शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

आज महिलांचा ‘अंमल’!

By admin | Updated: March 8, 2016 03:12 IST

राज्य पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम ८ टक्क्यांपर्यंत असलेतरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अंमलदारांची धुरा त्यांच्याकडे असणार असून

मुंबई : राज्य पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम ८ टक्क्यांपर्यंत असलेतरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अंमलदारांची धुरा त्यांच्याकडे असणार असून, हद्दीत घडणारे सर्व गुन्हे आणि ‘डायरी’वरील महत्त्वाची नोंद त्यांच्या स्वाक्षरीनिशी होणार आहे. ८ मार्चला जगभरात साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून खात्यातील महिलांसाठी प्रोत्साहनपर हा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि अधीक्षक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात १,०७६ पोलीस ठाणी आहेत. ८ मार्चला महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘ठाणे अंमलदार’पदी नेमणूक करावी, असे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांना दिलेले आहेत. महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिला दिनाची भेट म्हणून त्या ठाणे अंमलदारपदी काम करतील, त्यामुळे त्यांच्या कामाचा उत्साह वाढू शकेल, सर्व पोलीस आयुक्त/ अधीक्षकांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. एकाचवेळी या सर्व ठिकाणच्या अंमलदार महिला असण्याची पोलीस दलाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असणार आहे. (प्रतिनिधी)> 25,311 महिला पोलीस महाराष्ट्रात सध्या ९ पोलीस आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालये कार्यरत असून, या ठिकाणी २ लाख ६ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा विविध आयुक्तालये, विभाग व शाखांमध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या २५ हजार ३११ इतकी आहे. > पोलीस ठाण्यातील अंमलदार हा अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो. कार्यक्षेत्राच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची नोंद त्याच्याकडे असलेल्या डायरीत केली जाते. त्याला प्राथमिक माहिती नोंद (एफआयआर) म्हटले जाते. त्यांच्या स्वाक्षरीनिशी नोंद केल्यानंतर त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होते. ‘एफआयआर’वरूनच गुन्ह्याबाबतची कलमे, त्या प्रकरणाचा तपास व त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना त्यांची प्रत जोडणे बंधनकारक असते. त्यामुळे पोलीस ठाण्यात अनेक वरिष्ठ अधिकारी असले तरी ठाणे अंमलदाराची भूमिका निर्णायक असल्याने या ठिकाणी अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली जाते. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांतील अंमलदाराची ड्युटी महिलांना देण्यात यावी, असे आदेश महासंचालक दीक्षित यांनी दिलेले आहेत.