शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

थकलेल्या पोलिसांना गावाकडची ओढ

By admin | Updated: October 21, 2014 00:07 IST

बंदोबस्त संपला : पहिलीच दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणार

एकनाथ पाटील - कोल्हापूर-- टोल आंदोलन, मोर्चे, दंगली यासह लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे. ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत कोणत्याच सणा-सुदीला त्यांना घराकडे जाता आले नाही. आई-वडिलांसह पत्नी, मुलांचे स्वास्थ्य हरवले आहे. निवडणूक बंदोबस्त संपल्याने या चेहऱ्यांना गावाकडची ओढ लागून राहिली आहे. तोंडावर आलेली दिवाळी कुटुंबात सहभागी होऊन साजरी करण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सुट्ट्यांचे नियोजन करून ‘मागेल त्याला सुटी’ देण्याचे नियोजन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केले आहे.‘पप्पा, आजचा दिवस तरी घरी थांबा ना...’ ही चिमुकल्यांची आर्त हाक. रात्री कामावरून परतणाऱ्या पप्पांची वाट पाहता...पाहताच केव्हा झोप लागते हे त्यांनाही कळत नाही. सकाळी पिल्लांना शाळेची घाई आणि वडिलांना कामावर जाण्याचे वेध यात बाप-लेकाला हवाहवासा वाटणारा सहवासही मिळत नाही, आयुष्याच्या जोडीदारासोबत विसाव्याचे दोन क्षण घ्यावे म्हटले तरी ते मिळत नाहीत. मग यातूनच अपेक्षाभंग आणि संसारातील वादावादी सुरू होते. दुसऱ्यांच्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम पोलीस करतात. परंतु स्वत:च्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मात्र त्यांना वेळ भेटत नाही. प्रत्येक घरातील समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम पोलीस करत असतात. परंतु त्यांच्या घरातील समस्या मात्र तशाच राहतात. रात्री-अपरात्री आलेला प्रत्येक फोन उचलून समोरच्यांची तक्रार ऐकून त्याला दिलासा देण्याचे काम करतात. परंतु घरातून फोन आला की ‘मी कामात आहे, फोन ठेवतो’, असे सांगून प्रामाणिकपणे काम करताना पोलीस दिसत आहेत. गुन्हे उकलण्याबरोबर वर्षभरात टोल आंदोलन, मोर्चे, निदर्शने, सणासह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळे पोलिसांना क्षणभर विश्रांतीही घेता आलेली नाही. सध्या सर्वसामान्य नागरिक दिवाळीच्या खरेदीमध्ये व्यस्त आहेत. सुटीमध्ये मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याचेही काहीजण प्लॅनिंग करत आहेत. पोलिसांना मात्र गावकडची ओढ लागली आहे. ही दिवाळी कुटुंबाबरोबर साजरी करण्याचे स्वप्न प्रत्येक पोलिसाचे आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे रजा अर्जही सादर केले आहेत. डॉ. शर्मा यांनी सुट्ट्यांचे नियोजन करून ‘मागेल त्याला सुटी’ देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आपल्या त्यागाची दखल घेणारा कोणी तरी आहे याची जाणीव पोलिसांना होत आहे.कधीही न संपणारी ड्युटी पोलिसांची आहे. वर्षभरात पोलिसांनी खूप प्रामाणिकपणे काम केल्याने गणेशोत्सव, आंदोलनासह निवडणुका शांततेत पार पडल्या. आता काहीक्षण आनंदाचे पोलिसांना मिळावेत, ही माझी इच्छा आहे. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक