शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना आजपासून दररोज एक वेळ पाणी

By admin | Updated: August 8, 2016 01:47 IST

महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने शहराला आजपासून दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या भागाला कोणत्या वेळी पाणी सोडले जाणार याचे नियोजन

पुणे : महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने शहराला आजपासून दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या भागाला कोणत्या वेळी पाणी सोडले जाणार याचे नियोजन करून वेळापत्रक तयार करण्याचे काम पाणीपुरवठा विभागातर्फे सुरू असून, ते सोमवारी अंतिम होण्याची शक्यता आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर पाणीकपात रद्द करण्याची मागणी राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने केली जात होती. पालकमंत्र्यांनी पाणीकपात रद्द करण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महापौरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आदी पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यापार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शनिवारी कालवा समितीची बैठक घेऊन पाणीकपात रद्द केल्याची घोषणा केली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणांमधून शहरासाठी दररोज आता दररोज १२०० एमएलडी इतका पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीकपात सुरू असताना दररोज ८५० एमएलडी इतके पाणी दिले जात होते. एकदिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रत्येक भागानुसार वेळापत्रक निश्चित केले होते. आता दररोज पाणीपुरवठा करायचा असल्याने प्रत्येक भागाला कोणत्या वेळी पाणी सोडायचे याचे नियोजन करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुरू आहे. सोमवारी वेळापत्रकाचे काम पूर्ण होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.