शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

राज्यात यंदा डाळ महागणारच!

By admin | Updated: June 20, 2016 20:28 IST

देशात व राज्यात निश्चितपणे डाळीचा प्रश्न आहे. राज्यात दुष्काळ व अवेळी पावसामुळे डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळ महागणार आहे, असे असले तरी सरकार डाळीच्या दरांवर

गिरीश बापट यांचे स्पष्टीकरण: सरकार दर नियंत्रणासाठी प्रयत्न करणार

औरंगाबाद: देशात व राज्यात निश्चितपणे डाळीचा प्रश्न आहे. राज्यात दुष्काळ व अवेळी पावसामुळे डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळ महागणार आहे, असे असले तरी सरकार डाळीच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करील, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी औरंगाबादेत स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्यावरून शासनाकडे यंदाही डाळींच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या तरी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याचे स्पष्ट झाले. गिरीश बापट यांनी सोमवारी औरंगाबादेत मराठवाड्यातील पुरवठा विभाग, गोदाम, अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेतला. पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, भारतात आफ्रिकन देशांतून डाळ येते. परदेशातील येणाऱ्या डाळींच्या दरावर आपले नियंत्रण राहत नाही. ५ हजार टन साठा हा घाऊक व ५०० टन व्यापाऱ्यांना साठा करण्याची परवानगी राज्यात दिली आहे. भारतात येणारी डाळ समुद्रात बंदरांवर उभी असायची. भाव कमी जास्त झाले की डाळ उतरली जायची. आंध्र, गुजरात, कनार्टकमध्ये डाळ जाते. डाळ जर मुंबईत आली तर त्यातील २० टक्के डाळ या राज्यात दिली जावी. या कायद्याबाबत विचार सुरू आहे. दराचे बंधन घालण्याकरिता कॅबिनेट नोट झाली आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर डाळींचे दर ठरविण्यात येतील. डाळींच्या संदर्भात कोणाची गय करणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांवर कायद्याखाली अटकही करणार असा इशारा दिला. देशभर डाळींच्या किमती वाढल्या आहेत. परदेशात हजारो एकर जमिनीवर डाळ लागवड होत आहे. सरकार तेथील लीजवर जमिनी घेऊन डाळ लावण्याचा विचार करीत आहे. इतर कंपन्या तो प्रकार करीत आहेत. डाळींच्या दरावर लक्ष केंद्रित केले आहे. भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. परदेशासाठी भारत ही डाळीची मोठी बाजारपेठ आहे. रोज दर बदलतात...डाळीचे भाव केव्हा कमी होणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर बापट म्हणाले, मागणी व पुरवठ्यावर डाळीचे दर आहे. सध्या २०० रुपये मॉलमध्ये १५० रुपये बाजारात डाळ मिळते. रोज दर बदलत असल्यामुळे नियंत्रण ठेवता येत नाही. १२० रुपयांचा किमान दर केंद्राने ठरविला आहे. केंद्राने मोठ्या प्रमाणात डाळीचा स्टॉक केला आहे. सर्व राज्यात डाळीचे चणचण आहे. दोन हजार मेट्रीक टन डाळ केंद्र देणार आहे. त्यामुळे डाळीचा साठा राहील. किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील.