शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

माऊलींचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

By admin | Updated: July 21, 2015 01:14 IST

आषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या विठुरायाला कधी भेटेन या उत्कट ओढीने गेले १२ दिवस ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा जयघोष करीत संत ज्ञानेश्वर

बाळासाहेब बोचरे, बरड (जि. सातारा)आषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या विठुरायाला कधी भेटेन या उत्कट ओढीने गेले १२ दिवस ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा जयघोष करीत संत ज्ञानेश्वर माऊलींसोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी सोमवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी आली. आता मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास धर्मपुरी येथे हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.आळंदीहून निघाल्यापासून पावसाचा एकही थेंब अंगावर न पडलेले वारकरी दररोज धुळीत माखून निघत आहेत. दमा, खोकला, सर्दी, गुडघेदुखी, पोटदुखी असे आजार धुळीमुळे बळावत असले तरी त्याची तमा न बाळगता वाटचाल सुरू आहे. वरुणराजा आपल्यावर रुसला की काय, एवढीच चिंता त्यांना आहे. सर्वात पुढे मावडीकरांचा चौघडा, त्यामागे २७ नंबरची दिंडी, त्यामागे शितोळे सरकारांचे मानाचे अश्व, त्यानंतर २६ दिंड्या, त्यामागे चांदीच्या रथामध्ये विराजमान माऊलींची पालखी आणि मागे ४५० दिंड्या असा हा वैभवी लवाजमा गेले १२ दिवस वाटचाल करीत आहे.सकाळी ऐतिहासिक फलटण नगरीला निरोप देऊन पालखीने पुढची वाटचाल सुरू केली.