शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

३१ मेपर्यंत राज्य खड्डेमुक्त

By admin | Updated: April 7, 2016 02:52 IST

राज्यातील ९० हजार ५३२ किलोमीटरचे रस्ते येत्या ३१ मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली

मुंबई : राज्यातील ९० हजार ५३२ किलोमीटरचे रस्ते येत्या ३१ मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली, तसेच महामार्गांवर शौचालये, प्रथमोपचार केंद्रे, महिला बचत गटांचे स्टॉल एकाच ठिकाणी असलेली ४०० सुविधा केंद्रे उभारण्यात येतील, असे ते म्हणाले. सा.बां. खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, ‘आघाडी सरकारच्या शेवटच्या वर्षात बांधकाम विभागासाठी २९०० कोटी रुपयांची तरतूद होती. मागील वर्षी आमच्या कार्यकाळात ती ३८०० कोटींवर गेली आणि यंदा ४ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. योजनेवरील खर्च गृहित धरता, ती १० हजार कोटी रुपये इतकी आहे.’ ग्रामीण विकास खात्यातूनही स्वतंत्र रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये रस्त्यांची कामे समाविष्ट केली जाणार आहेत, तसेच यंदा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने तब्बल २२ हजार किमीचे राज्यातील रस्ते ताब्यात घेतले असून, त्याची बांधणी केंद्राच्या निधीतून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या तीन वर्षांत प्रत्येक रेल्वे फाटकाच्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधला जाईल, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी बांधकाम विभागाचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला. कुलकर्णी यांनी काय-काय केले, याची सगळी माहिती आपल्याकडे आहे. त्यांच्या कार्यकाळात निलंबितांना लगेच कामावर घेण्यात आले, मनमानी बदल्या करण्यात आल्या, असे सांगत त्यांनी काही उदाहरणे दिली. चंद्रकांत पाटील साधे आहेत, पण कुलकर्र्णींनी बरेच काही केले, असे ते म्हणाले.यावर, ‘कुलकर्णी हे अतिशय कार्यक्षम अधिकारी होते. आमच्या सरकारमध्ये या खात्यात ११०० बदल्या आणि १५०० अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली, हा विक्रम आहे. कुलकर्णी केवळ प्रस्ताव द्यायचे, पण निर्णय मी आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून घेतले आणि ते अतिशय पारदर्शक होते,’ या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचे आरोप फेटाळले.