शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आज अर्थ अवर

By admin | Updated: March 25, 2017 01:47 IST

पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे.

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे. २००८ सालापासून राबवण्यात येत असलेल्या या प्रयोगाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. देशातील दिल्ली आणि मुंबईसारखी प्रमुख शहरे ‘अर्थ अवर’मध्ये प्राधान्याने सहभागी होत आहेत. मात्र मागील दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. ही औपचारिकता येऊ नये म्हणून आणि नागरिकांचा या चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग आणखी वाढावा म्हणून तरुणाईने मुंबईकरांना ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने शनिवारी (२५ मार्च) रात्री ८.३० ते ९.३० या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड व सिडने मॉर्निंग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ साली आॅस्ट्रेलियामधील सिडनी येथे हवामान बदल (क्लायमेट चेंज) विषयावर जनजागृती अभियानाच्या निमित्ताने पहिला ‘अर्थ अवर’ साजरा करण्यात आला. ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवण्यात आले. पहिल्याच प्रयोगात सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता सहभागी झाली. शिवाय उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठांनीही या चळवळीत सहभाग घेतला. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. पहिल्याच प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहता २००८ साली जगभर हा प्रयोग राबवण्यात आला. (प्रतिनिधी)च्न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका-कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रिज सॅन फ्रॅन्सीस्को, स्पेस नीडल सीएटल, सिडनी आॅपेरा हाउस, रोममधील कलोसीयम असे नेहमीच प्रकाशित असणाऱ्या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते.च्२००८ साली या मोहिमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ साली या प्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.च्जगभर ‘अर्थ अवर’ साजरा होत असतानाच देशातील दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांनीही यात प्रत्यक्षरीत्या सहभाग नोंदवला.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने एक तास वीज बंद हा काही ठोस उपाय नाही. मात्र यानिमित्ताने का होईना नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. हा प्रतीकात्मक प्रयोग असला तरीदेखील नागरिक याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.च्मात्र गेल्या दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. परिणामी ही औपचारिकता येऊ नये म्हणून छोटेखनी पुढाकारासाठी का होईना प्रत्येकाने यात योगदान देणे क्रमप्राप्त आहे.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने नागरिक पर्यावरणाविषयी जागरूक आहेत आणि संघटित होत आहेत. हे दिलासादायक असल्याने नक्कीच पर्यावरण संवर्धनासाठी हे छोटे कामदेखील मोठेच आहे.