शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चिवचिवाट झालाय दुर्मीळ

By admin | Updated: April 28, 2016 02:13 IST

मावळ तालुका पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात तर चिमण्यांचा चिवचिवाट हरवल्यासारखाच आहे.

करंजगाव : मावळ तालुका पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात तर चिमण्यांचा चिवचिवाट हरवल्यासारखाच आहे.तालुक्यातील डोंगरदऱ्यांत साग, बाभूळ, भेंडी, बोर, कलक, बांबू, आंबा, चिंच, जांभूळ, नीलगिरी आदी झाडे आहेत. गेल्या काही वर्षांत डोंगरदऱ्या मध्येही बंगले, फार्महाऊस बांधण्यात आले आहेत. मानवी वावर वाढल्याने आणि पर्यावरणाची काळजी न घेतल्याने अनेक ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास होताना दिसत आहे. वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये मोबाइल टॉवरची गर्दी दिसत आहे. काही टॉवर हे घराच्या स्लॅबवर आहेत. मोबाइल टॉवरमुळे चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी घरांमधील आजोबा, पणजोबांसह देवदेवतांचे फोटो लावलेले असायचे. त्यांच्या मागे चिमण्या घरटी करून राहत. पण, आता काँक्रिटच्या भिंतींमुळे चिमण्यांना घरटी करायला चांगली जागाच मिळत नाही. आता या संस्कृतीचे दर्शनही दुर्लभ होत आहे. मोबाइल टॉवरपासून इमारतीच्या मालकास दरमहा चांगले उत्पन्न मिळते. मात्र, त्यामुळे निष्पाप चिमण्यांचा बळी जात आहे. चिमण्या व इतर पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले असून, काही ठिकाणी तर क्वचित एखादी चिमणी दिसते. पूर्वी शेतामध्ये धान्य असायचे. तेथे चिमण्यांचे थवे असायचे. धान्य काही ठिकाणी अळ्या, किडे खायला मिळायचे. आता प्लॅस्टिकच्या पिशवीतून धान्य येत असल्यानं चिमण्यांची उपासमार होऊ लागली आहे. शिवाय, मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींमुळे चिमण्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. चिमण्यांवर प्रेम असल्याने त्यांच्याबद्दल सर्वांना चिंता आहे, असे नरेंद्र मोदी विचार मंचाचे संस्थापक शैलेंद्र रावळ, केदार शिरसाट, नवनाथ नाणेकर, अतुल दाभणे, विलास देवराम गायकवाड, कुणाल गिरंजे, अभिजित ठकले, सुधीर गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येकाने अंगणात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवावी, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य शंकर काजळे यांनी केले आहे. (वार्ताहर)