाणून घेतली. अजून काही बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांची मते जाणून घेता आलेली नाहीत. त्यांचीही मते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समितीशी सरकारतर्फे अथवा सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कोणी संपर्क साधला आहे का? या प्रश्नावर यासंदर्भात कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर कोणता होता? याबाबत विचारणा असता ते म्हणाले, लढा तीव्र करूया, असा बहुतांश जणांचा सूर आहे, परंतु सर्वांचे ऐकून घेतल्याशिवाय लगेच निर्णय घेणे योग्य नाही.बैठकीला शिवसेना-भाजपचे पदाधिकारी होते काय, अशी विचारणा केल्यावर निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित नसल्याचे सांगितले. बैठकीला प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, दिलीप पवार, अशोक पोवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अजित सासने, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)