शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

आजपासून ‘जलमित्र अभियान’

By admin | Updated: May 8, 2016 07:39 IST

सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत

‘लोकमत’चा जलसाक्षरतेसाठी पुढाकार : राज्यभर राबविणार मोहीममुंबई : सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानास रविवार दि. ८ मेपासून प्रारंभ होत आहे. सहा आठवड्यांच्या या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत.महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि देशातील ४० टक्के प्रदेशावर सध्या जलसंकट ओढावले आहे. या स्थितीत पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण समाजात आजवर यासंदर्भात नेमकेपणाने जागरुकता निर्माण केली गेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलसाक्षरतेसाठी जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. सहा आठवड्यांच्या या अभियानात पहिल्या सप्ताहामध्ये ‘लोकमत’ च्या अंकात पाण्याचे महत्त्व आणि जलसाक्षरतेबाबत जनजागरण करणाऱ्या जाहिराती प्रसिद्धी करण्यात येणार आहेत. ‘लोकमत डॉट कॉम’ आणि सोशल मीडिया विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवरून जलबचतीसाठी जागृती करण्यात येईल. (प्रतिनिधी)विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी चर्चा ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाच्या आयोजनासंदर्भात ‘लोकमत’चे संपादकीय मंडळ आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांशी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी चर्चा केली. या साऱ्यांनी या अभियानाचे स्वागत केले. अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यभरात एकूणच या जलमित्र अभियानाबद्दल उत्सुकता दिसून आली.सेलीब्रिटीजसह अभियान राबविणारहॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि मेसमध्ये (खानावळ) ‘ग्लास आॅफ वॉटर आॅन ग्राऊंड’ ही मोहीम राबविण्यात येईल. याशिवाय रुग्णालये, माहिती - तंत्रज्ञान कंपन्या, उत्पादन करणाऱ्या कंपन्या, मल्टिप्लेक्स् आणि मॉल्समध्येही जलमित्र अभियान राबविण्यात येणार आहे.दुसऱ्या आठवड्यात वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर पोस्टर्स /स्लोगन्स् स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. तिसऱ्या आठवड्यात सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग स्पर्धा घेण्यात येईल. चौथ्या आणि पाचव्या आठवड्यात देशातील सेलिब्रिटीज् या जलमित्र अभियानात सहभागी होतील. सेलिब्रिटीजसह ‘मी जलमित्र’अभियान राबविण्यात येईल़ जलसाक्षरतेसंदर्भात स्वाक्षरी मोहीम घेऊन जनतेच्या स्वाक्षरींची जंत्री मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. याशिवाय जनजागरणासाठी बॅचेस, मग, पाण्याच्या बाटल्या, टोप्या, टी - शर्टस् वाटण्यात येतील तसेच सोसायट्यांमध्ये स्टॅन्डीज् आणि पोस्टर्स लावण्यात येतील. ‘लोकमत’च्या माध्यमातून या मोहिमेचे फलित अखेरच्या सप्ताहात जाहीर करण्यात येणार आहे.