शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

दासगाव येथील काळभैरव-जोगेश्वरी देवस्थानाची आज जत्रा

By admin | Updated: April 3, 2017 03:50 IST

कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांना पूजेचा मान असतो

दासगाव : कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांना पूजेचा मान असतो. या परंपरेला छेद देत दासगावचे काळभैरव-जोगेश्वरी मंदिर वेगळी वाटचाल करीत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून या मंदिरातील पूजेचा सर्व मान हा येथील कुंभार समाजातील कुटुंबीयांनाच मिळतो. या अनोख्या परंपरेसाठी हे मंदिर सर्वश्रुत आहे.दासगाव येथील काळभैरव-जोगेश्वरी देवस्थानाची जत्रा गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षी ३ एप्रिल सोमवारी हा जत्रोत्सव साजरा होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जत्रोत्सव म्हटला की धार्मिक पूजा, जल्लोष, काठ्या, पालख्या, खाऊ आणि खेळण्यांची दुकाने हे सर्व आलेच. मात्र दासगावचे देवस्थान यापेक्षा काही तरी वेगळा संदेश समाजाला देत सर्वधर्मसमभावाची शिकवण दासगावच्या या मंदिरातून दिली जात असून सर्व माणसेही सारखीच आहेत, हे येथील बारमाही पूजेतून जगाला दाखवण्याचे काम काळभैरव-जोगेश्वरी देवस्थान करीत आहे. दासगाव येथील मंदिरात बारमाही पूजेचा मान हा येथील कुंभार समाजाच्या चांढवेकर कुटुंबीयांना मिळत असून, गेल्या अनेक पिढ्यांपासून इमाने इतबारे ही जबाबदारी पार पाडत आहेत. कोणत्याही छोट्या-मोठ्या मंदिरात अगर देवस्थानात गेले तर येथील देवी-देवतांची पूजाही ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांमार्फत करण्याची प्रथा आहे. यामधूनच एक सामाजिक दुही निर्माण झाली होती. या दुहीला छेद देत दासगावच्या काळभैरव-जोगेश्वरी मंदिरात कुंभार समाजाला पूजेचा मान देण्यात आला आहे. जत्रोत्सवाच्या काळात संपूर्ण गाव या मंदिरात एकवटतो. उत्सवाच्या आदल्या दिवशी शिवारातील देव-देवतांचा मानपान दिला जातो, त्याची विधिवत पूजा केली जाते. याच पूजेने जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. प्रत्यक्षात जत्रेच्या दिवशी संध्याकाळी काळभैरव-जोगेश्वरीच्या मंदिरात चौक भरला जातो. या पारंपरिक पूजेनंतर बगाड फिरते (लाट फिरते) आणि जत्रेची खरी धूम सुरू होते. रात्री ९ वाजल्यापासून परिसरातील वीर, गोठे, वामणे, सव या गावांतील पालख्या आणि काठ्या येतात. गावामध्ये आल्यानंतर काही अंतरापासून या पालखीला पायघडीचा मान असतो. मंदिरापर्यंत पायघड्या घालत आणले जाते, या पायघड्याचा मान येथील परिट समाजालाच मिळतो. पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर पुन्हा बगाड फिरवून या पालखीला मान देऊन पुन्हा रात्रीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. दरवर्षीप्रमाणे रात्रीच्या कार्यक्रमामध्ये यंदा शक्ती-तुरा या तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)सर्वधर्मसमभावाचा संदेश : दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सर्व आलेल्या गावांतील पालख्या, काठ्यांची एक भव्य मिरवणूक मंदिरापासून काढण्यात येते. त्यानंतर आलेल्या भाविकांना नारळाचा मानपान देऊन जत्रेची सांगता करण्यात येते. काळभैरव-जोगेश्वरी मंदिराच्या जत्रोत्सवानिमित्ताने सर्व धर्म जाती धर्मांना समानतेचा मान कुंभार समाजाला पूजेचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे परिट समाजाला सवच्या पालखीला पायघड्या घालण्याचा मान मिळतो, तर मुस्लीम समाजाच्या दर्ग्याला मानपानाचा नारळ विडा देण्यात येतो. गावातील चर्मकार समाजाला फिरवण्यात येणाऱ्या लाटेच्या (बगाड) रंगरंगोटीचा मान देण्यात येतो. मात्र दासगाव काळभैरव व जोगेश्वरी मंदिराचा जत्रोत्सव हा सर्वधर्मसमभावाचा संदेश देतो.