शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

व्याघ्र मृत्यू प्रकरणांची केंद्राकडून खातरजमा

By admin | Updated: November 5, 2016 04:03 IST

गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे.

गणेश वासनिक,

अमरावती- गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे. त्यासाठी यापूर्वीचे सीबीआय चौकशी आणि वनविभागाचे अहवाल पुन्हा तपासण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.वाघांच्या वाढत्या मृत्यूंबाबत केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: विदर्भात गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते १८ वाघांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये काही वाघांचा मृत्यू नैसर्गिक तर काहींच्या शिकारी झाल्याच्या नोंदी आहेत. या मृत्यूंबाबत सीबीआय आणि वनविभागाच्या अहवालात बरीच तफावत आढळल्यामुळे केंद्र सरकारने ‘क्रॉस चेकिंग’ आरंभले आहे. त्यात या वाघांचा खरोखर नैसर्गिक मृत्यूच झाला का, याचा शोध घेतला जाणार आहे. मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीने विदर्भातील ताडोबा, मेळघाट व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांना लक्ष्य करून शिकारी केल्याचे सीबीआय चौकशीत स्पष्ट झाले होते. परंतु बहेलिया टोळीचा मुख्य सूत्रधार कट्टू याच्यापर्यंत वनविभागाला का पोहोचता आले नाही, याची कारणमीमांसा केंद्र सरकार करणार आहे. तसेच मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यात राहून वाघांची शिकार करणाऱ्या कमला पारधन या महिलेचाही विषय हाताळला जाणार आहे. (प्रतिनिधी)>केंद्र सरकारने आढावा घेतलावाघांच्या मृत्यूंसंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने आढावा घेतला आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे, असे नागपूर येथील उपवनसंरक्षक (वन्यजीव) गिरीश वशिष्ठ यांनी सांगितले.>विजेच्या धक्क्याने मेलेल्या वाघाला शेतात पुरलेगोंडपिंपरी (चंद्रपूर) : रानडुकरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी धानापूर शेतशिवारात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मंगळवारी रात्री पट्टेदार वाघाचा जागीच मृत्यू झाला. कारवाईच्या भीतीने शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच शेतात खड्डा खोदून मृत वाघाला पुरले. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर वन विभागाने शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे. तसेच वाघाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.