शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र मृत्यू प्रकरणांची केंद्राकडून खातरजमा

By admin | Updated: November 5, 2016 04:03 IST

गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे.

गणेश वासनिक,

अमरावती- गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे. त्यासाठी यापूर्वीचे सीबीआय चौकशी आणि वनविभागाचे अहवाल पुन्हा तपासण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.वाघांच्या वाढत्या मृत्यूंबाबत केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: विदर्भात गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते १८ वाघांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये काही वाघांचा मृत्यू नैसर्गिक तर काहींच्या शिकारी झाल्याच्या नोंदी आहेत. या मृत्यूंबाबत सीबीआय आणि वनविभागाच्या अहवालात बरीच तफावत आढळल्यामुळे केंद्र सरकारने ‘क्रॉस चेकिंग’ आरंभले आहे. त्यात या वाघांचा खरोखर नैसर्गिक मृत्यूच झाला का, याचा शोध घेतला जाणार आहे. मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीने विदर्भातील ताडोबा, मेळघाट व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांना लक्ष्य करून शिकारी केल्याचे सीबीआय चौकशीत स्पष्ट झाले होते. परंतु बहेलिया टोळीचा मुख्य सूत्रधार कट्टू याच्यापर्यंत वनविभागाला का पोहोचता आले नाही, याची कारणमीमांसा केंद्र सरकार करणार आहे. तसेच मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यात राहून वाघांची शिकार करणाऱ्या कमला पारधन या महिलेचाही विषय हाताळला जाणार आहे. (प्रतिनिधी)>केंद्र सरकारने आढावा घेतलावाघांच्या मृत्यूंसंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने आढावा घेतला आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे, असे नागपूर येथील उपवनसंरक्षक (वन्यजीव) गिरीश वशिष्ठ यांनी सांगितले.>विजेच्या धक्क्याने मेलेल्या वाघाला शेतात पुरलेगोंडपिंपरी (चंद्रपूर) : रानडुकरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी धानापूर शेतशिवारात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मंगळवारी रात्री पट्टेदार वाघाचा जागीच मृत्यू झाला. कारवाईच्या भीतीने शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच शेतात खड्डा खोदून मृत वाघाला पुरले. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर वन विभागाने शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे. तसेच वाघाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.