शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

विदर्भातील वाघांना ‘कॉरिडोर’ची गरज

By admin | Updated: September 17, 2015 01:24 IST

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर

- गणेश वासनिक,  अमरावतीविदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित झालेल्या दोन वाघांचा अद्यापही शोध लागलेला नाही.विदर्भात मेळघाट, ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर अभयारण्यात वाघ, बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्प म्हणजेच संरक्षित क्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व दिसून येत असल्याने वन्यजीव विभागासाठी ती चिंतेची बाब आहे. मागील पाच वर्षांत देशात १,७०० वाघांची नोंद होती. व्याघ्रगणनेनंतर आता ३,५१० वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीच्या मालखेड, पोहरा तर धुळे जिल्ह्यात संरक्षित क्षेत्राबाहेर पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) दरवर्षी भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत देशातील ३९ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची प्रगणना करते. त्यानुसार विदर्भात वाघांची संख्या वाढली असली तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेर संरक्षित क्षेत्र वगळून त्यांचे अस्तित्व दिसून येत आहे. त्यामुळे वाघांचे ‘कॅरिडोर’ निर्माण झाल्यास एका जंगलातून दुसऱ्या जंगलात त्यांना संचार करता येणार आहे. मेळघाट ते अकोट, पोहरा, मालखेड तर पेंच ते बोर पुढे मालखेड, पोहरा असा ‘कॉरिडोर’ निर्माण केल्यास वाघांचे संरक्षण होऊ शकेल. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून यापूर्वी एक वाघ स्थलांरित झाला होता. पोहरा, मालखेड जंगलात अस्तित्व दिसले होते. त्यानंतर बोर अभयारण्यातून दोन वाघांचे स्थलांतरण झाले. ते कोणत्या जंगलात गेले, हे अद्याप वनविभागाने स्पष्ट केलेले नाही. काही दिवसांपूर्वी पोहरा, मालखेड जंगलात बोर अभयारण्यातून वाघ आल्याचे स्पष्ट झाले होते. पुन्हा दोन वाघ बोर अभयारण्यामधून स्थलांतरित झाल्याची माहिती आहे, मात्र त्यांचे अस्तित्व सिद्ध झाले नाही. संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती