शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा बळी राजकीय दबावातून

By admin | Updated: August 21, 2014 01:06 IST

पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे.

व्याघ्रवधावरून हलकल्लोळ : वन्यजीवप्रेमींचा आरोपचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे. यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.मंगळवारी सायंकाळी पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी गावाजवळील जंगलात वनविभागाने शॉर्प शूटरच्या साहाय्याने वाघाला ठार केले होते. वाघ आणि मानवाच्या संघर्षाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून केवळ राजकीय दबावापोटी वाघ मारले जात आहेत, असा आरोप होत आहे. ठार केलेला वाघ नर होता. प्रत्यक्षात नरभक्षी वाघ नर नसून मादी होती, असाही आरोप स्थानिक जनतेच्या कथनावरून वन्यजीवपे्रमी करीत आहेत.केवळ अडीच वर्षे वयाचा हा वाघ पूर्ण वाढ झालेला नसून बछडा होता. या वयात वाघाचे बछडे अधिवास निश्चित करणे आणि शिकार करण्याचे प्रशिक्षण मातेकडून घेत असतात. हे लक्षात घेतले तर, तो नरभक्षक नव्हता हेच स्पष्ट होते, असा युक्तिवाद वन्यप्रेमींनी केला आहे. परिसरातील सात व्यक्तींचा वाघाकडून बळी जाणे ही घटना दु:खदायकच आहे. जनप्रतिनिधींनी मतदार संघात विकासकामे न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागते. मात्र जनप्रतिनिधी यावर उपाय सुचविण्यापेक्षा थेट वाघाला मारण्यासाठी आग्रही भूमिका घेतात, हे राजकीय लाभासाठी असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी गेल्या सोमवारी, ‘वाघाला वन विभागाने मारावे, अन्यथा आम्हीच त्याला ठार करू’ असे आव्हान देत आठवडाभराचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १७ आॅगस्टच्या दुपारी ३.३० वाजता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघाला मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १९ तारखेच्या सायंकाळी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. शोभाताई फडणवीस यांच्या या विधानावर वन्यजीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. जनतेच्या भावना भडकविणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करून राजकीय स्वार्थापोटी वाघांचा बळी घेणाऱ्या नेत्यांचाच बंदोबदस्त करावा, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील वन्यप्रेमींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)