शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

आज मुंडे नाहीत, हे नशीबच!

By admin | Updated: February 11, 2017 01:51 IST

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी हे स्वपक्षातील आमदार हे मुख्यत: त्यांच लक्ष्य होतं. त्यांचे साम्राज्य, दहशत संपवण्याचा सुधाकरराव नाईकांनी चंगच बांधला होता. आपल्या या आमदारांना सांभाळून घ्या, हा संरक्षणमंत्री शरद पवारांचा सल्लाही म्हणे सुधाकररावांनी जुमानला नाही. पप्पू कलानीला अटक झाली, तेव्हा त्याला मारहाण करू नका, असे म्हणे पवारांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. एकाच वर्षात सुधाकररावांचे मुख्यमंत्रीपद गेलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. ते येताच भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. पवारांचे कलानी, ठाकूर तसंच अन्य गुन्हेगारांशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी केले. ठाकूर व कलानी यांचे म्हणे दाउदशीही संबंध होते. त्यामुळे पवारांचाही दाउदशी संबंध जोडण्यात आला. त्याच काळात बाबरी मशिदीवरून झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट यांच्याशी दाउदचा संबंध असल्यानं पवारांची खूपच बदनामी झाली. इतकी की १९९५ च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा राज्यात पहिल्यांदाच पराभव झाला. युती सत्तेवर आली. तेव्हापासून पप्पू व हितेंद्र यांचे दाउदशी संबंध असल्याचे आरोप सतत होतच आले. पप्पू खुनाबद्दल तुरुंगात आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, फसवणूक, बेकायदा दारूनिर्मिती असे असंख्य आरोप आहेत. त्याची पत्नी ज्योती सध्या राष्ट्रवादीची आमदार आहे. ती उल्हासनगरची नगराध्यक्षही होती. तिच्यावरही गुन्हे आहेत. मुलगा ओमी याच्याविरोधातही गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाची तक्रार केली होती.पण उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सारंच चित्र पालटलं. दोघाही भाजपा कार्यकर्त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली ओमीविरुद्धची तक्रार मागे घेतली. मग लागलीच ओमीच्या संघटनेशी भाजपाने आघाडी केली. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या कलानींशी हा भाजपाचा घरोबा. त्यामुळे पप्पू आणि ओमी कलानी गंगेत न्हाल्यासारखे पवित्र झाले आणि नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, दानवे यांच्यासोबतच बॅनर्सवर ओमी आणि पप्पू कलानी यांचीही छायाचित्रं झळकत आहेत. भाजपाचा सारा कारभार अगदी पारदर्शक! दुसरीकडे उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या प्रचाराचे जे बॅनर्स लागले आहेत, त्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासमेवत ज्योती कलानी यांची मोठी छायाचित्रं आहेत. पवारांवर आधीच शिक्का पडला आहे. त्यामुळे त्याचं काही वाटत नाही.पण भाजपाचं काय? आम्ही सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुरुंगात जातील, असे फडणवीस निवडणुकांआधी सांगत होते. पण ते तर चालले आहेत भाजपामध्ये. कलानी कुटुंब हे त्यापैकी एक. राज्यात अशा अनेकांना भाजपाने पवित्र करून घेतलं आहे. हे सारं पाहायला गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत, हे नशीबच. - संजीव साबडे