शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

तोंडी तलाकच्या क्रूर पद्धतीचे उच्चाटन होण्याची वेळ- उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 12, 2017 08:03 IST

मुस्लिमांच्या तोंडी तलाक या पद्धतीवर सामनाच्या अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - मुस्लिमांच्या तोंडी तलाक या पद्धतीवर सामनाच्या अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. तोंडी तलाकच्या क्रूर पद्धतीचे उच्चाटन होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष डॉ. सय्यद सादिक यांनी तोंडी तलाकसंदर्भात जे ताजे विधान केले ते मुस्लिम महिलांसाठी दिलासादायकच म्हणावे लागेल, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तोंडी तलाकची पद्धत दीड वर्षात संपुष्टात आणू, असे डॉ. सादिक यांनी जाहीर केले आहे. या भूमिकेचे केवळ मुस्लिम समाजानेच नव्हे तर सर्वधर्मीयांनी आणि सरकारनेही स्वागतच करायला हवे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनीच आजवर तलाक पद्धत रद्द करण्याच्या मार्गात सर्वाधिक अडथळे आणले. तोंडी तलाक कसा योग्य आहे हेच मुस्लिमांना, न्यायालयांना आणि सरकारांना पटवून देण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावरील मंडळी आजवर नरडी गरम करीत होती. मुस्लिमांच्या शरीयत कायद्यात कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही अशी दमबाजीही अनेक वेळा झाली. मात्र याच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष तिहेरी तलाकची पद्धत संपुष्टात आणण्याची भाषा करीत असतील तर या बदलत्या भूमिकेचे स्वागत समाजाने करायलाच हवे, असं मतही अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे- -मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी तोंडी तलाक दीड वर्षात संपुष्टात आणू अशी भूमिका घेऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकले आहे. तमाम मुस्लिम समाजानेही आता याच पावलावर पाऊल टाकून तोंडी तलाक पद्धतीचे समूळ उच्चाटन करायला हवे!-मुस्लिम समाजातील महिलांमध्येच अलीकडच्या काळात तलाकच्या अघोरी प्रथेविरुद्ध जोरदार मंथन सुरू असल्यामुळे हा मुद्दा पुनः पुन्हा ऐरणीवर येत आहे. -तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणून पत्नीला सोडून देण्याच्या या अमानुष प्रथेने मुस्लिम स्त्रीयांचे आजवर जे शोषण केले ते भयंकर आहे-तोंडी तलाक पद्धत रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची भूमिका घेणाऱया मुस्लिम समाजातील धुरीणांना बळ देण्याचे कामही आता झाले पाहिजे. -मुस्लिमच पुढाकार घेऊन तलाकची पद्धत घालविणार असतील आणि सुंठीवाचून जर हा खोकला जाणार असेल तर सरकार हस्तक्षेप करायला जाईलच कशाला?- सरकारी हस्तक्षेपाचा फार विचार न करता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सर्वच पदाधिका-यांनीही डॉ. सादिक यांच्या सुरात सूर मिसळून तिहेरी तलाकची अमानवी पद्धत रद्द करण्याची भूमिका जोरकसपणे मांडायला हवी. - या अमानुष पद्धतीमुळे शतकानुशतके मुस्लिम स्त्रीयांनी नरकयातना भोगल्या. अन्याय सहन करीत मुस्लिम महिलांच्या अनेक पिढ्या आजवर अस्तंगत झाल्या. मात्र भविष्यात तरी मुस्लिम स्त्रीयांची या जाचक तलाक पद्धतीतून सुटका व्हायलाच हवी-मुस्लिम समाजातील बुद्धिवंतांनी, विचारवंतांनीदेखील तिहेरी तलाकचा बुरसटलेला विचार झुगारून देण्यासाठी आवाज बुलंद करायला हवा. मुल्ला-मौलवी आणि धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांकडून धर्माच्या नावाखाली होणारे शोषण रोखण्यासाठी शिकल्यासवरल्या पिढीनेदेखील सजग राहायलाच हवे-अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिहेरी तलाकची प्रथा अमानुष असल्याचे मत व्यक्त केले होते. शिवाय शरीयतमध्ये बदल करता येईल काय, असा सवालही न्यायालयाने सरकारला केला होता. सर्वोच्च न्यायालयातदेखील तोंडी तलाकला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका प्रलंबित आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी तोंडी तलाक दीड वर्षात संपुष्टात आणू, अशी भूमिका घेऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकले आहे. तमाम मुस्लिम समाजानेही आता याच पावलावर पाऊल टाकून तोंडी तलाक पद्धतीचे समूळ उच्चाटन करायला हवे!