शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

आज मुंडे नाहीत, हे नशीबच!

By admin | Updated: February 11, 2017 01:51 IST

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी हे स्वपक्षातील आमदार हे मुख्यत: त्यांच लक्ष्य होतं. त्यांचे साम्राज्य, दहशत संपवण्याचा सुधाकरराव नाईकांनी चंगच बांधला होता. आपल्या या आमदारांना सांभाळून घ्या, हा संरक्षणमंत्री शरद पवारांचा सल्लाही म्हणे सुधाकररावांनी जुमानला नाही. पप्पू कलानीला अटक झाली, तेव्हा त्याला मारहाण करू नका, असे म्हणे पवारांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. एकाच वर्षात सुधाकररावांचे मुख्यमंत्रीपद गेलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. ते येताच भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. पवारांचे कलानी, ठाकूर तसंच अन्य गुन्हेगारांशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी केले. ठाकूर व कलानी यांचे म्हणे दाउदशीही संबंध होते. त्यामुळे पवारांचाही दाउदशी संबंध जोडण्यात आला. त्याच काळात बाबरी मशिदीवरून झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट यांच्याशी दाउदचा संबंध असल्यानं पवारांची खूपच बदनामी झाली. इतकी की १९९५ च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा राज्यात पहिल्यांदाच पराभव झाला. युती सत्तेवर आली. तेव्हापासून पप्पू व हितेंद्र यांचे दाउदशी संबंध असल्याचे आरोप सतत होतच आले. पप्पू खुनाबद्दल तुरुंगात आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, फसवणूक, बेकायदा दारूनिर्मिती असे असंख्य आरोप आहेत. त्याची पत्नी ज्योती सध्या राष्ट्रवादीची आमदार आहे. ती उल्हासनगरची नगराध्यक्षही होती. तिच्यावरही गुन्हे आहेत. मुलगा ओमी याच्याविरोधातही गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाची तक्रार केली होती.पण उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सारंच चित्र पालटलं. दोघाही भाजपा कार्यकर्त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली ओमीविरुद्धची तक्रार मागे घेतली. मग लागलीच ओमीच्या संघटनेशी भाजपाने आघाडी केली. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या कलानींशी हा भाजपाचा घरोबा. त्यामुळे पप्पू आणि ओमी कलानी गंगेत न्हाल्यासारखे पवित्र झाले आणि नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, दानवे यांच्यासोबतच बॅनर्सवर ओमी आणि पप्पू कलानी यांचीही छायाचित्रं झळकत आहेत. भाजपाचा सारा कारभार अगदी पारदर्शक! दुसरीकडे उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या प्रचाराचे जे बॅनर्स लागले आहेत, त्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासमेवत ज्योती कलानी यांची मोठी छायाचित्रं आहेत. पवारांवर आधीच शिक्का पडला आहे. त्यामुळे त्याचं काही वाटत नाही.पण भाजपाचं काय? आम्ही सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुरुंगात जातील, असे फडणवीस निवडणुकांआधी सांगत होते. पण ते तर चालले आहेत भाजपामध्ये. कलानी कुटुंब हे त्यापैकी एक. राज्यात अशा अनेकांना भाजपाने पवित्र करून घेतलं आहे. हे सारं पाहायला गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत, हे नशीबच. - संजीव साबडे