शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

व्याघ्र मृत्यू प्रकरणांची केंद्राकडून खातरजमा

By admin | Updated: November 5, 2016 04:03 IST

गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे.

गणेश वासनिक,

अमरावती- गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे. त्यासाठी यापूर्वीचे सीबीआय चौकशी आणि वनविभागाचे अहवाल पुन्हा तपासण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.वाघांच्या वाढत्या मृत्यूंबाबत केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: विदर्भात गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते १८ वाघांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये काही वाघांचा मृत्यू नैसर्गिक तर काहींच्या शिकारी झाल्याच्या नोंदी आहेत. या मृत्यूंबाबत सीबीआय आणि वनविभागाच्या अहवालात बरीच तफावत आढळल्यामुळे केंद्र सरकारने ‘क्रॉस चेकिंग’ आरंभले आहे. त्यात या वाघांचा खरोखर नैसर्गिक मृत्यूच झाला का, याचा शोध घेतला जाणार आहे. मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीने विदर्भातील ताडोबा, मेळघाट व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांना लक्ष्य करून शिकारी केल्याचे सीबीआय चौकशीत स्पष्ट झाले होते. परंतु बहेलिया टोळीचा मुख्य सूत्रधार कट्टू याच्यापर्यंत वनविभागाला का पोहोचता आले नाही, याची कारणमीमांसा केंद्र सरकार करणार आहे. तसेच मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यात राहून वाघांची शिकार करणाऱ्या कमला पारधन या महिलेचाही विषय हाताळला जाणार आहे. (प्रतिनिधी)>केंद्र सरकारने आढावा घेतलावाघांच्या मृत्यूंसंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने आढावा घेतला आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे, असे नागपूर येथील उपवनसंरक्षक (वन्यजीव) गिरीश वशिष्ठ यांनी सांगितले.>विजेच्या धक्क्याने मेलेल्या वाघाला शेतात पुरलेगोंडपिंपरी (चंद्रपूर) : रानडुकरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी धानापूर शेतशिवारात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मंगळवारी रात्री पट्टेदार वाघाचा जागीच मृत्यू झाला. कारवाईच्या भीतीने शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच शेतात खड्डा खोदून मृत वाघाला पुरले. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर वन विभागाने शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे. तसेच वाघाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.