शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांत सुधारणा

By admin | Updated: November 4, 2015 23:51 IST

वाघ, बिबट्या व इतर वन्यपशूंना पकडून कैद करण्याच्या लोखंडी पिंजऱ्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, हे पिंजरे अधिक मोठे

- गणेश वासनिक,  अमरावतीवाघ, बिबट्या व इतर वन्यपशूंना पकडून कैद करण्याच्या लोखंडी पिंजऱ्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, हे पिंजरे अधिक मोठे करण्याच्या सूचना व्याघ्र प्रकल्प, वनविभागाला प्राप्त झाल्या आहेत.अलीकडे बिबट्या, तसेच इतर वन्यपशूंचा नागरी वस्त्यांच्या आसपास वावर वाढला आहे. त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करताना ‘एनटीसीए’ने विशिष्ट सूचना दिल्या आहेत. यापूर्वी वन्यपशू पकडण्यासाठी लावले जाणारे पिंजरे लोखंडाचे होते. नवीन नियमावलीनुसार वाघ, बिबट्यांना पकडण्यासाठी पोलादापासून बनविलेले पिंजरे अनिवार्य क रण्यात आले आहेत. वाघ, बिबट्याला पिंजऱ्यात कैद करताना त्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा असावी, खेळती हवा, डोक्याला छत लागू नये, पिंजऱ्यातून वाहतूक होत असताना, लाकडावर फायबर किंवा काच बसवावी, विष्ठा गोळा करण्याची व्यवस्था असावी, छत मजबूत असावे, अशी नियमावली तयार करण्यात आली आहे. वाघ अथवा बिबट्याला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करताना वाहनांसोबत ‘व्हेटरनरी कौन्सिल आॅफ इंडिया’ या संस्थेचे नोंदणीकृत सदस्य असलेले पशूशल्य चिकित्सक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेषत:, वाघांचे स्थलांतर हिवाळ्यात करण्याचे निर्देश आहेत.असे तयार होतील पिंजरे४० बाय ४० व ६ एमएम आकाराचे पिंजरे तयार करताना एमएस अँगल लावले जाणार आहेत. दरवाजे १२ एमएम वायसरने घट्ट बसविले जातील. खेळत्या हवेसाठी छतावर छिद्रे असतील. पिंजऱ्यात वाघ, बिबट्याचे मलमूत्र गोळा करण्यासाठी २५ एमएमची दोन पात्रे तयार केली जातील. आहार देण्यासाठी १०० बाय १०० एमएमचा दरवाजा असेल.