शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

थकलेल्या पोलिसांना गावाकडची ओढ

By admin | Updated: October 21, 2014 00:07 IST

बंदोबस्त संपला : पहिलीच दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणार

एकनाथ पाटील - कोल्हापूर-- टोल आंदोलन, मोर्चे, दंगली यासह लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे. ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत कोणत्याच सणा-सुदीला त्यांना घराकडे जाता आले नाही. आई-वडिलांसह पत्नी, मुलांचे स्वास्थ्य हरवले आहे. निवडणूक बंदोबस्त संपल्याने या चेहऱ्यांना गावाकडची ओढ लागून राहिली आहे. तोंडावर आलेली दिवाळी कुटुंबात सहभागी होऊन साजरी करण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सुट्ट्यांचे नियोजन करून ‘मागेल त्याला सुटी’ देण्याचे नियोजन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केले आहे.‘पप्पा, आजचा दिवस तरी घरी थांबा ना...’ ही चिमुकल्यांची आर्त हाक. रात्री कामावरून परतणाऱ्या पप्पांची वाट पाहता...पाहताच केव्हा झोप लागते हे त्यांनाही कळत नाही. सकाळी पिल्लांना शाळेची घाई आणि वडिलांना कामावर जाण्याचे वेध यात बाप-लेकाला हवाहवासा वाटणारा सहवासही मिळत नाही, आयुष्याच्या जोडीदारासोबत विसाव्याचे दोन क्षण घ्यावे म्हटले तरी ते मिळत नाहीत. मग यातूनच अपेक्षाभंग आणि संसारातील वादावादी सुरू होते. दुसऱ्यांच्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम पोलीस करतात. परंतु स्वत:च्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मात्र त्यांना वेळ भेटत नाही. प्रत्येक घरातील समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम पोलीस करत असतात. परंतु त्यांच्या घरातील समस्या मात्र तशाच राहतात. रात्री-अपरात्री आलेला प्रत्येक फोन उचलून समोरच्यांची तक्रार ऐकून त्याला दिलासा देण्याचे काम करतात. परंतु घरातून फोन आला की ‘मी कामात आहे, फोन ठेवतो’, असे सांगून प्रामाणिकपणे काम करताना पोलीस दिसत आहेत. गुन्हे उकलण्याबरोबर वर्षभरात टोल आंदोलन, मोर्चे, निदर्शने, सणासह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळे पोलिसांना क्षणभर विश्रांतीही घेता आलेली नाही. सध्या सर्वसामान्य नागरिक दिवाळीच्या खरेदीमध्ये व्यस्त आहेत. सुटीमध्ये मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याचेही काहीजण प्लॅनिंग करत आहेत. पोलिसांना मात्र गावकडची ओढ लागली आहे. ही दिवाळी कुटुंबाबरोबर साजरी करण्याचे स्वप्न प्रत्येक पोलिसाचे आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे रजा अर्जही सादर केले आहेत. डॉ. शर्मा यांनी सुट्ट्यांचे नियोजन करून ‘मागेल त्याला सुटी’ देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आपल्या त्यागाची दखल घेणारा कोणी तरी आहे याची जाणीव पोलिसांना होत आहे.कधीही न संपणारी ड्युटी पोलिसांची आहे. वर्षभरात पोलिसांनी खूप प्रामाणिकपणे काम केल्याने गणेशोत्सव, आंदोलनासह निवडणुका शांततेत पार पडल्या. आता काहीक्षण आनंदाचे पोलिसांना मिळावेत, ही माझी इच्छा आहे. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक