शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आज अर्थ अवर

By admin | Updated: March 25, 2017 01:47 IST

पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे.

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे. २००८ सालापासून राबवण्यात येत असलेल्या या प्रयोगाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. देशातील दिल्ली आणि मुंबईसारखी प्रमुख शहरे ‘अर्थ अवर’मध्ये प्राधान्याने सहभागी होत आहेत. मात्र मागील दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. ही औपचारिकता येऊ नये म्हणून आणि नागरिकांचा या चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग आणखी वाढावा म्हणून तरुणाईने मुंबईकरांना ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने शनिवारी (२५ मार्च) रात्री ८.३० ते ९.३० या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड व सिडने मॉर्निंग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ साली आॅस्ट्रेलियामधील सिडनी येथे हवामान बदल (क्लायमेट चेंज) विषयावर जनजागृती अभियानाच्या निमित्ताने पहिला ‘अर्थ अवर’ साजरा करण्यात आला. ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवण्यात आले. पहिल्याच प्रयोगात सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता सहभागी झाली. शिवाय उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठांनीही या चळवळीत सहभाग घेतला. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. पहिल्याच प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहता २००८ साली जगभर हा प्रयोग राबवण्यात आला. (प्रतिनिधी)च्न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका-कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रिज सॅन फ्रॅन्सीस्को, स्पेस नीडल सीएटल, सिडनी आॅपेरा हाउस, रोममधील कलोसीयम असे नेहमीच प्रकाशित असणाऱ्या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते.च्२००८ साली या मोहिमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ साली या प्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.च्जगभर ‘अर्थ अवर’ साजरा होत असतानाच देशातील दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांनीही यात प्रत्यक्षरीत्या सहभाग नोंदवला.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने एक तास वीज बंद हा काही ठोस उपाय नाही. मात्र यानिमित्ताने का होईना नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. हा प्रतीकात्मक प्रयोग असला तरीदेखील नागरिक याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.च्मात्र गेल्या दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. परिणामी ही औपचारिकता येऊ नये म्हणून छोटेखनी पुढाकारासाठी का होईना प्रत्येकाने यात योगदान देणे क्रमप्राप्त आहे.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने नागरिक पर्यावरणाविषयी जागरूक आहेत आणि संघटित होत आहेत. हे दिलासादायक असल्याने नक्कीच पर्यावरण संवर्धनासाठी हे छोटे कामदेखील मोठेच आहे.