शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दासगाव येथील काळभैरव-जोगेश्वरी देवस्थानाची आज जत्रा

By admin | Updated: April 3, 2017 03:50 IST

कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांना पूजेचा मान असतो

दासगाव : कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांना पूजेचा मान असतो. या परंपरेला छेद देत दासगावचे काळभैरव-जोगेश्वरी मंदिर वेगळी वाटचाल करीत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून या मंदिरातील पूजेचा सर्व मान हा येथील कुंभार समाजातील कुटुंबीयांनाच मिळतो. या अनोख्या परंपरेसाठी हे मंदिर सर्वश्रुत आहे.दासगाव येथील काळभैरव-जोगेश्वरी देवस्थानाची जत्रा गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षी ३ एप्रिल सोमवारी हा जत्रोत्सव साजरा होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जत्रोत्सव म्हटला की धार्मिक पूजा, जल्लोष, काठ्या, पालख्या, खाऊ आणि खेळण्यांची दुकाने हे सर्व आलेच. मात्र दासगावचे देवस्थान यापेक्षा काही तरी वेगळा संदेश समाजाला देत सर्वधर्मसमभावाची शिकवण दासगावच्या या मंदिरातून दिली जात असून सर्व माणसेही सारखीच आहेत, हे येथील बारमाही पूजेतून जगाला दाखवण्याचे काम काळभैरव-जोगेश्वरी देवस्थान करीत आहे. दासगाव येथील मंदिरात बारमाही पूजेचा मान हा येथील कुंभार समाजाच्या चांढवेकर कुटुंबीयांना मिळत असून, गेल्या अनेक पिढ्यांपासून इमाने इतबारे ही जबाबदारी पार पाडत आहेत. कोणत्याही छोट्या-मोठ्या मंदिरात अगर देवस्थानात गेले तर येथील देवी-देवतांची पूजाही ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांमार्फत करण्याची प्रथा आहे. यामधूनच एक सामाजिक दुही निर्माण झाली होती. या दुहीला छेद देत दासगावच्या काळभैरव-जोगेश्वरी मंदिरात कुंभार समाजाला पूजेचा मान देण्यात आला आहे. जत्रोत्सवाच्या काळात संपूर्ण गाव या मंदिरात एकवटतो. उत्सवाच्या आदल्या दिवशी शिवारातील देव-देवतांचा मानपान दिला जातो, त्याची विधिवत पूजा केली जाते. याच पूजेने जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. प्रत्यक्षात जत्रेच्या दिवशी संध्याकाळी काळभैरव-जोगेश्वरीच्या मंदिरात चौक भरला जातो. या पारंपरिक पूजेनंतर बगाड फिरते (लाट फिरते) आणि जत्रेची खरी धूम सुरू होते. रात्री ९ वाजल्यापासून परिसरातील वीर, गोठे, वामणे, सव या गावांतील पालख्या आणि काठ्या येतात. गावामध्ये आल्यानंतर काही अंतरापासून या पालखीला पायघडीचा मान असतो. मंदिरापर्यंत पायघड्या घालत आणले जाते, या पायघड्याचा मान येथील परिट समाजालाच मिळतो. पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर पुन्हा बगाड फिरवून या पालखीला मान देऊन पुन्हा रात्रीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. दरवर्षीप्रमाणे रात्रीच्या कार्यक्रमामध्ये यंदा शक्ती-तुरा या तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)सर्वधर्मसमभावाचा संदेश : दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सर्व आलेल्या गावांतील पालख्या, काठ्यांची एक भव्य मिरवणूक मंदिरापासून काढण्यात येते. त्यानंतर आलेल्या भाविकांना नारळाचा मानपान देऊन जत्रेची सांगता करण्यात येते. काळभैरव-जोगेश्वरी मंदिराच्या जत्रोत्सवानिमित्ताने सर्व धर्म जाती धर्मांना समानतेचा मान कुंभार समाजाला पूजेचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे परिट समाजाला सवच्या पालखीला पायघड्या घालण्याचा मान मिळतो, तर मुस्लीम समाजाच्या दर्ग्याला मानपानाचा नारळ विडा देण्यात येतो. गावातील चर्मकार समाजाला फिरवण्यात येणाऱ्या लाटेच्या (बगाड) रंगरंगोटीचा मान देण्यात येतो. मात्र दासगाव काळभैरव व जोगेश्वरी मंदिराचा जत्रोत्सव हा सर्वधर्मसमभावाचा संदेश देतो.