शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

आज शहनाईचा बादशाह भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांची पुण्यतिथी

By admin | Updated: August 21, 2016 09:49 IST

आपल्याला बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून मंगल प्रभातमध्ये ऐकायला येतो.

 - संजीव वेलणकर 

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ : आज शहनाईचा बादशाह भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांची पुण्यतिथीजन्म :- २१ मार्च १९१६ आपल्याला बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून मंगल प्रभातमध्ये ऐकायला येतो. अजूनही मंगल कार्यात शहनाई वाजवणारे मिळाले नाहीत तर खानसाहेबांच्या वादनाची सीडी मिळवून वाजवली जाते. बज गई शहनाई, शादी अब होनेवाली है, असा संदेशा पोचविणा-या  शहनाईला बिसमिल्ला खाँ यांनी पारंपारिक शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या मखमली गालीचावर नेऊन बसविले. १९३६-३७ सालच्या सुमारास बनारस येथे स्टार हिंदुस्थानलेबलवर त्यांनी पहिली ध्वनिमुद्रण केली ती सगळी रागदारीची होती.

बिहाग, भैरवी, तोडी, दुर्गा, बागेश्री व जोनपुरी असे राग असून लेबलवर विलायतू बिस्मिल्ला ऑफ बनारस असं लिहिलं आहे. १९४१ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं लखनौ येथे तीन ध्वनिमुद्रिका केल्या, त्यात तोडी व मालकंस राग तसेच ठुमरी व दादरा हे सुगम संगीताचे प्रकार आहेत. लेबलवर ह्यबिस्मिल्लाह अ‍ॅसण्ड पार्टी असं छापलं असून त्यावर सनई गत असं लिहिलं आहे. ध्वनिमुद्रिकाप्रेमींच्या घरातून व सार्वजनिक उत्सव समारंभातून त्या रेकॉर्ड्स वाजवल्या जाऊ लागल्या. गुरूंचा रोष पत्करूनही सुगम संगीताच्या तीन मिनिटं वाजणाऱ्या रेकॉर्ड्स ते देतच राहिले. त्यांची लोकप्रियता पाहून जून १९५१ च्या दिल्लीतल्या ध्वनिमुद्रण सत्रात बाबुल सिनेमातील दोन गाणी त्यांनी रेकॉर्ड केली- छोडम् बाबुलका घर व पंछी बनमे पिया पिया गाने लगा.

१९५७ पर्यंत रागदारी व सुगम संगीताच्या बरोबरीने जीवन ज्योती, आवारा, व बसंत बहार सिनेमातली गाणी त्यांनी वाजवली. १९५९ च्या प्रकाश पिक्चर्सच्या गूँज उठी शहनाई या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं. या बोलपटातील गाणी इतकी गाजली की ह्यदिलका खिलौना हाये टूट गया व जीवनमें पिया तेरा साथ रहे ही गाणी सनईवर वाजवून त्यांनी रेकॉर्डस केल्या. त्यात एकल वादन तर आहेच, पण उस्ताद अमीर खान साहेब यांच्या गायनाबरोबर जुगलबंदी व उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्या सतार वादनाबरोबरची जुगलबंदीही आहे. तसेच मा. व्ही.जी जोग जुगलबंदीही लोक अजून मेजवानी म्हणून ऐकतात.

यांच्या बरोबरची पुढच्या काळात सतार, बासरी, सरोद जुगलबंदीची ही जणू मेजवानी होती. हिंदी चित्रपटसृष्टीतही शहनाईला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले. सनई हे भारतीय सुशिर वाद्य जगप्रसिद्ध करण्यात सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांची महत्त्वाची भूमिका आहे. २००१ साली बिस्मिल्ला खान यांना सर्वोच्च असा ह्यभारतरत्नह्ण पुरस्कार बहाल करण्यात आला. मा. बिस्मिल्ला खान यांचे २१ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मा. बिस्मिल्ला खान यांना आदरांजली