शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भातसाच्या रक्षकांचे वेतन ७ महिने थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 03:38 IST

सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला

भातसानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची सुरक्षा करण्यासाठी आधीच पोलीस व कर्मचारी कमी असताना सध्या धरणावर असलेल्या सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही तो प्रतिसाद न मिळाल्याने मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा हीदेखील महत्त्वाची आहे. यासाठी पूर्वी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नेहमी सुरक्षेसाठी तैनात असत. तसेच सुरक्षारक्षक मंडळ, मुंबई यांचेदेखील ३० खाजगी सुरक्षारक्षक तैनात असत. मात्र, मागील काही महिन्यांपासून धरणाच्या सुरक्षेसाठी शहापूर पोलीस ठाण्याचे ३, तर मंडळाचे केवळ ७ कर्मचारी सुरक्षा करीत आहेत. या ७ कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे काम हे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता करीत असतात. मात्र, मार्च २०१६ पासून त्यांना वेतन मिळाले नाही. याबाबत, त्यांनी कार्यकारी अभियंता दुसाने यांना पत्रव्यवहार करून आपले थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. ते देण्यासाठी विशेष अशी तरतूद केली जात नसल्याने या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही दुसाने यांनी सांगितले. तसेच तो मिळण्यासाठीचा पत्रव्यवहार वरिष्ठांना केला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आपला पगार लवकर होवो, या आशेकडे हे कामगार डोळे लावून बसले आहेत. (वार्ताहर)>सुरक्षा अत्यंत महत्त्वाचीमुंबई-नाशिक महामार्गावरून अवघ्या ६ किमी अंतरावर असणारे हे भातसा धरण अतिसंवेदनशील असे क्षेत्र आहे. या धरणातून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा महत्त्वाची आहे.