शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

यंदाही शेतकरी अग्रिम बोनसपासून वंचित !

By admin | Updated: January 26, 2016 02:18 IST

खरीप हंगामात शेतक-यांसमोर प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

अकोला: मुख्यमंत्र्यांनी अग्रिम बोनस देण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे प्रचंड आर्थिक निकड असतानाही विदर्भातील शेतकर्‍यांनी कापूस घरी साठवला होता; परंतु अग्रिम बोनस नाही आणि खासगी बाजारात दरवाढही झालेली नसल्याने अखेर शेतकर्‍यांनी संपूर्ण कापूस विकला आहे. या कापसापासून मिळालेल्या रकमेत गेल्यावर्षी पेरणीसाठी घेतलेले साधे कर्जही त्यांना फेडता आलेले नाही. परिणामी या खरीप हंगामात शेतकर्‍यांसमोर प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासन अग्रिम बोनस देणार केव्हा, याकडे अद्यापही शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी विदर्भातील शेतकर्‍यांनी जवळपास १५ लाख ३0 हजार क्विंटल क्षेत्रावर कपाशीची पेरणी केली होती. पावसाने दगा दिल्याने कापसाचा हेक्टरी दोन-तीन क्विंटल उतारा लागला. कापसाचे उत्पादन जवळपास ५0 टक्क्य़ांनी घटल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आणि हमी दर तोकडा असल्याने उत्पादनखर्च निघणेही कठीण झाले. त्यामुळे शेतकर्‍यांची भिस्त शासनाच्या मदतीवर होती; परंतु शासनाची अग्रिम बोनसची घोषणाही हवेतच विरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी उत्पादन वाढण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा होती; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने कापसाचे उत्पादन प्रचंड घटले असून, साधा उत्पादनखर्च निघणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांना अग्रिम बोनसचाच प्रतीक्षा आहे. गुजरात शासनाने तेथील शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ६00 रुपये बोनस दिल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी कापसाचा हमी दर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहे, पण भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि सीसीआयचा उपअभिकर्ता महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाने कापसाची प्रतवारी बघून प्रत्यक्षात ३८५0 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल या दरानेच कापूस खरेदी केला. त्यामुळे खासगी बाजारातील कापसाचे दर ४१00 ,४२00 वर गेले नव्हते. मागील आठवड्यात कापसाचे दर ४५00 रुपये प्रतिक्विंटलहून वर गेले होते. तथापि, यात चढ-उतार होत असल्याने शेतकर्‍यांनी मात्र कापूस विकायला काढला आहे.