शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेळ अतिशय भयंकर आहे, तो कोणाला माफ करत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 01:20 IST

मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे.

पुणे- मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे. खूप सुंदर आहे. परंतु भगवान महवीर असे म्हणतात, तुम्ही ज्या शरीराला सुंदर आणि मजबूत समजता ते अतिशय कमजोर आहे. एवढ्या मोठ्या शरीराला एक डास चावला की आपण तळमळत उठतो. पायामध्ये छोटासा काटा जरी टोचला तरी वेदनेने आपण घायाळ होतो. तर मग आपण कोणत्या गोष्टीसाठी या शरीराबद्दल अभिमान बाळगतो. एक छोटीशी लाल मुंगी संपूर्ण शरीराला हालवून टाकते. मग आपण या देहावर अभिमान करू नये. जे जीवन जे मिळाले आहे त्याचा क्षणमात्र भरवसा नाही. आता आपण बसलेलो आहोत आणि पुढच्या क्षणी आपेल अस्तित्व असेल की नाही हे सांगता येत नाही. म्हणून परमात्मा असे म्हणतात, की हे देहरूपी शरीर दुर्बल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ अतिशय भयंकर आहे. वेळेची मार कधी कशी पडेल हे सांगता येत नाही. वेळेपुढे रथी-महारथी टिकू शकले नाहीत. तर मग आम्ही अभिमानी का असावे? जेव्हा आम्ही आजारी पडतो तेव्हा आपल्याला सहाय्य करणारे कोणी नसते. जेव्हा आपले हातपाय थकतील, शरीर वृद्धापकाळाने क्षीण होईल तेव्हा आपली सेवा करणारे मिळणे खूप कठीण आहे. ज्या कुटुंबावर आपल्याला खूप अभिमान असतो ते सुद्धा साथ देत नाहीत. मग आपण कोणासाठी व कशासाठी एवढा अभिमान बाळगून असतो. या भूतलावर बऱ्याच अशा व्यक्ती आहेत ज्यांना असे वाटते की आमच्याजवळ पैसा आहे. तर आमच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. परंतु परमात्मा असे म्हणतात, की खुपशा अशा समस्या आहेत की ज्या धनाने मिटू शकत नाहीत. जर एखादे असे आजारपण आले की कितीही पैसा खर्च केला तरी तो आजार बरा होऊ शकत नाही. म्हणून परमात्म्याने मनुष्याचा अभिमान नष्ट करण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले आहे. गंध, रुप, स्पर्श, वर्ण आदी गोष्टी मनुष्याला लगेचच आकर्षित करतात आणि मनुष्य त्याच्याकडे जलद गतीने आकर्षित होतो आणि फसतो. एखादे गाणे वाजू लागले की आपण त्याकडे आकर्षित होतो किंवा चांगला सुंगध आला तरी आपले लक्ष विचलित होते. जिथे आपल्याला सूट (डिस्काऊंट) दिसेल त्याकडे आपण लगेच धावतो आणि आपली फसवणूक होते. मनुष्य असा विचार करतो की समोरचा आपल्या एका गोष्टीवर दुसरी गोष्ट फुकट देत आहे परंतु हे खरे नसते. तर समोरची त्याच किंमतीत दोन्ही वस्तूंच्या पैशांची वसुली करत असतो. अशा मोहात अडकणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेणेच होय. - प. पू. डॉ. समकित मुनीजी म. सा.