शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अवकाळी मात्र अनपेक्षित नाही

By admin | Updated: March 5, 2016 08:30 IST

मार्च महिन्यात राज्यात होत असणा-या पावसाची सर्व स्तरावर चर्चा होत असली तरी हा पाऊस अनपेक्षित नाही.

मार्च महिन्यात राज्यात होत असणा-या पावसाची सर्व स्तरावर चर्चा होत असली तरी हा पाऊस अनपेक्षित नाही. मागील काही दिवसात हवामानात होत असणारे बदल लक्षात घेता अशाप्रकारे पाऊस येईल आणि हवामानात बदल होतील असे अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने 15 दिवस आधीपासूनच दिले होते. परंतु आपल्याकडे या उपायांचा गांभिर्याने विचार करण्यात न आल्याने आता होत असलेल्या नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
मागील 3 ते 4 वर्षापासून मराठवाडा आणि विदर्भात अशाप्राकरचा अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वेळोवेळी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले आहे. मात्र असे असतानाही याबाबतची काळजी आपल्या शेतक-यांकडून घेतली न गेल्याने आताची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पुर्वसूचनांचा गांभिर्याने विचार होण्याची आवश्यकता होती.
आता राज्यात ठिकठिकाणी ठिकठिकाणी झालेली गारपीट, वीजांचा कडकडाट यांचे सर्व इशारे हवामान विभागाने वेळोवेळी दिलेले होते. त्यामुळे आताच्या परिस्थितीला कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. आपल्याकडे अनेकदा नुकसानाची आकडेवारी जाहीर केली जाते मात्र हे नुकसान होणार नाही यासाठीच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. 
उत्तरेकडील गार वारे आणि दक्षिणोकडील उष्ण वारे यांचे वेगवेगळे प्रवाह असून ते आपापल्या दिशेने वाहतात, ते कधीच एकमेकांत मिसळत नाहीत. मात्र आता हे प्रवाह एकत्र आल्याने मार्च महिन्यात राज्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. आता उष्णकटीबंधिय प्रवाह (ट्रॉपिकल) आणि त्याच्या बाहेरील प्रवाह (नॉन ट्रॉपिकल) एकमेकांना भिडलेले असल्याने देशभरातील विविध राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
आता राज्यात पडलेला पाऊस हा एकाचवेळी न होता तो टप्प्याटप्प्याने विविध भागात पडला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे नुकसान झाले असे आताच्या परिस्थितीत म्हणता येणार नाही. 2014 मध्ये गारपीटीमुळे अशाचप्रकारे मोठे नुकसान झाले होते. मात्र त्यावेळी एकाचवेळी राज्यात सर्व ठिकाणी गारपीट झाल्याने नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले होते. 
मार्च महिन्यात उन्हाळा चालू झाल्यावर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून पाऊस येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही परिस्थिती फारशी वेगळी असल्याचे म्हणता येणार नाही. यासाठी सध्याची हवामानाची परिस्थिती समजावून घेऊन दूरगामी उपाययोजना करणो गरजेचे आहे. यासाठी आपण लागवड करत असलेली पीके दमदार असायला हवीत. पावसाची एखादी सर आल्यास पिकांचे असे नुकसान होणो नुकसानीचे आहे. यासाठी सशक्त आणि िसबळ पीकांच्या प्रजातींचे संशोधन आणि लागवड व्हायला हवी. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणा:या अडचणींवरील उपाययोजना शोधण्यावर भर द्यायला हवा. त्यामुळे अशा अडचणींचा सामना करणो सोपे जाईल. 
- डॉ. रंजन केळकर (माजी महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग)
 
 
शब्दांकन - सायली जोशी