शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

आयुर्वेदपद्धती जगाला देण्याची वेळ

By admin | Updated: December 30, 2014 01:27 IST

आयुर्वेद क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांना ‘आयुर्वेद भूषण’ आणि वैद्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांना ‘आयुर्वेद रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : आजपर्यंत आयुर्वेदाकडे दुर्लक्ष केले गेले; परंतु लोकांच्या प्रयत्नांमुळे आयुर्वेदाचे नाव जगभर झाले आहे. आयुर्वेद उपचार पद्धती पुढे घेऊन जाण्याची आणि सर्व मानवाच्या कल्याणसाठी ऋषीमुनींची ही देणगी संपूर्ण जगाला देण्याची वेळ आली आहे, असे मत आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ आयुर्वेदिक कॉलेज आॅफ महाराष्ट्रतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाईक यांच्या हस्ते आयुर्वेद क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांना ‘आयुर्वेद भूषण’ आणि वैद्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांना ‘आयुर्वेद रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर, सचिव निशिकांत पाटील, खजिनदार किशोर सराफ, राज्याचे समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, राहुल आहेर, खासदार भावना गवळी, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. वनिता मुरलीकुमार, उपाध्यक्ष डॉ. अमिताभकुमार पांडे आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, राज्यातील अनेक महाविद्यालयांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. राज्यात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद स्थापन करण्याचा आणि आयुर्वेदच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यार्थी वेतन देण्याच्या असोसिएशनच्या मागणीचा आम्ही विचार करू आणि त्या पूर्णत्वास नेऊ.डॉ. मुरलीकुमार म्हणाल्या, केरळपेक्षा महाराष्ट्राचे योगदान आयुर्वेद क्षेत्रात मोठे आहे. आयुर्वेदासारखी चांगली गोष्ट आपल्याला लोकांपुढे आणायची आहे.पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैद्य डॉ. सरदेशमुख म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आयुषकरिता स्वतंत्र मंत्री असल्यामुळे आता आयुर्वेद क्षेत्राला फायदा होईल. आयुष मंत्रालयाने धोरणे व योजना आखताना परदेशी लोकांचाही विचार करावा.वैद्य खडीवाले म्हणाले, आधुनिक चिकित्सकांप्रमाणे आयुर्वेद क्षेत्रातील लोकांनाही सन्मान मिळवून देण्याची गरज आहे. सरकारने गावोगावी औषधी बगीचे तयार करण्याची योजना राबवावी. (प्रतिनिधी)