शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

३१ मेपर्यंत राज्य खड्डेमुक्त

By admin | Updated: April 7, 2016 02:52 IST

राज्यातील ९० हजार ५३२ किलोमीटरचे रस्ते येत्या ३१ मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली

मुंबई : राज्यातील ९० हजार ५३२ किलोमीटरचे रस्ते येत्या ३१ मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली, तसेच महामार्गांवर शौचालये, प्रथमोपचार केंद्रे, महिला बचत गटांचे स्टॉल एकाच ठिकाणी असलेली ४०० सुविधा केंद्रे उभारण्यात येतील, असे ते म्हणाले. सा.बां. खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, ‘आघाडी सरकारच्या शेवटच्या वर्षात बांधकाम विभागासाठी २९०० कोटी रुपयांची तरतूद होती. मागील वर्षी आमच्या कार्यकाळात ती ३८०० कोटींवर गेली आणि यंदा ४ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. योजनेवरील खर्च गृहित धरता, ती १० हजार कोटी रुपये इतकी आहे.’ ग्रामीण विकास खात्यातूनही स्वतंत्र रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये रस्त्यांची कामे समाविष्ट केली जाणार आहेत, तसेच यंदा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने तब्बल २२ हजार किमीचे राज्यातील रस्ते ताब्यात घेतले असून, त्याची बांधणी केंद्राच्या निधीतून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या तीन वर्षांत प्रत्येक रेल्वे फाटकाच्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधला जाईल, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी बांधकाम विभागाचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला. कुलकर्णी यांनी काय-काय केले, याची सगळी माहिती आपल्याकडे आहे. त्यांच्या कार्यकाळात निलंबितांना लगेच कामावर घेण्यात आले, मनमानी बदल्या करण्यात आल्या, असे सांगत त्यांनी काही उदाहरणे दिली. चंद्रकांत पाटील साधे आहेत, पण कुलकर्र्णींनी बरेच काही केले, असे ते म्हणाले.यावर, ‘कुलकर्णी हे अतिशय कार्यक्षम अधिकारी होते. आमच्या सरकारमध्ये या खात्यात ११०० बदल्या आणि १५०० अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली, हा विक्रम आहे. कुलकर्णी केवळ प्रस्ताव द्यायचे, पण निर्णय मी आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून घेतले आणि ते अतिशय पारदर्शक होते,’ या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचे आरोप फेटाळले.