शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

मतदानाला लागणार वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 01:09 IST

राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन) वाढणार आहेत.

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला यंदा प्रथमच ४ उमेदवारांना मते द्यावयाची असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन) वाढणार आहेत. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेची माहिती सर्व मतदारांना असावी, यासाठी निवडणूक यंत्रणेला दक्षता घ्यावी लागणार आहे.पुणे महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक मतदाराला २ उमेदवारांना मते द्यावयाची होती. आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारास ४ उमेदवारांना मते द्यावयाची आहेत. मतदानयंत्रांची रचनाच अशी असेल, की प्रत्येक मतदाराला ४ मते द्यावीच लागतील. प्रत्येक मत नोंदणीनंतर मत पूर्ण झाल्याचा विशिष्ट संकेतध्वनी यंत्रातून येतो. एक मत दिल्याशिवाय दुसऱ्या मतासाठी यंत्राची सज्जता होऊ शकत नाही. प्रत्येक मत दिल्यानंतरच कंट्रोल बॉक्स ओपन होऊन दुसरे मत किंवा कोणालाही मत नाही (नोटा) नोंदणी होईल. त्यानंतरच एका मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.त्यामुळे एका मतदाराला चारही मते नोंदवावीच लागतील. मतदाराला अपेक्षित असलेली २ किंवा ३ मते देऊन तो यंत्रापासून दूर जाऊ शकणार नाही. एखाद्या नापसंत उमेदवाराऐवजी त्याला कोणालाही मत नाही (नोटा)हा पर्याय अवलंबिता येणे शक्य आहे. मतदार याद्या अद्ययावत असल्यास, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक यंत्रणेने प्रबोधन केलेले असल्यास एका मतदाराला मत नोंदविण्यासाठी ४० ते ५० सेकंद पुरेसे असून मतदान झाल्यानंतर बोटाला खुणेची शाई लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेस सुमारे १ मिनिटांचा अवधी लागेल.आगामी निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांशिवाय अन्य काही पक्ष व अपक्ष यांची भाऊगर्दी बहुसंख्य प्रभागांमध्ये असणार आहे. राजकीय पक्षांचे २० व अन्य असे मिळून २४ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असू शकतील. (प्रतिनिधी)>‘नोटा’चाही अधिकार : मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यकएका इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिनमध्ये एकावेळी १२ उमेदवारांची मते नोंदविण्याची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक मते एका यंत्रावर नोंदवायची झाल्यास त्या प्रकारचे तंत्र राज्य शासनाच्या निवडणूक शाखेला अवलंबावे लागणार आहे. साधारणत: एका मतदान केंद्रावर २ किंवा ३ यंत्रे असण्याची दाट शक्यता आहे.एखाद्या मतदाराने ४ ऐवजी कमी मते दिली तर त्याला सर्व मते देण्याबाबत किंवा नोटाचा वापर करण्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागण्याची शक्यता असून त्यामुळे मतदानाचा वेळ वाढू शकेल. अन्य निवडणुकांच्या तुलनेत नगर परिषद किंवा महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या अधिक असते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीने क्लिष्टता वाढणार असून मतमोजणीसाठी लागणारा वेळही वाढणार आहे. निवडणूक यंत्रणेत काम करण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या एका जाणकाराने सांगितले, की ४ उमेदवारांच्या प्रभागामुळे मतदान यंत्रणेपुढचे काम वाढू शकेल. या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक शाखेने आतापासूनच मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.