शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

मतदानाला लागणार वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 01:09 IST

राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन) वाढणार आहेत.

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला यंदा प्रथमच ४ उमेदवारांना मते द्यावयाची असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन) वाढणार आहेत. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेची माहिती सर्व मतदारांना असावी, यासाठी निवडणूक यंत्रणेला दक्षता घ्यावी लागणार आहे.पुणे महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक मतदाराला २ उमेदवारांना मते द्यावयाची होती. आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारास ४ उमेदवारांना मते द्यावयाची आहेत. मतदानयंत्रांची रचनाच अशी असेल, की प्रत्येक मतदाराला ४ मते द्यावीच लागतील. प्रत्येक मत नोंदणीनंतर मत पूर्ण झाल्याचा विशिष्ट संकेतध्वनी यंत्रातून येतो. एक मत दिल्याशिवाय दुसऱ्या मतासाठी यंत्राची सज्जता होऊ शकत नाही. प्रत्येक मत दिल्यानंतरच कंट्रोल बॉक्स ओपन होऊन दुसरे मत किंवा कोणालाही मत नाही (नोटा) नोंदणी होईल. त्यानंतरच एका मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.त्यामुळे एका मतदाराला चारही मते नोंदवावीच लागतील. मतदाराला अपेक्षित असलेली २ किंवा ३ मते देऊन तो यंत्रापासून दूर जाऊ शकणार नाही. एखाद्या नापसंत उमेदवाराऐवजी त्याला कोणालाही मत नाही (नोटा)हा पर्याय अवलंबिता येणे शक्य आहे. मतदार याद्या अद्ययावत असल्यास, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक यंत्रणेने प्रबोधन केलेले असल्यास एका मतदाराला मत नोंदविण्यासाठी ४० ते ५० सेकंद पुरेसे असून मतदान झाल्यानंतर बोटाला खुणेची शाई लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेस सुमारे १ मिनिटांचा अवधी लागेल.आगामी निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांशिवाय अन्य काही पक्ष व अपक्ष यांची भाऊगर्दी बहुसंख्य प्रभागांमध्ये असणार आहे. राजकीय पक्षांचे २० व अन्य असे मिळून २४ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असू शकतील. (प्रतिनिधी)>‘नोटा’चाही अधिकार : मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यकएका इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिनमध्ये एकावेळी १२ उमेदवारांची मते नोंदविण्याची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक मते एका यंत्रावर नोंदवायची झाल्यास त्या प्रकारचे तंत्र राज्य शासनाच्या निवडणूक शाखेला अवलंबावे लागणार आहे. साधारणत: एका मतदान केंद्रावर २ किंवा ३ यंत्रे असण्याची दाट शक्यता आहे.एखाद्या मतदाराने ४ ऐवजी कमी मते दिली तर त्याला सर्व मते देण्याबाबत किंवा नोटाचा वापर करण्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागण्याची शक्यता असून त्यामुळे मतदानाचा वेळ वाढू शकेल. अन्य निवडणुकांच्या तुलनेत नगर परिषद किंवा महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या अधिक असते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीने क्लिष्टता वाढणार असून मतमोजणीसाठी लागणारा वेळही वाढणार आहे. निवडणूक यंत्रणेत काम करण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या एका जाणकाराने सांगितले, की ४ उमेदवारांच्या प्रभागामुळे मतदान यंत्रणेपुढचे काम वाढू शकेल. या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक शाखेने आतापासूनच मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.