शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राज्यात यंदा डाळ महागणारच!

By admin | Updated: June 20, 2016 20:28 IST

देशात व राज्यात निश्चितपणे डाळीचा प्रश्न आहे. राज्यात दुष्काळ व अवेळी पावसामुळे डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळ महागणार आहे, असे असले तरी सरकार डाळीच्या दरांवर

गिरीश बापट यांचे स्पष्टीकरण: सरकार दर नियंत्रणासाठी प्रयत्न करणार

औरंगाबाद: देशात व राज्यात निश्चितपणे डाळीचा प्रश्न आहे. राज्यात दुष्काळ व अवेळी पावसामुळे डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळ महागणार आहे, असे असले तरी सरकार डाळीच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करील, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी औरंगाबादेत स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्यावरून शासनाकडे यंदाही डाळींच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या तरी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याचे स्पष्ट झाले. गिरीश बापट यांनी सोमवारी औरंगाबादेत मराठवाड्यातील पुरवठा विभाग, गोदाम, अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेतला. पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, भारतात आफ्रिकन देशांतून डाळ येते. परदेशातील येणाऱ्या डाळींच्या दरावर आपले नियंत्रण राहत नाही. ५ हजार टन साठा हा घाऊक व ५०० टन व्यापाऱ्यांना साठा करण्याची परवानगी राज्यात दिली आहे. भारतात येणारी डाळ समुद्रात बंदरांवर उभी असायची. भाव कमी जास्त झाले की डाळ उतरली जायची. आंध्र, गुजरात, कनार्टकमध्ये डाळ जाते. डाळ जर मुंबईत आली तर त्यातील २० टक्के डाळ या राज्यात दिली जावी. या कायद्याबाबत विचार सुरू आहे. दराचे बंधन घालण्याकरिता कॅबिनेट नोट झाली आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर डाळींचे दर ठरविण्यात येतील. डाळींच्या संदर्भात कोणाची गय करणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांवर कायद्याखाली अटकही करणार असा इशारा दिला. देशभर डाळींच्या किमती वाढल्या आहेत. परदेशात हजारो एकर जमिनीवर डाळ लागवड होत आहे. सरकार तेथील लीजवर जमिनी घेऊन डाळ लावण्याचा विचार करीत आहे. इतर कंपन्या तो प्रकार करीत आहेत. डाळींच्या दरावर लक्ष केंद्रित केले आहे. भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. परदेशासाठी भारत ही डाळीची मोठी बाजारपेठ आहे. रोज दर बदलतात...डाळीचे भाव केव्हा कमी होणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर बापट म्हणाले, मागणी व पुरवठ्यावर डाळीचे दर आहे. सध्या २०० रुपये मॉलमध्ये १५० रुपये बाजारात डाळ मिळते. रोज दर बदलत असल्यामुळे नियंत्रण ठेवता येत नाही. १२० रुपयांचा किमान दर केंद्राने ठरविला आहे. केंद्राने मोठ्या प्रमाणात डाळीचा स्टॉक केला आहे. सर्व राज्यात डाळीचे चणचण आहे. दोन हजार मेट्रीक टन डाळ केंद्र देणार आहे. त्यामुळे डाळीचा साठा राहील. किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील.