शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

भातसाच्या रक्षकांचे वेतन ७ महिने थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 03:38 IST

सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला

भातसानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची सुरक्षा करण्यासाठी आधीच पोलीस व कर्मचारी कमी असताना सध्या धरणावर असलेल्या सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही तो प्रतिसाद न मिळाल्याने मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा हीदेखील महत्त्वाची आहे. यासाठी पूर्वी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नेहमी सुरक्षेसाठी तैनात असत. तसेच सुरक्षारक्षक मंडळ, मुंबई यांचेदेखील ३० खाजगी सुरक्षारक्षक तैनात असत. मात्र, मागील काही महिन्यांपासून धरणाच्या सुरक्षेसाठी शहापूर पोलीस ठाण्याचे ३, तर मंडळाचे केवळ ७ कर्मचारी सुरक्षा करीत आहेत. या ७ कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे काम हे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता करीत असतात. मात्र, मार्च २०१६ पासून त्यांना वेतन मिळाले नाही. याबाबत, त्यांनी कार्यकारी अभियंता दुसाने यांना पत्रव्यवहार करून आपले थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. ते देण्यासाठी विशेष अशी तरतूद केली जात नसल्याने या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही दुसाने यांनी सांगितले. तसेच तो मिळण्यासाठीचा पत्रव्यवहार वरिष्ठांना केला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आपला पगार लवकर होवो, या आशेकडे हे कामगार डोळे लावून बसले आहेत. (वार्ताहर)>सुरक्षा अत्यंत महत्त्वाचीमुंबई-नाशिक महामार्गावरून अवघ्या ६ किमी अंतरावर असणारे हे भातसा धरण अतिसंवेदनशील असे क्षेत्र आहे. या धरणातून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा महत्त्वाची आहे.