शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

आज अर्थ अवर

By admin | Updated: March 25, 2017 01:47 IST

पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे.

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे. २००८ सालापासून राबवण्यात येत असलेल्या या प्रयोगाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. देशातील दिल्ली आणि मुंबईसारखी प्रमुख शहरे ‘अर्थ अवर’मध्ये प्राधान्याने सहभागी होत आहेत. मात्र मागील दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. ही औपचारिकता येऊ नये म्हणून आणि नागरिकांचा या चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग आणखी वाढावा म्हणून तरुणाईने मुंबईकरांना ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने शनिवारी (२५ मार्च) रात्री ८.३० ते ९.३० या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड व सिडने मॉर्निंग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ साली आॅस्ट्रेलियामधील सिडनी येथे हवामान बदल (क्लायमेट चेंज) विषयावर जनजागृती अभियानाच्या निमित्ताने पहिला ‘अर्थ अवर’ साजरा करण्यात आला. ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवण्यात आले. पहिल्याच प्रयोगात सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता सहभागी झाली. शिवाय उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठांनीही या चळवळीत सहभाग घेतला. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. पहिल्याच प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहता २००८ साली जगभर हा प्रयोग राबवण्यात आला. (प्रतिनिधी)च्न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका-कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रिज सॅन फ्रॅन्सीस्को, स्पेस नीडल सीएटल, सिडनी आॅपेरा हाउस, रोममधील कलोसीयम असे नेहमीच प्रकाशित असणाऱ्या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते.च्२००८ साली या मोहिमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ साली या प्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.च्जगभर ‘अर्थ अवर’ साजरा होत असतानाच देशातील दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांनीही यात प्रत्यक्षरीत्या सहभाग नोंदवला.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने एक तास वीज बंद हा काही ठोस उपाय नाही. मात्र यानिमित्ताने का होईना नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. हा प्रतीकात्मक प्रयोग असला तरीदेखील नागरिक याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.च्मात्र गेल्या दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. परिणामी ही औपचारिकता येऊ नये म्हणून छोटेखनी पुढाकारासाठी का होईना प्रत्येकाने यात योगदान देणे क्रमप्राप्त आहे.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने नागरिक पर्यावरणाविषयी जागरूक आहेत आणि संघटित होत आहेत. हे दिलासादायक असल्याने नक्कीच पर्यावरण संवर्धनासाठी हे छोटे कामदेखील मोठेच आहे.