शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

विदर्भातील वाघांना ‘कॉरिडोर’ची गरज

By admin | Updated: September 17, 2015 01:24 IST

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर

- गणेश वासनिक,  अमरावतीविदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित झालेल्या दोन वाघांचा अद्यापही शोध लागलेला नाही.विदर्भात मेळघाट, ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर अभयारण्यात वाघ, बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्प म्हणजेच संरक्षित क्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व दिसून येत असल्याने वन्यजीव विभागासाठी ती चिंतेची बाब आहे. मागील पाच वर्षांत देशात १,७०० वाघांची नोंद होती. व्याघ्रगणनेनंतर आता ३,५१० वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीच्या मालखेड, पोहरा तर धुळे जिल्ह्यात संरक्षित क्षेत्राबाहेर पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) दरवर्षी भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत देशातील ३९ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची प्रगणना करते. त्यानुसार विदर्भात वाघांची संख्या वाढली असली तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेर संरक्षित क्षेत्र वगळून त्यांचे अस्तित्व दिसून येत आहे. त्यामुळे वाघांचे ‘कॅरिडोर’ निर्माण झाल्यास एका जंगलातून दुसऱ्या जंगलात त्यांना संचार करता येणार आहे. मेळघाट ते अकोट, पोहरा, मालखेड तर पेंच ते बोर पुढे मालखेड, पोहरा असा ‘कॉरिडोर’ निर्माण केल्यास वाघांचे संरक्षण होऊ शकेल. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून यापूर्वी एक वाघ स्थलांरित झाला होता. पोहरा, मालखेड जंगलात अस्तित्व दिसले होते. त्यानंतर बोर अभयारण्यातून दोन वाघांचे स्थलांतरण झाले. ते कोणत्या जंगलात गेले, हे अद्याप वनविभागाने स्पष्ट केलेले नाही. काही दिवसांपूर्वी पोहरा, मालखेड जंगलात बोर अभयारण्यातून वाघ आल्याचे स्पष्ट झाले होते. पुन्हा दोन वाघ बोर अभयारण्यामधून स्थलांतरित झाल्याची माहिती आहे, मात्र त्यांचे अस्तित्व सिद्ध झाले नाही. संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती