शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

यंदाही शेतकरी अग्रिम बोनसपासून वंचित !

By admin | Updated: January 26, 2016 02:18 IST

खरीप हंगामात शेतक-यांसमोर प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

अकोला: मुख्यमंत्र्यांनी अग्रिम बोनस देण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे प्रचंड आर्थिक निकड असतानाही विदर्भातील शेतकर्‍यांनी कापूस घरी साठवला होता; परंतु अग्रिम बोनस नाही आणि खासगी बाजारात दरवाढही झालेली नसल्याने अखेर शेतकर्‍यांनी संपूर्ण कापूस विकला आहे. या कापसापासून मिळालेल्या रकमेत गेल्यावर्षी पेरणीसाठी घेतलेले साधे कर्जही त्यांना फेडता आलेले नाही. परिणामी या खरीप हंगामात शेतकर्‍यांसमोर प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासन अग्रिम बोनस देणार केव्हा, याकडे अद्यापही शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी विदर्भातील शेतकर्‍यांनी जवळपास १५ लाख ३0 हजार क्विंटल क्षेत्रावर कपाशीची पेरणी केली होती. पावसाने दगा दिल्याने कापसाचा हेक्टरी दोन-तीन क्विंटल उतारा लागला. कापसाचे उत्पादन जवळपास ५0 टक्क्य़ांनी घटल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आणि हमी दर तोकडा असल्याने उत्पादनखर्च निघणेही कठीण झाले. त्यामुळे शेतकर्‍यांची भिस्त शासनाच्या मदतीवर होती; परंतु शासनाची अग्रिम बोनसची घोषणाही हवेतच विरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी उत्पादन वाढण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा होती; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने कापसाचे उत्पादन प्रचंड घटले असून, साधा उत्पादनखर्च निघणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांना अग्रिम बोनसचाच प्रतीक्षा आहे. गुजरात शासनाने तेथील शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ६00 रुपये बोनस दिल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी कापसाचा हमी दर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहे, पण भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि सीसीआयचा उपअभिकर्ता महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाने कापसाची प्रतवारी बघून प्रत्यक्षात ३८५0 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल या दरानेच कापूस खरेदी केला. त्यामुळे खासगी बाजारातील कापसाचे दर ४१00 ,४२00 वर गेले नव्हते. मागील आठवड्यात कापसाचे दर ४५00 रुपये प्रतिक्विंटलहून वर गेले होते. तथापि, यात चढ-उतार होत असल्याने शेतकर्‍यांनी मात्र कापूस विकायला काढला आहे.