शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

तेल्हाऱ्यात तूर खरेदी बंद!

By admin | Updated: March 3, 2017 01:24 IST

जागेचा अभाव : १६ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

तेल्हारा, दि.२ : तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने बाजार समितीच्या यार्डमध्ये सुरू असलेली नाफेडची खरेदी २ मार्च रोजी बंद करण्यात आली. नाफेडची खरेदी सुरू होऊन एक महिन्याचा अवधी होऊनही बाजार समितीच्या यार्डमध्ये १६ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. खरेदी संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना नाहकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर्षी तेल्हारा तालुक्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नाफेडच्या केंद्रावर आणली असून, बैलगाड्यांसह वाहनांची बाजार समितीच्या यार्डात रांग लागली आहे. तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्याने पीक जोरात आले. तालुक्यात एकरी जवळपास ७ ते ९ क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना तुरीचे पीक झाले आहे; पण बाजारात पूरक दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले. नाफेडने खरेदी केंद्रे सुरू करावी, यासाठीची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आणि एकदाचे खरेदी केंद्र सुरू झाले. यावर्षी हमी दरासह बोनसही असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकणे पसंत केले. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने १७ जानेवारीपासून खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही सूचना न देता खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. आता नाफेडने खरेदी केलेली तूर अकोला येथील धान्य गोदामांमध्ये पाठवण्यात येत आहेत. अकोला येथील गोदांममध्ये खाली करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तेल्हारा येथून गेलेली वाहने खालीच झाली नाहीत. त्यामुळे पुन्हा २ मार्चपासून खरेदी बंद करण्यात आली आहे. सध्या १६ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना बसतोय भुर्दंड नाफेडकडून चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी आपली तूर तेल्हारा बाजार समितीच्या यार्डात विक्रीसाठी आणली आहे; मात्र नाफेडची खरेदी संथ गतीने होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आणलेल्या वाहनांचे भाडे द्यावे लागत आहे. १७ जानेवारीपासून खरेदी बंद होती. तूर आणलेल्या वाहनांचे भाडे मात्र सुरूच आहे. अजूनही मार्केट यार्डामध्ये असलेली गर्दी पाहता शेतकऱ्यांचा आठ ते दहा दिवस नंबर लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे चांगल्या भावासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.